शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्त्या बचाव अभियान राबविणार

By admin | Updated: September 26, 2015 00:06 IST

राजू शेट्टी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संकल्प

नाशिक : अवकाळी पाऊस, गारपीट व दुष्काळ अशा तिहेरी संकटात राज्यातील शेतकरी सापडला असून, कर्जबाजारी वाढल्याने शेतकरी आत्महत्त्यांचे प्रमाण वाढले आहे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. २३ आॅक्टोबरपासून शेतकरी आत्महत्त्या बचाव अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक येथे रामकुंडावर गोदापूजन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, निसर्गाचा समतोल ढासळल्याने कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे अतिवृष्टी-गारपिटीसारखे संकट येत आहे. याला समाजातील उच्चभ्रू लोकांचा चंगळवाद जबाबदार असून, बेसुमार जंगलतोड करून सिमेंटचे जंगल उभे राहत आहे, तर दुसरीकडे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्त्या करत आहे. त्याला मदत करण्याची जबाबदारी केवळ शासनाची नसून समाजाचीदेखील आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. २३ आॅक्टोबरपासून शेतकरी आत्महत्त्या बचाव तथा आत्महत्त्येपासून शेतकऱ्यांना परावृत्त करण्यासाठी आत्महत्त्या करताना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणारे शेतकरी दत्ता लांडगे यांच्या नावाने अभियान सुरू करणार आहोत. शेतकऱ्यांनी आत्महत्त्या करू नये यासाठी प्रयत्न करणार असून, संघटनेतर्फे सर्वेक्षणदेखील सुरू आहे, तसेच शेतकऱ्याला खासगी कर्जफेडीसाठी मदत करावी. सरकारने त्यासाठी दहा वर्षांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असेही शेट्टी यांनी सांगितले.दरम्यान, रामकुंडावर शेट्टी यांनी गोदामातेचे पूजन करून गंगागोदावरी मंदिरात दुष्काळ निवारणार्थ साकडे घातले. (प्रतिनिधी)