शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादन घटण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:09 IST

दिंडोरी/लखमापूर: बियाणांच्या टंचाईमुळे यंदा कांदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त केली जात असून त्यामुळे बळीराजावर चिंतेचे सावट पसरले आहे.

ठळक मुद्देबियाणांची टंचाई : बळीराजावर चिंतेचे सावट

दिंडोरी/लखमापूर: बियाणांच्या टंचाईमुळे यंदा कांदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त केली जात असून त्यामुळे बळीराजावर चिंतेचे सावट पसरले आहे.सध्या शेतकरी वर्गाला कांदा पिकं घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. बियाणे व रोपे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्यात अथवा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांची मोठ्या प्रमाणावर पायपीट करावी लागत आहे. यंदा पावसाने आपला लहरीपणा दाखवत,कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडल्यामुळे कांदा पिकांचे रोपे यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने कांदा हंगामासाठी रोपे मिळविणे अंत्यत अवघड होऊन बसले आहे.बरीच ठिकाणे शेती पिकाची स्थिती पाऊस, वातावरणातील बदल, कोरोना ची स्थिती यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे काही पिकांची रोपे अथवा बियाने मिळविणे म्हणजे तारे वरची कसरत झाली आहे. त्यामुळे पावसाच्या लहरी पणाचा फटका कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात बसण्याची व उत्पन्न वाढीसाठी बसेल. अशी परिस्थिती दिंडोरी तालुक्यात निर्माण झाली आहे. कांदा लागवडीसाठी तयार करण्यात आलेली रोपे पुर्ण नष्ट झाल्याने रोपे उपलब्ध होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी वर्गासमोर रोपे टंचाई हे नवीन संकट आ वासून उभे राहिले आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी उपलब्ध केलेल्या कांदा बियाने आणून, तसेच घरच्या घरी आपल्या शेतामध्ये गादी वाफा तयार करून रोपे तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु अती पावसाने बियाने व रोपे पुर्णपणे सडून केल्याने कांदा लागवडी वर त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.-लागवडी बरोबर उत्पादन खर्च देखील वाढणार ?यंदा जर योगायोगाने बियाने व रोपे जर मिळाली तर त्यासाठी किंमत अव्वाच्या सव्वा मोजावी लागले . बियाणे व रोपे मिळवण्यासाठी शेतकरी वर्गाला मोठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे कांदा उत्पादन घेण्यासाठी भांडवल मोठ्या प्रमाणावर खर्च होणार असल्यामुळे शेतकरी वर्ग व्दिधा अवस्थेत सापडला आहे. (१२लखमापूर)-यंदा प्रथमच कांदा पिकांचे बियाने व रोपे मिळवण्यासाठी आम्हाला पायपीट करावी लागत आहे. यंदा ही टंचाई निर्माण झाल्याने आमच्या हातातून कांदा पिक जाते की काय. यांची भीती निर्माण झाली आहे.कारण या कांदा पिकावर आमच्या सर्व आशा असतात.त्या आशा यंदा मावळ्याची चित्र तयार झाले आहे.-सचिन गणपत शिंदे,आडगावकर

 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी