शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:18 IST

ननाशी : पावसाचे माहेरघर असलेल्या ननाशी परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून, हंगाम वाया जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी अद्याप परिसरात दमदार पाऊस झाला नाही.

ननाशी : पावसाचे माहेरघर असलेल्या ननाशी परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून, हंगाम वाया जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी अद्याप परिसरात दमदार पाऊस झाला नाही. वळीव पाऊसवगळता दमदार मोसमी पावसाला अजूनही सुरुवात झाली नाही. पाऊस जसजसा लांबणीवर पडत आहे. तसतशी बळीराजाची चिंता वाढत आहे. या परिसरात प्रामुख्याने भात, नागली, वरई, उडीद, खुरासनी, कुळीद असे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी पिके घेतली जातात. पाऊस लांबल्याने या पिकांना मोठा फटका बसत आहे.ज्या शेतकऱ्यांकडे वीजपंप आणि पाण्याची सोय आहे त्यांनी वीजपंपाच्या मदतीने पाणी भरून भात लावणी केली आहे. तरीदेखील पीक जगेल की नाही याबाबत साशंकताच आहे. जुलै महिन्यात या परिसरात संततधार पाऊस होत असतो. अनेकदा पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन जाते.यंदा मात्र जुलै मध्येही कडक उन्हाळा जाणवत आहे. या कडक उन्हाचा मोठा फटका पिकांना बसत असून उत्पादनावरदेखील त्याचा मोठा परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे आदिवासी शेतकºयांची आतापासूनच घालमेल सुरू झाली आहे.अगोदरच कोविड -१९ संसर्गामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना रोजंदारी मिळत नाही त्यामुळे हाताला काम नाही आणि शेतात पीक नाही अशी दयनीय स्थिती सध्या परिसरातील नागरिकांची झाली आहे. भात, नागली, वरई आदी पिके आदिवासी शेतकºयांची मुख्य पिके मानली जातात. लावणीनंतर तीन ते चार महिन्यांनी ही पिके येतात. या कालावधीपैकी सर्वसाधारण दीड ते दोन महिन्यांचा कालावधी पावसाअभावी वाया गेल्याने आता लावणी करूनही उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता निर्माण झाल्याचे आणि दुबार लावणी करायची म्हटले तर रोपे शिल्लक नसल्याने तेही शक्य नसल्याचे मत परिसरातील शेतकºयांनी व्यक्त केले आहे.------------------लावणी खोळंबली...शेतकºयांनी सुरु वातीला झालेल्या वळीव पावसानंतर नागली, वरई आदीची रोपे टाकली होती. ती आता लावणी योग्य झाली आहेत; परंतु पावसाअभावी या पिकांची लावणी खोळंबली आहे. ज्या शेतकºयांनी पाऊस पडेल या आशेवर नागली वरईची लावणी केली आहे ती पिके कडक उन्हामुळे करपून जात असून, भात लावणी ठप्प झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक