शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

उन्हाळी कांदा उत्पादन घटण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:50 IST

उमराणे : कसमादे पट्ट्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकावर ऐन गळतीच्या वेळेस करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच विहिरींनी तळ गाठल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांदा उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकरपा रोगाचा प्रादुर्भाव : पाणीटंचाईमुळेही होणार परिणाम

उमराणे : कसमादे पट्ट्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकावर ऐन गळतीच्या वेळेस करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच विहिरींनी तळ गाठल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांदा उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.उन्हाळी कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना चालू वर्षी बियाणे मिळविण्यापासून ते रोपे टाकणीपर्यंत व लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध संकटांना तोंड देण्याची वेळ आली आहे. उन्हाळी कांदा लागवडीसाठी सुरुवातीस बहुतांश शेतकऱ्यांजवळ घरगुती बियाणे असल्याने लवकर रोपे तयार व्हावीत, यासाठी लवकर बियाणे पेरणी केली होती. मात्र त्या वेळेस सततच्या पावसामुळे ही रोपे उगवण्याआधीच खराब झाली होती. परिणामी दुसऱ्यांदा रोपे तयार करण्यासाठी घरगुती बियाणे शिल्लक नसल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे बियाणे मिळेल त्या भावात खरेदी करून पुन्हा रोपे तयार केली होती; परंतु बहुतांश कंपनीचे बियाणे खराब निघाल्याने उगवण क्षमतेवर परिणाम होऊन लागवडीवर याचा विपरीत परिणाम झाला होता. या परिस्थितीवर मात करीत कशाबशा लागवडी पूर्ण केल्या. मात्र, उन्हाळी कांदे म्हणून लागवड केलेले बहुतांश कांदे लाल निघाल्याने उन्हाळी कांद्यांचे क्षेत्र आपसूकच कमी झाले. त्यानंतर उर्वरित उन्हाळी कांदा पीक जोमात असताना गेल्या तीन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. या संकटातून काहीअंशी वाचलेल्या कांद्यांचे उत्पादन तरी पदरात पडेल अशी अपेक्षा असतानाच झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे ऐन गळतीच्या उंबरठ्यावर असलेल्या कांदा पिकावर अवघ्या आठ दिवसांतच करपा रोगाने थैमान घातले आहे.उशिरा झालेल्या लागवडीमुळे ऐन कांदा काढणीच्या महिनाभर आधीच विहिरींनी तळ गाठल्याने कमी चालू वर्षी उन्हाळी कांदा लागवडीसाठी महागडे कांदा बियाणे, तणनाशके, रासायनिक खते, लागवड, निंदणी, कांदा काढणी, आदींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. असे असतानाच ऐन कांदा गळतीवेळी अवकाळी पाऊस व करपा रोगामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. परिणामी हा कांदा बाधित झाल्याने चाळीत साठवणुकीऐवजी विक्री करावा लागणार आहे.- संभाजी देवरे, शेतकरीकांद्याची प्रतवारी घसरलीमागील वर्षी उन्हाळी कांद्यांचे उत्पादन चांगले असल्याने सुरुवातीस कमी बाजारभावाअभावी बहुतांश शेतकऱ्यांनी आगामी काळात भाव मिळेल या अपेक्षेपोटी कांदा माल चाळींमध्ये साठवणूक केला होता. मात्र या वर्षी ऐन कांदा गळतीवेळी बहुतांश ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने शिवाय करपा रोग व नंतर पाणीटंचाई, आदी कारणांमुळे उत्पादनात काही अंशी घट येण्याची शक्यता असून, कांद्यांची प्रतवारी घसरल्याने चाळींमध्ये कांदा साठवणुकीवरही याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे मत शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा