शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

मेथी ५.५०, तर कांदापात ३४ रुपये जुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 01:15 IST

येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक स्थिर असून, दरांमध्ये ५ ते १० टक्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सध्या मेथीला सरासरी ५.५० रुपये, तर कांदापातीला २४ रुपये जुडीचा दर मिळत आहे. किराणा बाजारात या सप्ताहात काहीशी मंदी जाणवली.

ठळक मुद्देकिराणा बाजारात मंदी : फळांची आवक झाली कमी

नाशिक : येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक स्थिर असून, दरांमध्ये ५ ते १० टक्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सध्या मेथीला सरासरी ५.५० रुपये, तर कांदापातीला २४ रुपये जुडीचा दर मिळत आहे. किराणा बाजारात या सप्ताहात काहीशी मंदी जाणवली. त्यामुळे सर्व किराणामालाचे भाव स्थिर आहेत. फळबाजारात फळांची आवक काहीशी घटल्याने फळांच्या दरांमध्ये तेजी आली आहे. कांद्याचे भाव घसरत असताना बटाटा, टमाट्याचे भाव टिकून असून, घाऊक बाजारात सरासरी २७.५० रुपये किलो दराने बटाट्याची विक्री होत आहे. कोथिंबिरीची आवक वाढल्याने कोथिंबिरीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. फळभाज्यांमध्ये फारसा चढउतार झालेला नाही. या सप्ताहात फळांची आवक कमी झाल्याने फळबाजार तेजीत आहेत. डाळिंब सरासरी ३२ रुपये किलोने विकले जात आहेत, तर सफरचंदाच्या भावात वाढ झाली असून, सरासरी ८० रुपये किलोने सफरचंदांची विक्री होत आहे. किराणा बाजारात या सप्ताहात कोणत्याही वस्तूमध्ये चढउतार झालेला नाही.

चौकट -----

वांगी उतरली

मागील दोन सप्ताहांपर्यंत वांग्याला चांगला दर मिळत होता. या सप्ताहात वांग्याचे दर उतरले असून, बटाटा मात्र तेजीत आहे. पालकाची जुडी, तर मातीमोल भावाने विकली जात असून, घाऊक बाजारातील सरासरी अडीच रुपये जुडीचा दर आहे.

चौकट -

स्ट्रॅाबेरीचे आगमन

फळबाजारात स्ट्रॉबेरीचे आगमन झाले असून, किरकोळ बाजारात साधारणत: ६० रुपये किलो दर आहे. काही फळविक्रेत्यांकडे आंब्याचेही आगमन झाले असून, २०० ते २८० रुपये किलोचा दर त्याला मिळत आहे.

चौकट -

किराणा बाजारात शांतता

नवीन पीक बाजारात आल्याने किराणा बाजारात फारशी उलाढाल झालेली नाही. यामुळे सर्व डाळींसह तेलाचे भाव या सप्ताहात स्थिर राहिलेत. दिवाळीपूर्वी किराणा बाजारात अचानकपणे आलेली तेजी आता कमी होऊ लागली आहे.

कोट -

सध्या खाद्यतेलाचे भाव डब्याला १९०० रुपयांपर्यंत गेले आहेत. मार्चपर्यंत खाद्यतेलांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता असून, डब्याचे भाव दोन हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- अनिल बूब, किराणा व्यापारी

कोट -

कांद्याचे भाव उतरत असतानाच पालेभाज्या आणि फळभाज्यांचेही भाव उतरल्याने या मालावर होणार खर्चही वाया गेला असून, शेतकऱ्यांनी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. बदलत्या हवामानाचाही भाजीपाला उत्पादनावर परिणाम होत आहे.

- अशोक दौंडे, शेतकरी

कोट -

दिवाळीनंतर किराणामालामध्ये फारशी वाढ झाली नसल्याने दिलासा मिळत आहे. घाऊक बाजारात शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असला तरी किरकोळ विक्रेतेमात्र आमच्याकडून अधिक पैसे घेतात. त्यामुळे स्वस्त भाजीपाल्याचा लाभ मिळत नाही.

- शोभना निकम, गृहिणी

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती