शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

येवल्यातील शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 17:43 IST

जळगाव नेऊर : पालखेड कालवा सल्लागार समितीच्या अकरा डिसेंबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार बैठकीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन शेतकर्‍यांच्या गरजा व मागणी विचारात घेऊन पाणी आवर्तनाचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या.

ठळक मुद्देरब्बीची पिके : तारखा जाहीर न केल्याने शेतकरी संभ्रमात

जळगाव नेऊर : पालखेड कालवा सल्लागार समितीच्या अकरा डिसेंबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार बैठकीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन शेतकर्‍यांच्या गरजा व मागणी विचारात घेऊन पाणी आवर्तनाचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या.पण कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन पंधरा दिवस उलटूनही पाणी आवर्तनाबाबत कोणत्याही तारखा जाहीर न झाल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहे,कारण ११ डिसेंबर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन पालखेड डावा कालव्याला दोन आवर्तनाची घोषणा करण्यात आली, पण तारखा जाहीर न झाल्याने व पाणी मागणी अर्जाची मुदत ३० डिसेंबर पर्यंत असल्याने पालखेड डावा कालव्याचे आवर्तन केव्हा येणार ? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे,याबाबत पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांची पाण्याची मागणी नसल्याने आवर्तनाबाबत निर्णय घेता येत नसल्याचे सांगण्यात आले . येवला पश्चिम भागातील चारी क्रमांक,२८ व २९ वरील तसेच कालव्यालगत अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठल्याने रब्बीची पिके आवर्तनाच्या प्रतीक्षेत असुन जानेवारीच्या सुरुवातीला आवर्तन सोडण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे . कारण आवर्तन सुटल्यानंतरही पाणी अगोदर पूर्व भागात जाणार असल्याने व नंतर पश्चिम भागात पाणी सुटणार असल्याने त्यामध्ये पंधरा दिवसाचा कालावधी लोटणार असल्याने पाणी लवकर सुटल्यास शेतकऱ्यांचे कांदा,गहू, हरभरा, मका या पिकांना मदत होणार आहे.यावर्षी परतीचा पाऊस जास्त दिवस लांबल्याने शेतकऱ्यांची रब्बीची पिके उशीरा झाली, नदीलगत शेतकऱ्यांना पाणी आहे पण मोठ्या प्रमाणात शेतकरी पाटाच्या पाण्यावर अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांची पिके आवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे.प्रतिक्रिया...आमच्या २८ नंबर वितरिकेवर बहुतेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला असून ऐन मोसमात पाणी कमी पडल्याने शेतकऱ्यांची पिके कोमेजली आहे. तर काहींच्या कांदा लागवडी खोळंबल्या आहे. शेतकऱ्यांची आता सर्व आशा पालखेड डावा कालव्यावर आहे तरी पाटबंधारे खात्याने जानेवारीच्या सुरुवातीला आवर्तन दिल्यास गहु, हरभरा, कांदा पिकांना फायदा होणार आहे.- मल्हारी दराडे, अध्यक्ष मतोबा पाणीवापर संस्था.कालवा सल्लागार समितीच्या मीटिंगमध्ये २० जानेवारी च्या आसपास पाणी आवर्तन सोडण्याबाबत चर्चा झाली असून पाणी वापर संस्थांनी अर्ज भरून मागणी केल्यास त्या अगोदरही पाणी आवर्तनाबाबत विचार केला जाईल.- संभाजी पाटील, अभियंता पाटबंधारे उपविभाग, येवला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती