शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

येवल्यातील शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 17:43 IST

जळगाव नेऊर : पालखेड कालवा सल्लागार समितीच्या अकरा डिसेंबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार बैठकीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन शेतकर्‍यांच्या गरजा व मागणी विचारात घेऊन पाणी आवर्तनाचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या.

ठळक मुद्देरब्बीची पिके : तारखा जाहीर न केल्याने शेतकरी संभ्रमात

जळगाव नेऊर : पालखेड कालवा सल्लागार समितीच्या अकरा डिसेंबर रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्या कालवा सल्लागार बैठकीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन शेतकर्‍यांच्या गरजा व मागणी विचारात घेऊन पाणी आवर्तनाचे रब्बी व उन्हाळ्यासाठी नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या होत्या.पण कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन पंधरा दिवस उलटूनही पाणी आवर्तनाबाबत कोणत्याही तारखा जाहीर न झाल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहे,कारण ११ डिसेंबर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक होऊन पालखेड डावा कालव्याला दोन आवर्तनाची घोषणा करण्यात आली, पण तारखा जाहीर न झाल्याने व पाणी मागणी अर्जाची मुदत ३० डिसेंबर पर्यंत असल्याने पालखेड डावा कालव्याचे आवर्तन केव्हा येणार ? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे,याबाबत पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांची पाण्याची मागणी नसल्याने आवर्तनाबाबत निर्णय घेता येत नसल्याचे सांगण्यात आले . येवला पश्चिम भागातील चारी क्रमांक,२८ व २९ वरील तसेच कालव्यालगत अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठल्याने रब्बीची पिके आवर्तनाच्या प्रतीक्षेत असुन जानेवारीच्या सुरुवातीला आवर्तन सोडण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे . कारण आवर्तन सुटल्यानंतरही पाणी अगोदर पूर्व भागात जाणार असल्याने व नंतर पश्चिम भागात पाणी सुटणार असल्याने त्यामध्ये पंधरा दिवसाचा कालावधी लोटणार असल्याने पाणी लवकर सुटल्यास शेतकऱ्यांचे कांदा,गहू, हरभरा, मका या पिकांना मदत होणार आहे.यावर्षी परतीचा पाऊस जास्त दिवस लांबल्याने शेतकऱ्यांची रब्बीची पिके उशीरा झाली, नदीलगत शेतकऱ्यांना पाणी आहे पण मोठ्या प्रमाणात शेतकरी पाटाच्या पाण्यावर अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांची पिके आवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे.प्रतिक्रिया...आमच्या २८ नंबर वितरिकेवर बहुतेक शेतकऱ्यांच्या विहिरींनी तळ गाठला असून ऐन मोसमात पाणी कमी पडल्याने शेतकऱ्यांची पिके कोमेजली आहे. तर काहींच्या कांदा लागवडी खोळंबल्या आहे. शेतकऱ्यांची आता सर्व आशा पालखेड डावा कालव्यावर आहे तरी पाटबंधारे खात्याने जानेवारीच्या सुरुवातीला आवर्तन दिल्यास गहु, हरभरा, कांदा पिकांना फायदा होणार आहे.- मल्हारी दराडे, अध्यक्ष मतोबा पाणीवापर संस्था.कालवा सल्लागार समितीच्या मीटिंगमध्ये २० जानेवारी च्या आसपास पाणी आवर्तन सोडण्याबाबत चर्चा झाली असून पाणी वापर संस्थांनी अर्ज भरून मागणी केल्यास त्या अगोदरही पाणी आवर्तनाबाबत विचार केला जाईल.- संभाजी पाटील, अभियंता पाटबंधारे उपविभाग, येवला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती