शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गिरणारे-हरसूल रस्त्यावर जीवघेणी प्रवाशी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 15:10 IST

पश्चीम भागात प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे असे प्रकार ग्रामीण भागात दरररोज घडत असल्यामुळे बसच्या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. या पट्टयात खाजगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे

ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : प्रवाशांच्या जीवाशी घातक खेळ प्रवाशांना जनावरांप्रमाणे वाहनात कोंबून दिवसाढवळ्या सर्रास वाहतूक

नााशिक - नााशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गिरणारे - हरसूल या ग्रामीण भागातील रस्त्यांवर रोज हजारोंच्या संख्येने खासगी वाहनातून बेकायदेशीरपणे प्रवशांची जीवघेणी वाहतूक केली जात असून, ती रोखण्यासाठी ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच कुठे दिसत नाही. प्रवाशांना जनावरांप्रमाणे वाहनात कोंबून दिवसाढवळ्या सर्रास वाहतूक सुरु असल्याने या अवैध वाहतुकीला कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पश्चीम भागात प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे असे प्रकार ग्रामीण भागात दरररोज घडत असल्यामुळे बसच्या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. या पट्टयात खाजगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. गुजरात सिमेवरील वाडा, पडसंन , खरशेत, ओझरखेड, भागापासून ते हरसूल, गिरणारे पट्ट्यातील गोर गरीब आदीवासी मजूर, विद्यार्थी नाशिक व गिरणारे हर्सूल या ठिकाणी रोजगार, शिक्षण, बाजार व खाजगी कामासाठी दररोज ये-जा करतात. अशा वेळी थेट टॅक्सी, जीपला मागे लटकून किंवा वर टपावर बसवून प्रवाशांची वाहतूक केली जाते. वाहनांमध्ये प्रवासी अक्षरश: कोंबून भरलेले असतात. अशा प्रकारच्या वाहनांना एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते. नंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. वाहतूक पोलीस आणि नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे संबंधामुळेच हे सुरू असून, बºयाच खाजगी गाडयांना वाहन विमा नसल्याने, तसेच बरीच वाहने नादुरुस्त असतानाही चालविली जातात. मात्र प्रादेशिक परिवहन विभागाचे फिटनेस प्रमाणपत्र देखील कधी तपासले जात नाही. त्यामुळे कागदपत्रांची अपूर्तता असल्यास एखादा प्रवासी अपघातात दगावला तर वेळप्रसंगी त्याला विमा कंपनीकडून विमा नाकारला जातो. परंतु याची काळजी प्रवाशी वाहतूक करणाºयांना नसून, प्रवाशीही कमी पैशात प्रवास होतो म्हणून या खासगी वाहतुकीला प्राधान्य देत आहे. या भागातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता, एस. टी. महामंडळानेच दर अर्धातासाला गाड्यांचे नियोजन करावे अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक