शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

मेथी ५.५०, तर कांदापात ३४ रुपये जुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 01:15 IST

येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक स्थिर असून, दरांमध्ये ५ ते १० टक्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सध्या मेथीला सरासरी ५.५० रुपये, तर कांदापातीला २४ रुपये जुडीचा दर मिळत आहे. किराणा बाजारात या सप्ताहात काहीशी मंदी जाणवली.

ठळक मुद्देकिराणा बाजारात मंदी : फळांची आवक झाली कमी

नाशिक : येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक स्थिर असून, दरांमध्ये ५ ते १० टक्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात सध्या मेथीला सरासरी ५.५० रुपये, तर कांदापातीला २४ रुपये जुडीचा दर मिळत आहे. किराणा बाजारात या सप्ताहात काहीशी मंदी जाणवली. त्यामुळे सर्व किराणामालाचे भाव स्थिर आहेत. फळबाजारात फळांची आवक काहीशी घटल्याने फळांच्या दरांमध्ये तेजी आली आहे. कांद्याचे भाव घसरत असताना बटाटा, टमाट्याचे भाव टिकून असून, घाऊक बाजारात सरासरी २७.५० रुपये किलो दराने बटाट्याची विक्री होत आहे. कोथिंबिरीची आवक वाढल्याने कोथिंबिरीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. फळभाज्यांमध्ये फारसा चढउतार झालेला नाही. या सप्ताहात फळांची आवक कमी झाल्याने फळबाजार तेजीत आहेत. डाळिंब सरासरी ३२ रुपये किलोने विकले जात आहेत, तर सफरचंदाच्या भावात वाढ झाली असून, सरासरी ८० रुपये किलोने सफरचंदांची विक्री होत आहे. किराणा बाजारात या सप्ताहात कोणत्याही वस्तूमध्ये चढउतार झालेला नाही.

चौकट -----

वांगी उतरली

मागील दोन सप्ताहांपर्यंत वांग्याला चांगला दर मिळत होता. या सप्ताहात वांग्याचे दर उतरले असून, बटाटा मात्र तेजीत आहे. पालकाची जुडी, तर मातीमोल भावाने विकली जात असून, घाऊक बाजारातील सरासरी अडीच रुपये जुडीचा दर आहे.

चौकट -

स्ट्रॅाबेरीचे आगमन

फळबाजारात स्ट्रॉबेरीचे आगमन झाले असून, किरकोळ बाजारात साधारणत: ६० रुपये किलो दर आहे. काही फळविक्रेत्यांकडे आंब्याचेही आगमन झाले असून, २०० ते २८० रुपये किलोचा दर त्याला मिळत आहे.

चौकट -

किराणा बाजारात शांतता

नवीन पीक बाजारात आल्याने किराणा बाजारात फारशी उलाढाल झालेली नाही. यामुळे सर्व डाळींसह तेलाचे भाव या सप्ताहात स्थिर राहिलेत. दिवाळीपूर्वी किराणा बाजारात अचानकपणे आलेली तेजी आता कमी होऊ लागली आहे.

कोट -

सध्या खाद्यतेलाचे भाव डब्याला १९०० रुपयांपर्यंत गेले आहेत. मार्चपर्यंत खाद्यतेलांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता असून, डब्याचे भाव दोन हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- अनिल बूब, किराणा व्यापारी

कोट -

कांद्याचे भाव उतरत असतानाच पालेभाज्या आणि फळभाज्यांचेही भाव उतरल्याने या मालावर होणार खर्चही वाया गेला असून, शेतकऱ्यांनी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. बदलत्या हवामानाचाही भाजीपाला उत्पादनावर परिणाम होत आहे.

- अशोक दौंडे, शेतकरी

कोट -

दिवाळीनंतर किराणामालामध्ये फारशी वाढ झाली नसल्याने दिलासा मिळत आहे. घाऊक बाजारात शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असला तरी किरकोळ विक्रेतेमात्र आमच्याकडून अधिक पैसे घेतात. त्यामुळे स्वस्त भाजीपाल्याचा लाभ मिळत नाही.

- शोभना निकम, गृहिणी

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती