शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

शेतकरी आत्महत्त्या बचाव अभियान राबविणार

By admin | Updated: September 26, 2015 00:06 IST

राजू शेट्टी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संकल्प

नाशिक : अवकाळी पाऊस, गारपीट व दुष्काळ अशा तिहेरी संकटात राज्यातील शेतकरी सापडला असून, कर्जबाजारी वाढल्याने शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण वाढले आहे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. २३ आॅक्टोबरपासून शेतकरी आत्महत्त्या बचाव अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक येथे रामकुंडावर गोदापूजन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, निसर्गाचा समतोल ढासळल्याने कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे अतिवृष्टी-गारपिटीसारखे संकट येत आहे. याला समाजातील उच्चभ्रू लोकांचा चंगळवाद जबाबदार असून, बेसुमार जंगलतोड करून सिमेंटचे जंगल उभे राहत आहे, तर दुसरीकडे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्त्या करत आहे. त्याला मदत करण्याची जबाबदारी केवळ शासनाची नसून समाजाचीदेखील आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. २३ आॅक्टोबरपासून शेतकरी आत्महत्त्या बचाव तथा आत्महत्त्येपासून शेतकऱ्यांना परावृत्त करण्यासाठी आत्महत्त्या करताना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणारे शेतकरी दत्ता लांडगे यांच्या नावाने अभियान सुरू करणार आहोत. शेतकऱ्यांनी आत्महत्त्या करू नये यासाठी प्रयत्न करणार असून, संघटनेतर्फे सर्वेक्षणदेखील सुरू आहे, तसेच शेतकऱ्याला खासगी कर्जफेडीसाठी मदत करावी. सरकारने त्यासाठी दहा वर्षांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही शेट्टी यांनी सांगितले.दरम्यान, रामकुंडावर शेट्टी यांनी गोदामातेचे पूजन करून गंगागोदावरी मंदिरात दुष्काळ निवारणार्थ साकडे घातले. (प्रतिनिधी)