शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

कृतज्ञतेच्या नमस्काराची पंचविशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:32 IST

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने साहित्येतर क्षेत्रात संस्मरणीय कामगिरी करणाºया आणि देशाची सांस्कृतिक उंची वाढविणाºया ज्येष्ठांना ‘गोदावरी गौरव’ने एक वर्षाआड सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार नव्हे तर कृतज्ञतेचा नमस्कार असल्याचे कुसुमाग्रजांनीच नमूद करून ठेवले आहे. याच कृतज्ञतेच्या नमस्काराला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ वर्षांत ७८ मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला आहे. एक वर्षाआड गौरव करण्यात येत असल्याने २०१८ साल हे पुरस्काराचे १४वे वर्ष असणार आहे. परंतु, २५ वर्षांत आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणाºया अनेक मान्यवरांना अनुभवण्याची संधी त्यानिमित्ताने नाशिककरांना मिळालेली आहे.

धनंजय वाखारे ।नाशिक : नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने साहित्येतर क्षेत्रात संस्मरणीय कामगिरी करणाºया आणि देशाची सांस्कृतिक उंची वाढविणाºया ज्येष्ठांना ‘गोदावरी गौरव’ने एक वर्षाआड सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार नव्हे तर कृतज्ञतेचा नमस्कार असल्याचे कुसुमाग्रजांनीच नमूद करून ठेवले आहे. याच कृतज्ञतेच्या नमस्काराला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ वर्षांत ७८ मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला आहे. एक वर्षाआड गौरव करण्यात येत असल्याने २०१८ साल हे पुरस्काराचे १४वे वर्ष असणार आहे. परंतु, २५ वर्षांत आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणाºया अनेक मान्यवरांना अनुभवण्याची संधी त्यानिमित्ताने नाशिककरांना मिळालेली आहे.  कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर त्यांच्या हयातीतच २६ मार्च १९९० रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर प्रतिष्ठानमार्फत साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल १९९१पासून ‘जनस्थान’, तर १९९२पासून ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार सुरू करण्यात आले. एक वर्षाआड देण्यात येणाºया या पुरस्कारांची योजना आजही अखंडपणे त्यांच्या अनुयायांमार्फत सुरू आहे. त्यात, गोदावरी गौरव हा पुरस्कार नसून तो कृतज्ञतेचा नमस्कार आहे, असे खुद्द कुसुमाग्रजांनीच नमूद करून ठेवल्याने एक वर्षाआड लोकसेवा, संगीत-नृत्य, चित्रपट-नाट्य, ज्ञान-विज्ञान, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प या सहा प्रकारांतील मान्यवरांची निवड करून त्यांना गौरविण्यात येते. १९९२ आणि १९९४ मध्ये चित्र-शिल्प ही वर्गवारी नव्हती. १९९६ पासून चित्र-शिल्प या वर्गवारीचा समावेश करण्यात आला. गेल्या २५ वर्षांत १३ वितरण सोहळे पार पडले आहेत. एका वर्षी जनस्थान आणि एका वर्षी गोदावरी गौरव सोहळा हा नाशिककरांसाठी मोठी मेजवानी ठरत आलेला आहे. अनेक मान्यवरांना त्यानिमित्ताने प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी नाशिककरांना मिळालेली आहे. आतापर्यंत गंगुबाई हनगल, अभिनेता अशोककुमार, डॉ. वसंत गोवारीकर, जे. एफ. रिबेरो, श्रीमती रोहिणी भाटे, गुलजार, डॉ. जयंत नारळीकर, पॉली उम्रीगर, अण्णा हजारे, सुधीर फडके, ऋषिकेश मुखर्जी, माधव सातवळेकर, किशोरी अमोणकर, भक्ती बर्वे- इनामदार, आर. के. लक्ष्मण, कॅप्टन रमेश शर्मा, पंडित सत्यदेव दुबे, प्रभा अत्रे, पंडित बिरजू महाराज, श्रीमती सुलोचना, राम सुतार, रवि परांजपे, रघुनाथ माशेलकर, श्रीपती खंचनाळे, मृणाल गोरे, विजया मेहता, शाहीर साबळे, अब्दुल जब्बार खान, बाबा आढाव, अदूर गोपालकृष्णन, प्रवीण ठिपसे, धनराज पिल्ले, इसाक मुजावर, मोहन आगाशे, सुहास बहुलकर, अनिल अवचट, नाना पाटेकर, कनक रेळे, शशिकुमार दोशी यांसारख्या नामवंतांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला आहे.  गोदावरी गौरवसाठी यापूर्वी ११ हजार रुपये व मानचिन्ह दिले जायचे. त्यात आता रोख रकमेत वाढ करून २१ हजार रुपये व मानचिन्हाचा समावेश आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी १० मार्च २०१८ मध्ये देण्यात येणाºया गोदावरी गौरवसाठी निवडप्रक्रिया लवकरच राबविली जाईल. गोदावरी गौरवच्या या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त प्रतिष्ठानकडून निश्चितच मान्यवरांना जरा हटके कृतज्ञतेचा नमस्कार केला जाईल, अशी आशा बाळगूया. तिघा नाशिककरांचा समावेश जनस्थान पुरस्काराची योजना सुरूझाल्यानंतर आतापर्यंत केवळ बाबूराव बागुल या नाशिककर साहित्यिकालाच ‘जनस्थान’चा बहुमान मिळू शकलेला आहे. २००७ मध्ये बागुल यांना जनस्थानने सन्मानित करण्यात आले होते, तर गोदावरी गौरवही २०१४ पर्यंत नाशिककरांच्या वाट्याला आलेला नव्हता. मागील वर्षी २०१६ मध्ये झालेल्या सोहळ्यात अमेरिकेतील रॅम स्पर्धेत मराठी झेंडा रोवणारे डॉ. हितेंद्र व डॉ. महेंद्र महाजन यांना क्रीडा, साहस या प्रकारांत गोदावरी गौरव प्रदान करण्यात आला होता. महाजन बंधूंच्या रूपाने पहिल्यांदाच नाशिककरांना कृतज्ञतेच्या नमस्काराची प्रत्यक्षानुभूती घेता आली.

टॅग्स :Nashikनाशिक