शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

कृतज्ञतेच्या नमस्काराची पंचविशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:32 IST

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने साहित्येतर क्षेत्रात संस्मरणीय कामगिरी करणाºया आणि देशाची सांस्कृतिक उंची वाढविणाºया ज्येष्ठांना ‘गोदावरी गौरव’ने एक वर्षाआड सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार नव्हे तर कृतज्ञतेचा नमस्कार असल्याचे कुसुमाग्रजांनीच नमूद करून ठेवले आहे. याच कृतज्ञतेच्या नमस्काराला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ वर्षांत ७८ मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला आहे. एक वर्षाआड गौरव करण्यात येत असल्याने २०१८ साल हे पुरस्काराचे १४वे वर्ष असणार आहे. परंतु, २५ वर्षांत आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणाºया अनेक मान्यवरांना अनुभवण्याची संधी त्यानिमित्ताने नाशिककरांना मिळालेली आहे.

धनंजय वाखारे ।नाशिक : नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने साहित्येतर क्षेत्रात संस्मरणीय कामगिरी करणाºया आणि देशाची सांस्कृतिक उंची वाढविणाºया ज्येष्ठांना ‘गोदावरी गौरव’ने एक वर्षाआड सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार नव्हे तर कृतज्ञतेचा नमस्कार असल्याचे कुसुमाग्रजांनीच नमूद करून ठेवले आहे. याच कृतज्ञतेच्या नमस्काराला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ वर्षांत ७८ मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला आहे. एक वर्षाआड गौरव करण्यात येत असल्याने २०१८ साल हे पुरस्काराचे १४वे वर्ष असणार आहे. परंतु, २५ वर्षांत आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणाºया अनेक मान्यवरांना अनुभवण्याची संधी त्यानिमित्ताने नाशिककरांना मिळालेली आहे.  कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर त्यांच्या हयातीतच २६ मार्च १९९० रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर प्रतिष्ठानमार्फत साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल १९९१पासून ‘जनस्थान’, तर १९९२पासून ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार सुरू करण्यात आले. एक वर्षाआड देण्यात येणाºया या पुरस्कारांची योजना आजही अखंडपणे त्यांच्या अनुयायांमार्फत सुरू आहे. त्यात, गोदावरी गौरव हा पुरस्कार नसून तो कृतज्ञतेचा नमस्कार आहे, असे खुद्द कुसुमाग्रजांनीच नमूद करून ठेवल्याने एक वर्षाआड लोकसेवा, संगीत-नृत्य, चित्रपट-नाट्य, ज्ञान-विज्ञान, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प या सहा प्रकारांतील मान्यवरांची निवड करून त्यांना गौरविण्यात येते. १९९२ आणि १९९४ मध्ये चित्र-शिल्प ही वर्गवारी नव्हती. १९९६ पासून चित्र-शिल्प या वर्गवारीचा समावेश करण्यात आला. गेल्या २५ वर्षांत १३ वितरण सोहळे पार पडले आहेत. एका वर्षी जनस्थान आणि एका वर्षी गोदावरी गौरव सोहळा हा नाशिककरांसाठी मोठी मेजवानी ठरत आलेला आहे. अनेक मान्यवरांना त्यानिमित्ताने प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी नाशिककरांना मिळालेली आहे. आतापर्यंत गंगुबाई हनगल, अभिनेता अशोककुमार, डॉ. वसंत गोवारीकर, जे. एफ. रिबेरो, श्रीमती रोहिणी भाटे, गुलजार, डॉ. जयंत नारळीकर, पॉली उम्रीगर, अण्णा हजारे, सुधीर फडके, ऋषिकेश मुखर्जी, माधव सातवळेकर, किशोरी अमोणकर, भक्ती बर्वे- इनामदार, आर. के. लक्ष्मण, कॅप्टन रमेश शर्मा, पंडित सत्यदेव दुबे, प्रभा अत्रे, पंडित बिरजू महाराज, श्रीमती सुलोचना, राम सुतार, रवि परांजपे, रघुनाथ माशेलकर, श्रीपती खंचनाळे, मृणाल गोरे, विजया मेहता, शाहीर साबळे, अब्दुल जब्बार खान, बाबा आढाव, अदूर गोपालकृष्णन, प्रवीण ठिपसे, धनराज पिल्ले, इसाक मुजावर, मोहन आगाशे, सुहास बहुलकर, अनिल अवचट, नाना पाटेकर, कनक रेळे, शशिकुमार दोशी यांसारख्या नामवंतांना कृतज्ञतेचा नमस्कार करण्यात आला आहे.  गोदावरी गौरवसाठी यापूर्वी ११ हजार रुपये व मानचिन्ह दिले जायचे. त्यात आता रोख रकमेत वाढ करून २१ हजार रुपये व मानचिन्हाचा समावेश आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी १० मार्च २०१८ मध्ये देण्यात येणाºया गोदावरी गौरवसाठी निवडप्रक्रिया लवकरच राबविली जाईल. गोदावरी गौरवच्या या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त प्रतिष्ठानकडून निश्चितच मान्यवरांना जरा हटके कृतज्ञतेचा नमस्कार केला जाईल, अशी आशा बाळगूया. तिघा नाशिककरांचा समावेश जनस्थान पुरस्काराची योजना सुरूझाल्यानंतर आतापर्यंत केवळ बाबूराव बागुल या नाशिककर साहित्यिकालाच ‘जनस्थान’चा बहुमान मिळू शकलेला आहे. २००७ मध्ये बागुल यांना जनस्थानने सन्मानित करण्यात आले होते, तर गोदावरी गौरवही २०१४ पर्यंत नाशिककरांच्या वाट्याला आलेला नव्हता. मागील वर्षी २०१६ मध्ये झालेल्या सोहळ्यात अमेरिकेतील रॅम स्पर्धेत मराठी झेंडा रोवणारे डॉ. हितेंद्र व डॉ. महेंद्र महाजन यांना क्रीडा, साहस या प्रकारांत गोदावरी गौरव प्रदान करण्यात आला होता. महाजन बंधूंच्या रूपाने पहिल्यांदाच नाशिककरांना कृतज्ञतेच्या नमस्काराची प्रत्यक्षानुभूती घेता आली.

टॅग्स :Nashikनाशिक