शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

शेतकरी आत्महत्त्या बचाव अभियान राबविणार

By admin | Updated: September 26, 2015 00:06 IST

राजू शेट्टी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संकल्प

नाशिक : अवकाळी पाऊस, गारपीट व दुष्काळ अशा तिहेरी संकटात राज्यातील शेतकरी सापडला असून, कर्जबाजारी वाढल्याने शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण वाढले आहे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. २३ आॅक्टोबरपासून शेतकरी आत्महत्त्या बचाव अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक येथे रामकुंडावर गोदापूजन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, निसर्गाचा समतोल ढासळल्याने कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे अतिवृष्टी-गारपिटीसारखे संकट येत आहे. याला समाजातील उच्चभ्रू लोकांचा चंगळवाद जबाबदार असून, बेसुमार जंगलतोड करून सिमेंटचे जंगल उभे राहत आहे, तर दुसरीकडे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्त्या करत आहे. त्याला मदत करण्याची जबाबदारी केवळ शासनाची नसून समाजाचीदेखील आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. २३ आॅक्टोबरपासून शेतकरी आत्महत्त्या बचाव तथा आत्महत्त्येपासून शेतकऱ्यांना परावृत्त करण्यासाठी आत्महत्त्या करताना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणारे शेतकरी दत्ता लांडगे यांच्या नावाने अभियान सुरू करणार आहोत. शेतकऱ्यांनी आत्महत्त्या करू नये यासाठी प्रयत्न करणार असून, संघटनेतर्फे सर्वेक्षणदेखील सुरू आहे, तसेच शेतकऱ्याला खासगी कर्जफेडीसाठी मदत करावी. सरकारने त्यासाठी दहा वर्षांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही शेट्टी यांनी सांगितले.दरम्यान, रामकुंडावर शेट्टी यांनी गोदामातेचे पूजन करून गंगागोदावरी मंदिरात दुष्काळ निवारणार्थ साकडे घातले. (प्रतिनिधी)