शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

मेथी ५.५०, तर कांदापात ३४ रुपये जुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 01:15 IST

येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक स्थिर असून, दरांमध्ये ५ ते १० टक्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सध्या मेथीला सरासरी ५.५० रुपये, तर कांदापातीला २४ रुपये जुडीचा दर मिळत आहे. किराणा बाजारात या सप्ताहात काहीशी मंदी जाणवली.

ठळक मुद्देकिराणा बाजारात मंदी : फळांची आवक झाली कमी

नाशिक : येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक स्थिर असून, दरांमध्ये ५ ते १० टक्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सध्या मेथीला सरासरी ५.५० रुपये, तर कांदापातीला २४ रुपये जुडीचा दर मिळत आहे. किराणा बाजारात या सप्ताहात काहीशी मंदी जाणवली. त्यामुळे सर्व किराणामालाचे भाव स्थिर आहेत. फळबाजारात फळांची आवक काहीशी घटल्याने फळांच्या दरांमध्ये तेजी आली आहे. कांद्याचे भाव घसरत असताना बटाटा, टमाट्याचे भाव टिकून असून, घाऊक बाजारात सरासरी २७.५० रुपये किलो दराने बटाट्याची विक्री होत आहे. कोथिंबिरीची आवक वाढल्याने कोथिंबिरीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. फळभाज्यांमध्ये फारसा चढउतार झालेला नाही. या सप्ताहात फळांची आवक कमी झाल्याने फळबाजार तेजीत आहेत. डाळिंब सरासरी ३२ रुपये किलोने विकले जात आहेत, तर सफरचंदाच्या भावात वाढ झाली असून, सरासरी ८० रुपये किलोने सफरचंदांची विक्री होत आहे. किराणा बाजारात या सप्ताहात कोणत्याही वस्तूमध्ये चढउतार झालेला नाही.

चौकट -----

वांगी उतरली

मागील दोन सप्ताहांपर्यंत वांग्याला चांगला दर मिळत होता. या सप्ताहात वांग्याचे दर उतरले असून, बटाटा मात्र तेजीत आहे. पालकाची जुडी, तर मातीमोल भावाने विकली जात असून, घाऊक बाजारातील सरासरी अडीच रुपये जुडीचा दर आहे.

चौकट -

स्ट्रॅाबेरीचे आगमन

फळबाजारात स्ट्रॉबेरीचे आगमन झाले असून, किरकोळ बाजारात साधारणत: ६० रुपये किलो दर आहे. काही फळविक्रेत्यांकडे आंब्याचेही आगमन झाले असून, २०० ते २८० रुपये किलोचा दर त्याला मिळत आहे.

चौकट -

किराणा बाजारात शांतता

नवीन पीक बाजारात आल्याने किराणा बाजारात फारशी उलाढाल झालेली नाही. यामुळे सर्व डाळींसह तेलाचे भाव या सप्ताहात स्थिर राहिलेत. दिवाळीपूर्वी किराणा बाजारात अचानकपणे आलेली तेजी आता कमी होऊ लागली आहे.

कोट -

सध्या खाद्यतेलाचे भाव डब्याला १९०० रुपयांपर्यंत गेले आहेत. मार्चपर्यंत खाद्यतेलांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता असून, डब्याचे भाव दोन हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- अनिल बूब, किराणा व्यापारी

कोट -

कांद्याचे भाव उतरत असतानाच पालेभाज्या आणि फळभाज्यांचेही भाव उतरल्याने या मालावर होणार खर्चही वाया गेला असून, शेतकऱ्यांनी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. बदलत्या हवामानाचाही भाजीपाला उत्पादनावर परिणाम होत आहे.

- अशोक दौंडे, शेतकरी

कोट -

दिवाळीनंतर किराणामालामध्ये फारशी वाढ झाली नसल्याने दिलासा मिळत आहे. घाऊक बाजारात शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असला तरी किरकोळ विक्रेतेमात्र आमच्याकडून अधिक पैसे घेतात. त्यामुळे स्वस्त भाजीपाल्याचा लाभ मिळत नाही.

- शोभना निकम, गृहिणी

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती