शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:18 IST

ननाशी : पावसाचे माहेरघर असलेल्या ननाशी परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून, हंगाम वाया जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी अद्याप परिसरात दमदार पाऊस झाला नाही.

ननाशी : पावसाचे माहेरघर असलेल्या ननाशी परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून, हंगाम वाया जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी अद्याप परिसरात दमदार पाऊस झाला नाही. वळीव पाऊसवगळता दमदार मोसमी पावसाला अजूनही सुरुवात झाली नाही. पाऊस जसजसा लांबणीवर पडत आहे. तसतशी बळीराजाची चिंता वाढत आहे. या परिसरात प्रामुख्याने भात, नागली, वरई, उडीद, खुरासनी, कुळीद असे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी पिके घेतली जातात. पाऊस लांबल्याने या पिकांना मोठा फटका बसत आहे.ज्या शेतकऱ्यांकडे वीजपंप आणि पाण्याची सोय आहे त्यांनी वीजपंपाच्या मदतीने पाणी भरून भात लावणी केली आहे. तरीदेखील पीक जगेल की नाही याबाबत साशंकताच आहे. जुलै महिन्यात या परिसरात संततधार पाऊस होत असतो. अनेकदा पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन जाते.यंदा मात्र जुलै मध्येही कडक उन्हाळा जाणवत आहे. या कडक उन्हाचा मोठा फटका पिकांना बसत असून उत्पादनावरदेखील त्याचा मोठा परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे आदिवासी शेतकºयांची आतापासूनच घालमेल सुरू झाली आहे.अगोदरच कोविड -१९ संसर्गामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना रोजंदारी मिळत नाही त्यामुळे हाताला काम नाही आणि शेतात पीक नाही अशी दयनीय स्थिती सध्या परिसरातील नागरिकांची झाली आहे. भात, नागली, वरई आदी पिके आदिवासी शेतकºयांची मुख्य पिके मानली जातात. लावणीनंतर तीन ते चार महिन्यांनी ही पिके येतात. या कालावधीपैकी सर्वसाधारण दीड ते दोन महिन्यांचा कालावधी पावसाअभावी वाया गेल्याने आता लावणी करूनही उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता निर्माण झाल्याचे आणि दुबार लावणी करायची म्हटले तर रोपे शिल्लक नसल्याने तेही शक्य नसल्याचे मत परिसरातील शेतकºयांनी व्यक्त केले आहे.------------------लावणी खोळंबली...शेतकºयांनी सुरु वातीला झालेल्या वळीव पावसानंतर नागली, वरई आदीची रोपे टाकली होती. ती आता लावणी योग्य झाली आहेत; परंतु पावसाअभावी या पिकांची लावणी खोळंबली आहे. ज्या शेतकºयांनी पाऊस पडेल या आशेवर नागली वरईची लावणी केली आहे ती पिके कडक उन्हामुळे करपून जात असून, भात लावणी ठप्प झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक