शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खरिपावर खतांच्या भाववाढीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:54 IST

खरिपाचा हंगाम तोंडावर आलेला असताना मार्च-एप्रिल महिन्यांत खतांच्या किमतीत वाढ झाल्यानंतर ही दरवाढ सातत्याने सुरूच असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.

नाशिक : खरिपाचा हंगाम तोंडावर आलेला असताना मार्च-एप्रिल महिन्यांत खतांच्या किमतीत वाढ झाल्यानंतर ही दरवाढ सातत्याने सुरूच असल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.  खतांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या फॉस्फेरिक अ‍ॅसिडची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत वाढल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या खतनिर्मिती कंपन्यांची कच्च्या मालाची आयात महागली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीच्या झळा थेट सर्वसाधारण शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहचल्या असून, खरिपाला आता खाद्य देण्याची गरज असताना खतांच्या किमतीत जवळपास १०ते १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वेगवेगळ्या पिकांसाठी प्रमुख्याने वापर केल्या जाणाºया डीएपी खताच्या किमतीत एका बॅगमागे ३१ मार्चनंतर जवळपास २१० रुपयांनी वाढ झाली आहे, तर वेगवेगळ्या वर्गवारीतील एनपीके खतांच्या किमतीतही मोठ्या प्रमाणात झाली आहे. यातील १०-२६-२६च्या एका बॅगच्या मार्चमधील १०६० ते ७० रुपये असलेल्या किमती एप्रिल महिन्यात ११८६ रुपयांपर्यंत वाढल्या असून, यात जवळपास ११० रुपये वाढ झाली आहे. २४-२४-१० च्या किमतीतही १८५ रुपयांनी वाढल्या असून, १२-३२-१६ च्या किमती १२२ रुपयांनी वाढल्या आहेत. युरियाच्या किमतीत सध्याच्या स्थितीत फार मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसत नसले तरी युरियाच्या पॅकिंगचे वजन कमी करण्यात आले आहे. पूर्वी २९५ रुपयांना ५० किलोग्रॅमच्या पॅकिंगमध्ये येणारी युरियाची पिशवी आता ४५ किलोची करण्यात आली असून, ती २६५ ते २७५ रुपयांना मिळत आहे.  खतांची पुरेशी उपलब्धता खरिपाच्या हंगामात शेतकºयांना खतांची टंचाई जाणवू नये यासाठी बाजारपेठेत मुबलक प्रमाणात खते उपलब्ध करून देण्यात आली असून, यात मेरीट आॅफ पोटॅश (एमओपी) वर्गातील खतांसह, डीएपी, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम सल्फेट आदी विविध प्रकारची खते सध्या उपलब्ध आहेत. मात्र नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने ओढ दिल्याने पिके वाळू लागली आहे. त्यामुळे शेतक-यांकडून खतांची उचल घटली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी