शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शेतकरी चिंतित : हवेतील आर्द्रतेमुळे फूलं, फळगळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:20 IST

पाटोदा : येवला तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून दिवसभर कडक ऊन, रात्री थंडी व पहाटे प्रचंड प्रमाणात दव पडत असून, या बदलत्या हवामानाचा फटका तालुक्यातील डाळिंब पिकाला बसला आहे. यामुळे डाळिंब उत्पादक हवालदिल झाले आहेत. या बदलत्या हवामानामुळे बागेमध्ये मोठ्या प्रमाणात फुले व फळे गळत आहेत. त्यामुळे औषध फवारणीचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्दे दर्जा घसरल्याने दरात होणार घट : डाळिंबबागांवर बदलत्या हवामानाचा परिणाम होत असून, बागा विविध रोगांना बळी पडत असल्याने उत्पादनाचा दर्जा खालवत आहे. फळांची वाढ न होणे असे विविध परिणाम बागेवर होताना दिसत आहेत. दर्जाहीन उत्पादन निघाल्यास शेतकऱ्यांना डाळिंब अत्

शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेल्या अवकाळी पाऊस, कडाक्याची थंडी, प्रचंड दव अशी संकटांची मालिका थांबण्याचे नाव घत नाही. गेल्या काही दिवसांपासून परिसरात उन्हाळ्याची चाहूल लागली असलीतरी ढगाळ हवामान, कडक ऊन व रात्री पडणारी थंडी व पहाटेचे दव आशा विचित्र हवामानामुळे फळबागाधोक्यात आल्या आहेत. सकाळी पडणाºया दवामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त वेळ राहात आहे. या दवामुळे फळाच्या देठाजवळ पाणी साचत असल्याने पिकाचे भाग ओले राहातात, त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने पिकांच्या कोवळ्या भागास इजा पोहोचून फूल व फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे डाळिंब पीक धोक्यात आले आहे. डाळिंबबागांसाठी केलेला लाखो रु पयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने डाळिंब उत्पादक हवालदिल झाला आहे. फळधारणेस अडथला : पाटोदा परिसरात सुमारे साडेसातशे ते आठशे हेक्टर डाळिंबबागा असून, या भागातील शेतकरी दर्जेदार डाळिंब उत्पादन करीत असून, त्यांची मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात करीत आहेत. हवामानातील बदलामुळे फुलांवर येणाºया मधमाश्यांचे प्रमाणही कमी झाल्यामुळे फळधारणेस अडचण येत आहे. यामुळे नर फुलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मधमाश्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी शेतकरीवर्ग विविध उपाययोजना करीत आहेत.कोट :- हवामानात वारंवार बदल होत आहे. त्यामुळे बागेवर दिवसातून दोन वेळेस बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे. यामुळे आर्थिक फटका बसत आहे. खर्च करूनही पीक हातात येते की नाही याची शंका आहे.- सुकदेव मेंगाणे, शेतकरी, पाटोदाफोटो : १४डाळींब