शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संभाव्य लॉकडाऊनची भीती; स्वस्तात द्राक्ष खरेदीची नीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:53 IST

पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. मात्र पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या एडिट ऑडिओ व बातम्यांच्या अफवांचे संदेश फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हायरल होत असून या अफवांमुळे शेतकरी आपला शेतमाल मिळेल त्या कवडीमोल भावात विकताना दिसत आहेत. त्याचा फायदा व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होताना दिसत असल्याने व्यापाऱ्यांकडून या अफवांना प्रोत्साहन दिले जात असून शेतकऱ्याला लॉकडाऊनची भीती दाखवत द्राक्ष माल खरेदी केला जात आहे .

ठळक मुद्देअफवांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांनाच.

पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. मात्र पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या एडिट ऑडिओ व बातम्यांच्या अफवांचे संदेश फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हायरल होत असून या अफवांमुळे शेतकरी आपला शेतमाल मिळेल त्या कवडीमोल भावात विकताना दिसत आहेत. त्याचा फायदा व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात होताना दिसत असल्याने व्यापाऱ्यांकडून या अफवांना प्रोत्साहन दिले जात असून शेतकऱ्याला लॉकडाऊनची भीती दाखवत द्राक्ष माल खरेदी केला जात आहे .जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात नऊ महिन्यापेक्षा अधिक काळ कडक निर्बंध होते. त्यामुळे जनसामान्यांसह सर्व क्षेत्रातील नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. सर्वांनी काटेकोरपणे नियम पाळल्याने हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. सर्व सुरळीत झाले.

त्या आर्थिक संकटातून सगळे सावरू लागले असताना पुन्हा एकदा त्याचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे नियमित मास्क वापरा ,गर्दीची ठिकाणे टाळा, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा, रात्रीची संचारबंदी, सार्वजनिक कार्यक्रमाला बंदी आदी निर्देश शासनाकडून दिले जात आहेत. मात्र पुन्हा पहिल्यासारखे कडक लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पसरविणाऱ्या खोट्या बातम्या, एडिट केलेले ऑडिओ सोशल मीडिया माध्यमातून पसरवल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी,मजूर कामगार, गोरगरीब नागरिकांची धास्ती वाढली. पुन्हा पहिल्यासारखे लॉकडाऊन झाले तर काय परिस्थिती होणार याचा विचार करीत शेतकरी आपला शेतमाल कवडीमोल भावात विकू लागला आहे .कामगार, मजूर, नोकरदार हे पुन्हा बेरोजगार होणार ही भीती वाढली आहे. त्यामुळे या अफवांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांचाच बसणार आहे.लॉकडाऊनच्या अफवांमुळे शेतकरी, दुकानदार ,बांधकाम मजूर, नोकरदार या प्रत्येकाला याचा फटका बसणार आहे. त्यातच मजूर व नोकरदार वर्गाचे पेमेंट अडवले जात असून त्यातही कपात केली जात आहे. कामावरून काढून टाकण्याचे दम भरले जात आहेत. या अफवांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांसह मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांचाच बसणार आहे त्यामुळे अफवा पसरवणे टाळावे आणि प्रशासनानेही याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.अवकाळी पावसाने आधीच शेतकऱ्यांचे पीक मातीमोल केले आणि त्यात आता कोरोनाच्या लॉकडाऊनच्या अफवेची भीती यात व्यापाऱ्यांचाही फायदा होणार आहे. पुन्हा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याच्या षडयंत्राला द्राक्ष उत्पादक बळी पडत आहेत.- अजय गवळी, द्राक्ष उत्पादक

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती