शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

शेतकरी चिंतित : हवेतील आर्द्रतेमुळे फूलं, फळगळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:20 IST

पाटोदा : येवला तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून दिवसभर कडक ऊन, रात्री थंडी व पहाटे प्रचंड प्रमाणात दव पडत असून, या बदलत्या हवामानाचा फटका तालुक्यातील डाळिंब पिकाला बसला आहे. यामुळे डाळिंब उत्पादक हवालदिल झाले आहेत. या बदलत्या हवामानामुळे बागेमध्ये मोठ्या प्रमाणात फुले व फळे गळत आहेत. त्यामुळे औषध फवारणीचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्दे दर्जा घसरल्याने दरात होणार घट : डाळिंबबागांवर बदलत्या हवामानाचा परिणाम होत असून, बागा विविध रोगांना बळी पडत असल्याने उत्पादनाचा दर्जा खालवत आहे. फळांची वाढ न होणे असे विविध परिणाम बागेवर होताना दिसत आहेत. दर्जाहीन उत्पादन निघाल्यास शेतकऱ्यांना डाळिंब अत्

शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेल्या अवकाळी पाऊस, कडाक्याची थंडी, प्रचंड दव अशी संकटांची मालिका थांबण्याचे नाव घत नाही. गेल्या काही दिवसांपासून परिसरात उन्हाळ्याची चाहूल लागली असलीतरी ढगाळ हवामान, कडक ऊन व रात्री पडणारी थंडी व पहाटेचे दव आशा विचित्र हवामानामुळे फळबागाधोक्यात आल्या आहेत. सकाळी पडणाºया दवामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त वेळ राहात आहे. या दवामुळे फळाच्या देठाजवळ पाणी साचत असल्याने पिकाचे भाग ओले राहातात, त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने पिकांच्या कोवळ्या भागास इजा पोहोचून फूल व फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे डाळिंब पीक धोक्यात आले आहे. डाळिंबबागांसाठी केलेला लाखो रु पयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने डाळिंब उत्पादक हवालदिल झाला आहे. फळधारणेस अडथला : पाटोदा परिसरात सुमारे साडेसातशे ते आठशे हेक्टर डाळिंबबागा असून, या भागातील शेतकरी दर्जेदार डाळिंब उत्पादन करीत असून, त्यांची मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात करीत आहेत. हवामानातील बदलामुळे फुलांवर येणाºया मधमाश्यांचे प्रमाणही कमी झाल्यामुळे फळधारणेस अडचण येत आहे. यामुळे नर फुलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मधमाश्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी शेतकरीवर्ग विविध उपाययोजना करीत आहेत.कोट :- हवामानात वारंवार बदल होत आहे. त्यामुळे बागेवर दिवसातून दोन वेळेस बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे. यामुळे आर्थिक फटका बसत आहे. खर्च करूनही पीक हातात येते की नाही याची शंका आहे.- सुकदेव मेंगाणे, शेतकरी, पाटोदाफोटो : १४डाळींब