शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:15 IST

अवकाळी पावसाला तीन महिने उलटूनही अद्याप येवला तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी अद्यापही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देउदासीनता । तीन महिन्यांनंतरही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नाही

मानोरी : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर या अवकाळी पावसाला तीन महिने उलटूनही अद्याप येवला तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी अद्यापही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.ज्या शेतकºयांनी विमा काढलेला नाही अशा शेतकºयांना तुटपुंजी का होईना शासनाकडून मदत मिळत आहे. मात्र ज्या शेतकºयांनी विमा काढलेला आहे अशा शेतकºयांच्या हातात एक दमडीदेखील पडलेली नाही. त्यामुळे विमा कंपनीच्या या कारभारावर शेतकरी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पीकविमा न काढलेल्या शेतकºयांना मदत मिळत असताना पीकविमाधारक शेतकरी मात्र नाराजी व्यक्त करीत आहे.यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने मका आणि सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने लागवड केली होती. त्यात यंदा प्रथमच मक्यावर लष्करी अळीने आक्रमण केल्याने वारंवार औषध फवारणी करून काही प्रमाणात मका पीक वाचविले होते. सन २०१८ मध्ये खरीप हंगामातील मका आणि सोयाबीन पिकाचा अनेक शेतकºयांनी विमा काढला होता. कोरडा दुष्काळ असतानादेखील त्याची नुकसानभरपाई शेतकºयांना मिळालेली नाही. २०१९ मध्ये अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. त्याचीदेखील भरपाई मिळालेली नाही. काही विमाधारक शेतकरी दीड वर्षापासून, तर काही दोन महिन्यांपासून भरपाईच्या प्रतीक्षेत आहे.येवला तालुक्यात सन २०१८ मध्ये कोरडा दुष्काळ पडला असता मका पीक पाण्याच्या कमतरतेमुळे वाया गेले होते. तेव्हासुद्धा मी विमा काढलेला होता. २०१९ मध्ये अवकाळी पावसाने मका, सोयाबीनचे नुकसान झाले त्याचाही विमा काढलेला आहे. मात्र दोन्हीपण वर्षी एक रु पयांचीदेखील नुकसानभरपाई पीकविमा कंपनीकडून अद्याप मला मिळालेली नाही.- विठ्ठल वावधाने, पीकविमाधारक शेतकरी.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस