शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

संभाव्य लॉकडाऊनची भीती; स्वस्तात द्राक्ष खरेदीची नीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:53 IST

पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. मात्र पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या एडिट ऑडिओ व बातम्यांच्या अफवांचे संदेश फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हायरल होत असून या अफवांमुळे शेतकरी आपला शेतमाल मिळेल त्या कवडीमोल भावात विकताना दिसत आहेत. त्याचा फायदा व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होताना दिसत असल्याने व्यापाऱ्यांकडून या अफवांना प्रोत्साहन दिले जात असून शेतकऱ्याला लॉकडाऊनची भीती दाखवत द्राक्ष माल खरेदी केला जात आहे .

ठळक मुद्देअफवांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांनाच.

पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. मात्र पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या एडिट ऑडिओ व बातम्यांच्या अफवांचे संदेश फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हायरल होत असून या अफवांमुळे शेतकरी आपला शेतमाल मिळेल त्या कवडीमोल भावात विकताना दिसत आहेत. त्याचा फायदा व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होताना दिसत असल्याने व्यापाऱ्यांकडून या अफवांना प्रोत्साहन दिले जात असून शेतकऱ्याला लॉकडाऊनची भीती दाखवत द्राक्ष माल खरेदी केला जात आहे .जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात नऊ महिन्यापेक्षा अधिक काळ कडक निर्बंध होते. त्यामुळे जनसामान्यांसह सर्व क्षेत्रातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. सर्वांनी काटेकोरपणे नियम पाळल्याने हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. सर्व सुरळीत झाले.

त्या आर्थिक संकटातून सगळे सावरू लागले असताना पुन्हा एकदा त्याचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे नियमित मास्क वापरा ,गर्दीची ठिकाणे टाळा, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा, रात्रीची संचारबंदी, सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी आदी निर्देश शासनाकडून दिले जात आहेत. मात्र पुन्हा पहिल्यासारखे कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पसरविणाऱ्या खोट्या बातम्या, एडिट केलेले ऑडिओ सोशल मीडिया माध्यमातून पसरवल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी,मजूर कामगार, गोरगरीब नागरिकांची धास्ती वाढली. पुन्हा पहिल्यासारखे लॉकडाऊन झाले तर काय परिस्थिती होणार याचा विचार करीत शेतकरी आपला शेतमाल कवडीमोल भावात विकू लागला आहे .कामगार, मजूर, नोकरदार हे पुन्हा बेरोजगार होणार ही भीती वाढली आहे. त्यामुळे या अफवांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांचाच बसणार आहे.लॉकडाऊनच्या अफवांमुळे शेतकरी, दुकानदार ,बांधकाम मजूर, नोकरदार या प्रत्येकाला याचा फटका बसणार आहे. त्यातच मजूर व नोकरदार वर्गाचे पेमेंट अडवले जात असून त्यातही कपात केली जात आहे. कामावरून काढून टाकण्याचे दम भरले जात आहेत. या अफवांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांचाच बसणार आहे त्यामुळे अफवा पसरवणे टाळावे आणि प्रशासनानेही याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांचे पीक मातीमोल केले आणि त्यात आता कोरोनाच्या लॉकडाऊनच्या अफवेची भीती यात व्यापाऱ्यांचाही फायदा होणार आहे. पुन्हा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याच्या षडयंत्राला द्राक्ष उत्पादक बळी पडत आहेत.- अजय गवळी, द्राक्ष उत्पादक

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती