शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

उन्हाळी कांदा उत्पादन घटण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:50 IST

उमराणे : कसमादे पट्ट्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकावर ऐन गळतीच्या वेळेस करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच विहिरींनी तळ गाठल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांदा उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकरपा रोगाचा प्रादुर्भाव : पाणीटंचाईमुळेही होणार परिणाम

उमराणे : कसमादे पट्ट्यातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकावर ऐन गळतीच्या वेळेस करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तसेच विहिरींनी तळ गाठल्याने उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे उन्हाळी कांदा उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.उन्हाळी कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना चालू वर्षी बियाणे मिळविण्यापासून ते रोपे टाकणीपर्यंत व लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध संकटांना तोंड देण्याची वेळ आली आहे. उन्हाळी कांदा लागवडीसाठी सुरुवातीस बहुतांश शेतकऱ्यांजवळ घरगुती बियाणे असल्याने लवकर रोपे तयार व्हावीत, यासाठी लवकर बियाणे पेरणी केली होती. मात्र त्या वेळेस सततच्या पावसामुळे ही रोपे उगवण्याआधीच खराब झाली होती. परिणामी दुसऱ्यांदा रोपे तयार करण्यासाठी घरगुती बियाणे शिल्लक नसल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही कंपनीचे बियाणे मिळेल त्या भावात खरेदी करून पुन्हा रोपे तयार केली होती; परंतु बहुतांश कंपनीचे बियाणे खराब निघाल्याने उगवण क्षमतेवर परिणाम होऊन लागवडीवर याचा विपरीत परिणाम झाला होता. या परिस्थितीवर मात करीत कशाबशा लागवडी पूर्ण केल्या. मात्र, उन्हाळी कांदे म्हणून लागवड केलेले बहुतांश कांदे लाल निघाल्याने उन्हाळी कांद्यांचे क्षेत्र आपसूकच कमी झाले. त्यानंतर उर्वरित उन्हाळी कांदा पीक जोमात असताना गेल्या तीन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले. या संकटातून काहीअंशी वाचलेल्या कांद्यांचे उत्पादन तरी पदरात पडेल अशी अपेक्षा असतानाच झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे ऐन गळतीच्या उंबरठ्यावर असलेल्या कांदा पिकावर अवघ्या आठ दिवसांतच करपा रोगाने थैमान घातले आहे.उशिरा झालेल्या लागवडीमुळे ऐन कांदा काढणीच्या महिनाभर आधीच विहिरींनी तळ गाठल्याने कमी चालू वर्षी उन्हाळी कांदा लागवडीसाठी महागडे कांदा बियाणे, तणनाशके, रासायनिक खते, लागवड, निंदणी, कांदा काढणी, आदींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. असे असतानाच ऐन कांदा गळतीवेळी अवकाळी पाऊस व करपा रोगामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. परिणामी हा कांदा बाधित झाल्याने चाळीत साठवणुकीऐवजी विक्री करावा लागणार आहे.- संभाजी देवरे, शेतकरीकांद्याची प्रतवारी घसरलीमागील वर्षी उन्हाळी कांद्यांचे उत्पादन चांगले असल्याने सुरुवातीस कमी बाजारभावाअभावी बहुतांश शेतकऱ्यांनी आगामी काळात भाव मिळेल या अपेक्षेपोटी कांदा माल चाळींमध्ये साठवणूक केला होता. मात्र या वर्षी ऐन कांदा गळतीवेळी बहुतांश ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने शिवाय करपा रोग व नंतर पाणीटंचाई, आदी कारणांमुळे उत्पादनात काही अंशी घट येण्याची शक्यता असून, कांद्यांची प्रतवारी घसरल्याने चाळींमध्ये कांदा साठवणुकीवरही याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे मत शेतीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा