शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

कृतज्ञतेच्या नमस्काराची पंचविशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:32 IST

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने साहित्येतर क्षेत्रात संस्मरणीय कामगिरी करणाºया आणि देशाची सांस्कृतिक उंची वाढविणाºया ज्येष्ठांना ‘गोदावरी गौरव’ने एक वर्षाआड सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार नव्हे तर कृतज्ञतेचा नमस्कार असल्याचे कुसुमाग्रजांनीच नमूद करून ठेवले आहे. याच कृतज्ञतेच्या नमस्काराला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ वर्षांत ७८ मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला आहे. एक वर्षाआड गौरव करण्यात येत असल्याने २०१८ साल हे पुरस्काराचे १४वे वर्ष असणार आहे. परंतु, २५ वर्षांत आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणाºया अनेक मान्यवरांना अनुभवण्याची संधी त्यानिमित्ताने नाशिककरांना मिळालेली आहे.

धनंजय वाखारे ।नाशिक : नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने साहित्येतर क्षेत्रात संस्मरणीय कामगिरी करणाºया आणि देशाची सांस्कृतिक उंची वाढविणाºया ज्येष्ठांना ‘गोदावरी गौरव’ने एक वर्षाआड सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार नव्हे तर कृतज्ञतेचा नमस्कार असल्याचे कुसुमाग्रजांनीच नमूद करून ठेवले आहे. याच कृतज्ञतेच्या नमस्काराला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ वर्षांत ७८ मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला आहे. एक वर्षाआड गौरव करण्यात येत असल्याने २०१८ साल हे पुरस्काराचे १४वे वर्ष असणार आहे. परंतु, २५ वर्षांत आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणाºया अनेक मान्यवरांना अनुभवण्याची संधी त्यानिमित्ताने नाशिककरांना मिळालेली आहे.  कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर त्यांच्या हयातीतच २६ मार्च १९९० रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर प्रतिष्ठानमार्फत साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल १९९१पासून ‘जनस्थान’, तर १९९२पासून ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार सुरू करण्यात आले. एक वर्षाआड देण्यात येणाºया या पुरस्कारांची योजना आजही अखंडपणे त्यांच्या अनुयायांमार्फत सुरू आहे. त्यात, गोदावरी गौरव हा पुरस्कार नसून तो कृतज्ञतेचा नमस्कार आहे, असे खुद्द कुसुमाग्रजांनीच नमूद करून ठेवल्याने एक वर्षाआड लोकसेवा, संगीत-नृत्य, चित्रपट-नाट्य, ज्ञान-विज्ञान, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प या सहा प्रकारांतील मान्यवरांची निवड करून त्यांना गौरविण्यात येते. १९९२ आणि १९९४ मध्ये चित्र-शिल्प ही वर्गवारी नव्हती. १९९६ पासून चित्र-शिल्प या वर्गवारीचा समावेश करण्यात आला. गेल्या २५ वर्षांत १३ वितरण सोहळे पार पडले आहेत. एका वर्षी जनस्थान आणि एका वर्षी गोदावरी गौरव सोहळा हा नाशिककरांसाठी मोठी मेजवानी ठरत आलेला आहे. अनेक मान्यवरांना त्यानिमित्ताने प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी नाशिककरांना मिळालेली आहे. आतापर्यंत गंगुबाई हनगल, अभिनेता अशोककुमार, डॉ. वसंत गोवारीकर, जे. एफ. रिबेरो, श्रीमती रोहिणी भाटे, गुलजार, डॉ. जयंत नारळीकर, पॉली उम्रीगर, अण्णा हजारे, सुधीर फडके, ऋषिकेश मुखर्जी, माधव सातवळेकर, किशोरी अमोणकर, भक्ती बर्वे- इनामदार, आर. के. लक्ष्मण, कॅप्टन रमेश शर्मा, पंडित सत्यदेव दुबे, प्रभा अत्रे, पंडित बिरजू महाराज, श्रीमती सुलोचना, राम सुतार, रवि परांजपे, रघुनाथ माशेलकर, श्रीपती खंचनाळे, मृणाल गोरे, विजया मेहता, शाहीर साबळे, अब्दुल जब्बार खान, बाबा आढाव, अदूर गोपालकृष्णन, प्रवीण ठिपसे, धनराज पिल्ले, इसाक मुजावर, मोहन आगाशे, सुहास बहुलकर, अनिल अवचट, नाना पाटेकर, कनक रेळे, शशिकुमार दोशी यांसारख्या नामवंतांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला आहे.  गोदावरी गौरवसाठी यापूर्वी ११ हजार रुपये व मानचिन्ह दिले जायचे. त्यात आता रोख रकमेत वाढ करून २१ हजार रुपये व मानचिन्हाचा समावेश आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी १० मार्च २०१८ मध्ये देण्यात येणाºया गोदावरी गौरवसाठी निवडप्रक्रिया लवकरच राबविली जाईल. गोदावरी गौरवच्या या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त प्रतिष्ठानकडून निश्चितच मान्यवरांना जरा हटके कृतज्ञतेचा नमस्कार केला जाईल, अशी आशा बाळगूया. तिघा नाशिककरांचा समावेश जनस्थान पुरस्काराची योजना सुरूझाल्यानंतर आतापर्यंत केवळ बाबूराव बागुल या नाशिककर साहित्यिकालाच ‘जनस्थान’चा बहुमान मिळू शकलेला आहे. २००७ मध्ये बागुल यांना जनस्थानने सन्मानित करण्यात आले होते, तर गोदावरी गौरवही २०१४ पर्यंत नाशिककरांच्या वाट्याला आलेला नव्हता. मागील वर्षी २०१६ मध्ये झालेल्या सोहळ्यात अमेरिकेतील रॅम स्पर्धेत मराठी झेंडा रोवणारे डॉ. हितेंद्र व डॉ. महेंद्र महाजन यांना क्रीडा, साहस या प्रकारांत गोदावरी गौरव प्रदान करण्यात आला होता. महाजन बंधूंच्या रूपाने पहिल्यांदाच नाशिककरांना कृतज्ञतेच्या नमस्काराची प्रत्यक्षानुभूती घेता आली.

टॅग्स :Nashikनाशिक