शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

खतांच्या किमती दोन दिवसांत कमी होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:16 AM

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने ...

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, म्हणून गेल्या दोन दिवसांत अनेक शेतकरी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांना संपर्क साधून नाराजीचा भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे भामरे यांनी सोमवारी दिल्ली येथे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर, केमिकल ॲन्ड फर्टिलायझर्स राज्यमंत्री मनसुक मांडविया आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सांगितले की, स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा खतांच्या दरवाढीबद्द्ल चिंता व्यक्त केली आहे, शेतकरीबांधवांना ही दरवाढ परवडणारी नसल्याने खतांच्या किंमती पूर्वीप्रमाणेच असाव्यात यासाठी त्वरित एक मंत्रिगटाची नियुक्ती करून खतांच्या किमती कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे निश्चितच येत्या दोन ते तीन दिवसांत खतांच्या वाढलेल्या किमती कमी केल्या जातील आणि शेतकऱ्यांना वाजवी किमतीत रासायनिक खते मिळतील. खरीप हंगामाच्या आधी हा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासित केले आहे.

त्यामुळे देशभरातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये, येत्या दोन ते तीन दिवसांत खतांच्या किमती कमी होतील, असा विश्वास खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे.