शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी कांदा उत्पादन घटण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:50 IST

उमराणे : कसमादे पट्ट्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकावर ऐन गळतीच्या वेळेस करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच विहिरींनी तळ गाठल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांदा उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकरपा रोगाचा प्रादुर्भाव : पाणीटंचाईमुळेही होणार परिणाम

उमराणे : कसमादे पट्ट्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकावर ऐन गळतीच्या वेळेस करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच विहिरींनी तळ गाठल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांदा उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.उन्हाळी कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना चालू वर्षी बियाणे मिळविण्यापासून ते रोपे टाकणीपर्यंत व लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध संकटांना तोंड देण्याची वेळ आली आहे. उन्हाळी कांदा लागवडीसाठी सुरुवातीस बहुतांश शेतकऱ्यांजवळ घरगुती बियाणे असल्याने लवकर रोपे तयार व्हावीत, यासाठी लवकर बियाणे पेरणी केली होती. मात्र त्या वेळेस सततच्या पावसामुळे ही रोपे उगवण्याआधीच खराब झाली होती. परिणामी दुसऱ्यांदा रोपे तयार करण्यासाठी घरगुती बियाणे शिल्लक नसल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे बियाणे मिळेल त्या भावात खरेदी करून पुन्हा रोपे तयार केली होती; परंतु बहुतांश कंपनीचे बियाणे खराब निघाल्याने उगवण क्षमतेवर परिणाम होऊन लागवडीवर याचा विपरीत परिणाम झाला होता. या परिस्थितीवर मात करीत कशाबशा लागवडी पूर्ण केल्या. मात्र, उन्हाळी कांदे म्हणून लागवड केलेले बहुतांश कांदे लाल निघाल्याने उन्हाळी कांद्यांचे क्षेत्र आपसूकच कमी झाले. त्यानंतर उर्वरित उन्हाळी कांदा पीक जोमात असताना गेल्या तीन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. या संकटातून काहीअंशी वाचलेल्या कांद्यांचे उत्पादन तरी पदरात पडेल अशी अपेक्षा असतानाच झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे ऐन गळतीच्या उंबरठ्यावर असलेल्या कांदा पिकावर अवघ्या आठ दिवसांतच करपा रोगाने थैमान घातले आहे.उशिरा झालेल्या लागवडीमुळे ऐन कांदा काढणीच्या महिनाभर आधीच विहिरींनी तळ गाठल्याने कमी चालू वर्षी उन्हाळी कांदा लागवडीसाठी महागडे कांदा बियाणे, तणनाशके, रासायनिक खते, लागवड, निंदणी, कांदा काढणी, आदींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. असे असतानाच ऐन कांदा गळतीवेळी अवकाळी पाऊस व करपा रोगामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. परिणामी हा कांदा बाधित झाल्याने चाळीत साठवणुकीऐवजी विक्री करावा लागणार आहे.- संभाजी देवरे, शेतकरीकांद्याची प्रतवारी घसरलीमागील वर्षी उन्हाळी कांद्यांचे उत्पादन चांगले असल्याने सुरुवातीस कमी बाजारभावाअभावी बहुतांश शेतकऱ्यांनी आगामी काळात भाव मिळेल या अपेक्षेपोटी कांदा माल चाळींमध्ये साठवणूक केला होता. मात्र या वर्षी ऐन कांदा गळतीवेळी बहुतांश ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने शिवाय करपा रोग व नंतर पाणीटंचाई, आदी कारणांमुळे उत्पादनात काही अंशी घट येण्याची शक्यता असून, कांद्यांची प्रतवारी घसरल्याने चाळींमध्ये कांदा साठवणुकीवरही याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे मत शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा