शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

मतदारांमध्ये नागरिकत्व कायद्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 02:02 IST

नागरिकत्व कायद्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नाचा फटका जिल्ह्णातील निवडणूक शाखेलाही बसत आहे. सध्या मतदार पडताळणीचे काम सुरू असल्याने घरोघरी जाणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांना कागदपत्रे दाखविली जात नसल्याने मालेगाव मध्य सारख्या मतदारसंघातून अद्यापही मतदारपडताळणीचे अपेक्षित कामकाज होऊ शकले नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देआधार कार्डही दाखवेना मालेगावमध्ये मतदार पडताळणी मोहिमेला अडचण

नाशिक : नागरिकत्व कायद्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नाचा फटका जिल्ह्णातील निवडणूक शाखेलाही बसत आहे. सध्या मतदार पडताळणीचे काम सुरू असल्याने घरोघरी जाणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांना कागदपत्रे दाखविली जात नसल्याने मालेगाव मध्य सारख्या मतदारसंघातून अद्यापही मतदारपडताळणीचे अपेक्षित कामकाज होऊ शकले नसल्याची बाब समोर आली आहे.लोकसभा आणि विधनासभा निवडणुकांनंतर जिल्ह्यातील मतदारांची पडताळणी करण्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आखून दिलेला असून, जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये बीएलओंच्या माध्यमातून मतदारांची आॅनलाइन पडताळणी केली जात आहे. यासाठी आवश्यक असणारे आधार कार्ड, रहिवासी पुरावा, तसेच भ्रमणध्वनी क्रमांकाची मागणी केली जात आहे. परंतु नागरिकत्व कायद्यासाठी या माहितीचा उपयोग केला जात असल्याच्या समजुतीने मालेगाव मध्य मतदारसंघातील रहिवाशांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्णातील अन्य तालुक्यांपेक्षा मालेगाव मध्यमधील मतदार पडताळणीचे कामकाज अवघे ५४ टक्के इतकेच झाले आहे. येत्या २० फेब्रुवारीपर्यंत पडताळणीचे कामकाज पूर्ण करावयाचे असल्याने सदर काम पूर्ण होण्यास अडचण निर्माण झालीआहे.देशभरात सध्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने केली जात आहेत. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी एकही पुरावा दिला जाणार नाही, अशी भूमिका घेत या कायद्याला तीव्र विरोध करण्यात येत आहे. अशातच मतदार पडताळणीचे कामकाजही हाती घेण्यात आल्यामुळे मालेगावसारख्या शहरात या मोहिमेविषयी शंका उपस्थित करून नागरिक पडताळणीच्या कामाला सहकार्य करीत असल्याची बाब समोर आली आहे. मतदान कर्मचाºयांनीदेखील आपला अनुभव सांगताना मालेगाव मध्यमध्ये कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे सांगितले जाते.मालेगाव मध्य मतदारसंघात पडताळणी मोहिमेसाठी जाणाºया मतदार अधिकाºयांना अल्पसंख्याक मतदारांकडून सहकार्य मिळत नसल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. अवघे ५४ टक्के कामकाज झाल्याचा जाब निवडणूक शाखेने विचारल्यानंतर स्थानिक मतदारांकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न आणि असहकाराची भावना समोर आली. यातून मार्ग काढण्यासाठी आता विचारविनिमय केला जात आहे.यंत्रणा सापडली कात्रीतया मोहिमेत मतदारांचा सहभाग वाढण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेला आता प्रयत्न करावे लागणार आहे. मतदारांमधील संभ्रम दूर होणे अपेक्षित असून, तसे झाले नाही तर या गैरसमजातून अन्य मतदारसंघातूनदेखील असहकार येऊ शकतो. एकीकडे बीएलओंवर पडताळणीचे काम करण्याची सक्ती असताना दुसरीकडे अल्पसंख्याक मतदारांचा असहकार अशा कात्रीत यंत्रणा अडकली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयVotingमतदान