शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

संभाव्य लॉकडाऊनची भीती; स्वस्तात द्राक्ष खरेदीची नीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:53 IST

पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. मात्र पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या एडिट ऑडिओ व बातम्यांच्या अफवांचे संदेश फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हायरल होत असून या अफवांमुळे शेतकरी आपला शेतमाल मिळेल त्या कवडीमोल भावात विकताना दिसत आहेत. त्याचा फायदा व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होताना दिसत असल्याने व्यापाऱ्यांकडून या अफवांना प्रोत्साहन दिले जात असून शेतकऱ्याला लॉकडाऊनची भीती दाखवत द्राक्ष माल खरेदी केला जात आहे .

ठळक मुद्देअफवांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांनाच.

पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. मात्र पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या एडिट ऑडिओ व बातम्यांच्या अफवांचे संदेश फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हायरल होत असून या अफवांमुळे शेतकरी आपला शेतमाल मिळेल त्या कवडीमोल भावात विकताना दिसत आहेत. त्याचा फायदा व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होताना दिसत असल्याने व्यापाऱ्यांकडून या अफवांना प्रोत्साहन दिले जात असून शेतकऱ्याला लॉकडाऊनची भीती दाखवत द्राक्ष माल खरेदी केला जात आहे .जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात नऊ महिन्यापेक्षा अधिक काळ कडक निर्बंध होते. त्यामुळे जनसामान्यांसह सर्व क्षेत्रातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. सर्वांनी काटेकोरपणे नियम पाळल्याने हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. सर्व सुरळीत झाले.

त्या आर्थिक संकटातून सगळे सावरू लागले असताना पुन्हा एकदा त्याचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे नियमित मास्क वापरा ,गर्दीची ठिकाणे टाळा, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा, रात्रीची संचारबंदी, सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी आदी निर्देश शासनाकडून दिले जात आहेत. मात्र पुन्हा पहिल्यासारखे कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पसरविणाऱ्या खोट्या बातम्या, एडिट केलेले ऑडिओ सोशल मीडिया माध्यमातून पसरवल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी,मजूर कामगार, गोरगरीब नागरिकांची धास्ती वाढली. पुन्हा पहिल्यासारखे लॉकडाऊन झाले तर काय परिस्थिती होणार याचा विचार करीत शेतकरी आपला शेतमाल कवडीमोल भावात विकू लागला आहे .कामगार, मजूर, नोकरदार हे पुन्हा बेरोजगार होणार ही भीती वाढली आहे. त्यामुळे या अफवांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांचाच बसणार आहे.लॉकडाऊनच्या अफवांमुळे शेतकरी, दुकानदार ,बांधकाम मजूर, नोकरदार या प्रत्येकाला याचा फटका बसणार आहे. त्यातच मजूर व नोकरदार वर्गाचे पेमेंट अडवले जात असून त्यातही कपात केली जात आहे. कामावरून काढून टाकण्याचे दम भरले जात आहेत. या अफवांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांचाच बसणार आहे त्यामुळे अफवा पसरवणे टाळावे आणि प्रशासनानेही याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांचे पीक मातीमोल केले आणि त्यात आता कोरोनाच्या लॉकडाऊनच्या अफवेची भीती यात व्यापाऱ्यांचाही फायदा होणार आहे. पुन्हा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याच्या षडयंत्राला द्राक्ष उत्पादक बळी पडत आहेत.- अजय गवळी, द्राक्ष उत्पादक

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती