शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

गिरणारे-हरसूल रस्त्यावर जीवघेणी प्रवाशी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 15:10 IST

पश्चीम भागात प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे असे प्रकार ग्रामीण भागात दरररोज घडत असल्यामुळे बसच्या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. या पट्टयात खाजगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे

ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : प्रवाशांच्या जीवाशी घातक खेळ प्रवाशांना जनावरांप्रमाणे वाहनात कोंबून दिवसाढवळ्या सर्रास वाहतूक

नााशिक - नााशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गिरणारे - हरसूल या ग्रामीण भागातील रस्त्यांवर रोज हजारोंच्या संख्येने खासगी वाहनातून बेकायदेशीरपणे प्रवशांची जीवघेणी वाहतूक केली जात असून, ती रोखण्यासाठी ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच कुठे दिसत नाही. प्रवाशांना जनावरांप्रमाणे वाहनात कोंबून दिवसाढवळ्या सर्रास वाहतूक सुरु असल्याने या अवैध वाहतुकीला कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पश्चीम भागात प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे असे प्रकार ग्रामीण भागात दरररोज घडत असल्यामुळे बसच्या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. या पट्टयात खाजगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. गुजरात सिमेवरील वाडा, पडसंन , खरशेत, ओझरखेड, भागापासून ते हरसूल, गिरणारे पट्ट्यातील गोर गरीब आदीवासी मजूर, विद्यार्थी नाशिक व गिरणारे हर्सूल या ठिकाणी रोजगार, शिक्षण, बाजार व खाजगी कामासाठी दररोज ये-जा करतात. अशा वेळी थेट टॅक्सी, जीपला मागे लटकून किंवा वर टपावर बसवून प्रवाशांची वाहतूक केली जाते. वाहनांमध्ये प्रवासी अक्षरश: कोंबून भरलेले असतात. अशा प्रकारच्या वाहनांना एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते. नंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. वाहतूक पोलीस आणि नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे संबंधामुळेच हे सुरू असून, बºयाच खाजगी गाडयांना वाहन विमा नसल्याने, तसेच बरीच वाहने नादुरुस्त असतानाही चालविली जातात. मात्र प्रादेशिक परिवहन विभागाचे फिटनेस प्रमाणपत्र देखील कधी तपासले जात नाही. त्यामुळे कागदपत्रांची अपूर्तता असल्यास एखादा प्रवासी अपघातात दगावला तर वेळप्रसंगी त्याला विमा कंपनीकडून विमा नाकारला जातो. परंतु याची काळजी प्रवाशी वाहतूक करणाºयांना नसून, प्रवाशीही कमी पैशात प्रवास होतो म्हणून या खासगी वाहतुकीला प्राधान्य देत आहे. या भागातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता, एस. टी. महामंडळानेच दर अर्धातासाला गाड्यांचे नियोजन करावे अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक