शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कोरोना सावटातही शेतीची कामे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 20:46 IST

सिन्नर : कोरोनाचे थैमान जिल्ह्यात सुरूच असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती येत्या काही दिवसात नियंत्रणात आली नाही तर त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी कोरोनाच्या सावटातही शेती मशागतीची कामे सुरु केलेली आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतित : अशीच स्थिती अजून राहिल्यास खरीप हंगामावर परिणामाची शक्यता

सचिन सांगळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोनाचे थैमान जिल्ह्यात सुरूच असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती येत्या काही दिवसात नियंत्रणात आली नाही तर त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी कोरोनाच्या सावटातही शेती मशागतीची कामे सुरु केलेली आहे.ग्रामीण भागात एकीकडे कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाउनमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते किंवा बियाणे खरेदी करताना अडचणी येणार नाही, परंतु कोरोनाचा उद्रेक वाढत राहिला तर शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी खरीप हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या ग्रामीण भागात शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहे.रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर कोरोनाचा राज्यात शिरकाव झाला आहे. आगामी काळातील शेतीच्या कामांसाठी शेतकºयांची धावपळ सुरू झालेली आहे. साधारत: मे महिन्याच्या शेवटी शेतकरी खते आणि बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी करीत असतात. यासाठी अजून जवळपास दोन आठवड्यांचा कालावधी शेतकºयांच्या हाती आहे, मात्र या तीन आठवड्यात महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल का या प्रश्नाचे उत्तर अद्याप तरी अनुत्तरित आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने शेती शिवारात शेतकºयांची लगबग वाढली आहे. दरम्यान या महिन्यात कोरोना आटोक्यात आला नाही तर शेती व्यवसायाची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे ही अवस्था असताना दुसरीकडे कृषी साहित्य विक्र ी करणारे चिंतेत आहेत. यावर्षी शेतकºयांना लाल कांद्याचे उत्पन्न कमी झाल्याने बळीराजा संकटात आहे. तर काही शेतकरी कांद्यास दर नसल्याने उन्हाळ कांद्याची साठवणूक करीत असल्याचे ग्रामीण भागात चित्र आहे. पासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीसिन्नर तालुक्यात खरिपाची पेरणी जवळपास पासष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर होत असते. यात सर्वाधिक म्हणजे २८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. तर १४ हजार हेक्टरवर बाजरी, आठ हेक्टरवर ऊस तर एक हजार हेक्टरवर कपाशीची लागवड केली जात असल्याचे कृषी विभागाने सांगितले. यावर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे ग्रामीण भागातील शेतकºयांनी नांगरणी, वखरणी, जमीन सपाटीकरण आदी कामे उरकली जात आहे.संकटाची मालिका सुरूचगेल्या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत पाऊस झाल्याने, खरिपाचे अपेक्षित उत्पन्न आले नाही. यात बाजरी, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चांगल्या प्रमाणात पाऊस होऊनही रब्बी हंगामातही पाहिजे तशी पिके आली नाही. गहू, सोयाबीन, मका, कांदा तसेच भाजीपाला पिकांना चांगला दर मिळाला नाही. तर आता कोरोनामुळे शेतकºयांना आपला पिकलेला मालही बाजारापर्यंत नेता येत नाही, अशी स्थिती आहे. दोन वर्षांपासून बळीराजासमोर संकटांची मालिका सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी