शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सिन्नरला पंधरा स्थलांतरित कुटुंबांना शिधा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 18:03 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने येथील युवा मित्रने शहर व परिसरात अडकून पडलेल्या १५ स्थलांतरीत कुटुंबांसह औद्योगिक वसाहतीतील १२ कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढा अन्नधान्याचा शिधा वाटप केला.

सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने येथील युवा मित्रने शहर व परिसरात अडकून पडलेल्या १५ स्थलांतरीत कुटुंबांसह औद्योगिक वसाहतीतील १२ कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढा अन्नधान्याचा शिधा वाटप केला.सिन्नर-शिर्डी मार्गावरील कुंदेवाडी फाट्यावर जालना जिल्ह्यातील ११ गोसावी कुुटुंबे पाल टाकून राहतात. या कुटुंबातील ३५-४० सदस्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याची माहिती युवा मित्रचे कार्यकारी संचालक सुनील पोटे यांना मिळाल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधला. नांदूरशिंगोटे येथील रोजगार मिळणे बंद झाल्याने रोजगाराच्या शोधात या कुटुंबानी फाट्यावर पाल ठोकले आणि कोरोनाचे संकट उभे राहिले. त्यामुळे झोपड्यांमध्येच अडकून पडण्याची वेळ त्यांच्यावर आली. विजयनगरमधील सामाजिक कार्यकर्ते मनोज भंडारी यांच्या किराणा दुकानात अत्यावश्यक वस्तूंची यादी पोहोचविण्यात आली. एका कुटुंबासाठी लागणारा किराणा त्यांनी गोणीत भरून दिला. देवनदीच्या काठावर पाल टाकलेल्या ४ कुटुंबांना व मुसळगाव वसाहतीतील एटलस फाईन केमिकल्सच्या झारखंड व बिहारमधील १४ कुटुंबांतील ६४ सदस्यांनाही किराणा माल पोहोचविण्यात आला. यावेळी तहसीलदार राहुल कोताडे, विलास नाठे, रतन माळी, संताजी जगताप, ग्रामविकास अधिकारी पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.रेवा फार्मा कंपनीकडून २२ हजार ५०० रु पयांचा धनादेशरोजगारासाठी परिसरात स्थलांतरीत झालेल्या १५-२० कुटुंबांची युवा मित्रमुळे माहिती झाली आणि त्याच्यातील कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये या भावनेतून या उपक्र मात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. गावातील १५ कुटुंबांच्या किराणाचा खर्च उचलण्याची तयारी रेवा फार्मा कंपनीने दाखवत २२ हजार ५०० रु पयांचा धनादेश युवा मित्रकडे सुपुर्द केला. या उपक्र माला मदतीसाठी मुसळगाव वसाहतीतील अनेक कंपन्या पुढे येत असून त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाची भूक भागविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्टाईसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक