शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मेथी ५.५०, तर कांदापात ३४ रुपये जुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 01:15 IST

येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक स्थिर असून, दरांमध्ये ५ ते १० टक्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सध्या मेथीला सरासरी ५.५० रुपये, तर कांदापातीला २४ रुपये जुडीचा दर मिळत आहे. किराणा बाजारात या सप्ताहात काहीशी मंदी जाणवली.

ठळक मुद्देकिराणा बाजारात मंदी : फळांची आवक झाली कमी

नाशिक : येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक स्थिर असून, दरांमध्ये ५ ते १० टक्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सध्या मेथीला सरासरी ५.५० रुपये, तर कांदापातीला २४ रुपये जुडीचा दर मिळत आहे. किराणा बाजारात या सप्ताहात काहीशी मंदी जाणवली. त्यामुळे सर्व किराणामालाचे भाव स्थिर आहेत. फळबाजारात फळांची आवक काहीशी घटल्याने फळांच्या दरांमध्ये तेजी आली आहे. कांद्याचे भाव घसरत असताना बटाटा, टमाट्याचे भाव टिकून असून, घाऊक बाजारात सरासरी २७.५० रुपये किलो दराने बटाट्याची विक्री होत आहे. कोथिंबिरीची आवक वाढल्याने कोथिंबिरीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. फळभाज्यांमध्ये फारसा चढउतार झालेला नाही. या सप्ताहात फळांची आवक कमी झाल्याने फळबाजार तेजीत आहेत. डाळिंब सरासरी ३२ रुपये किलोने विकले जात आहेत, तर सफरचंदाच्या भावात वाढ झाली असून, सरासरी ८० रुपये किलोने सफरचंदांची विक्री होत आहे. किराणा बाजारात या सप्ताहात कोणत्याही वस्तूमध्ये चढउतार झालेला नाही.

चौकट -----

वांगी उतरली

मागील दोन सप्ताहांपर्यंत वांग्याला चांगला दर मिळत होता. या सप्ताहात वांग्याचे दर उतरले असून, बटाटा मात्र तेजीत आहे. पालकाची जुडी, तर मातीमोल भावाने विकली जात असून, घाऊक बाजारातील सरासरी अडीच रुपये जुडीचा दर आहे.

चौकट -

स्ट्रॅाबेरीचे आगमन

फळबाजारात स्ट्रॉबेरीचे आगमन झाले असून, किरकोळ बाजारात साधारणत: ६० रुपये किलो दर आहे. काही फळविक्रेत्यांकडे आंब्याचेही आगमन झाले असून, २०० ते २८० रुपये किलोचा दर त्याला मिळत आहे.

चौकट -

किराणा बाजारात शांतता

नवीन पीक बाजारात आल्याने किराणा बाजारात फारशी उलाढाल झालेली नाही. यामुळे सर्व डाळींसह तेलाचे भाव या सप्ताहात स्थिर राहिलेत. दिवाळीपूर्वी किराणा बाजारात अचानकपणे आलेली तेजी आता कमी होऊ लागली आहे.

कोट -

सध्या खाद्यतेलाचे भाव डब्याला १९०० रुपयांपर्यंत गेले आहेत. मार्चपर्यंत खाद्यतेलांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता असून, डब्याचे भाव दोन हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- अनिल बूब, किराणा व्यापारी

कोट -

कांद्याचे भाव उतरत असतानाच पालेभाज्या आणि फळभाज्यांचेही भाव उतरल्याने या मालावर होणार खर्चही वाया गेला असून, शेतकऱ्यांनी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. बदलत्या हवामानाचाही भाजीपाला उत्पादनावर परिणाम होत आहे.

- अशोक दौंडे, शेतकरी

कोट -

दिवाळीनंतर किराणामालामध्ये फारशी वाढ झाली नसल्याने दिलासा मिळत आहे. घाऊक बाजारात शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असला तरी किरकोळ विक्रेतेमात्र आमच्याकडून अधिक पैसे घेतात. त्यामुळे स्वस्त भाजीपाल्याचा लाभ मिळत नाही.

- शोभना निकम, गृहिणी

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती