शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

कांदा भावात घसरण, शेतकरी चिंंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 14:47 IST

वणी : कांद्याच्या दरात तुलनात्मकरित्या घसरण होत असल्याने उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उत्पादक चिंतित झाले आहेत. कांदा ...

वणी : कांद्याच्या दरात तुलनात्मकरित्या घसरण होत असल्याने उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उत्पादक चिंतित झाले आहेत. कांदा आयात करण्यासाठीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील उत्पादक चिंतित झाले असून सदर निर्णय रद्द करु न उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी ग्रामिण विकास कृषी व किसान कल्याण पंचायत राज मंत्री नरेन्द्र सिंह तोमर यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केन्द्रीय वाणिज्य मंत्रालयाने निर्यातमुल्य ८५० डॉलर मेट्रीक टन स्थिर केला आहै. तसेच केंन्द्र शासनाच्या एम एम टि सी या व्यापार कंपनीने दोन हजार टन कांदा आयातीची निविदा प्रसिद्ध केली आहे. हा निर्णय उत्पादकांना मारक आहे . त्यामुळे निर्यात मूल्य शुन्य करु न आयात निविदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान येत्या महिनाभारात महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे ,जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यातील ८५ ते ९० टक्के कांदा आवक होणार आहे तसेच लासलगाव बाजार समितीत कांदा आवक होणार असल्याने याचा विचार करु न नमुद निर्णय रद् करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे. भारतात उत्पादीत कांद्यापैकी ३३ टक्के कांदा महाराष्ट्रात उत्पादीत होत असुन हा कांदा दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण असल्याने निर्यात मोठ्या प्रमाणावर होते, असाही उल्लेख पत्रात आहे. दरम्यान सद्यस्थितीत कांद्याच्या दरात तुलनात्मकरित्या घसरण होत असल्याने उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उत्पादक चिंतित झाले आहेत तर कांदा दर वाढीबाबत धोरणांचा विचार करु न हे दर नियंत्रण आणण्यासाठी केन्द्रीय पातळीवर घेण्यात येणारे क्र मप्राप्त निर्णय यामुळे दुहेरी कात्रित सापडल्यासारखी अवस्था उत्पादकांची झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक