शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

कांदा भावात घसरण, शेतकरी चिंंतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 14:47 IST

वणी : कांद्याच्या दरात तुलनात्मकरित्या घसरण होत असल्याने उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उत्पादक चिंतित झाले आहेत. कांदा ...

वणी : कांद्याच्या दरात तुलनात्मकरित्या घसरण होत असल्याने उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उत्पादक चिंतित झाले आहेत. कांदा आयात करण्यासाठीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील उत्पादक चिंतित झाले असून सदर निर्णय रद्द करु न उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी ग्रामिण विकास कृषी व किसान कल्याण पंचायत राज मंत्री नरेन्द्र सिंह तोमर यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केन्द्रीय वाणिज्य मंत्रालयाने निर्यातमुल्य ८५० डॉलर मेट्रीक टन स्थिर केला आहै. तसेच केंन्द्र शासनाच्या एम एम टि सी या व्यापार कंपनीने दोन हजार टन कांदा आयातीची निविदा प्रसिद्ध केली आहे. हा निर्णय उत्पादकांना मारक आहे . त्यामुळे निर्यात मूल्य शुन्य करु न आयात निविदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान येत्या महिनाभारात महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे ,जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यातील ८५ ते ९० टक्के कांदा आवक होणार आहे तसेच लासलगाव बाजार समितीत कांदा आवक होणार असल्याने याचा विचार करु न नमुद निर्णय रद् करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे. भारतात उत्पादीत कांद्यापैकी ३३ टक्के कांदा महाराष्ट्रात उत्पादीत होत असुन हा कांदा दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण असल्याने निर्यात मोठ्या प्रमाणावर होते, असाही उल्लेख पत्रात आहे. दरम्यान सद्यस्थितीत कांद्याच्या दरात तुलनात्मकरित्या घसरण होत असल्याने उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उत्पादक चिंतित झाले आहेत तर कांदा दर वाढीबाबत धोरणांचा विचार करु न हे दर नियंत्रण आणण्यासाठी केन्द्रीय पातळीवर घेण्यात येणारे क्र मप्राप्त निर्णय यामुळे दुहेरी कात्रित सापडल्यासारखी अवस्था उत्पादकांची झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक