शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीचा निर्णय बदलल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 14:55 IST

सायखेडा : नाशिक बाजार समिती सुरु राहणार की बंद याबाबतचे दोन संदेश काही तासांच्या अंतराने आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बाजार समिती सुरु राहणार म्हणून तोडणी केलेल्या शेतीमालाची पॅकींगही करुनही ठेवली. त्यानंतर समिती बंद राहणार असल्याचा दुसरा संदेश आल्याने पॅकींग करुन ठेवलेल्या मालाचे आता करायचे काय असा पेच शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

विक्रीस आणलेल्या शेतीमालाचे करायचे काय?सायखेडा : नाशिक बाजार समिती सुरु राहणार की बंद याबाबतचे दोन संदेश काही तासांच्या अंतराने आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बाजार समिती सुरु राहणार म्हणून तोडणी केलेल्या शेतीमालाची पॅकींगही करुनही ठेवली. त्यानंतर समिती बंद राहणार असल्याचा दुसरा संदेश आल्याने पॅकींग करुन ठेवलेल्या मालाचे आता करायचे काय असा पेच शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती उद्या सकाळपासून सुरु होणार असल्याचा समितीचा निर्णय दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. शेतात विक्रीसाठी परिवक्व झालेल्या शेतीमालाची तोडणी करून शेतकऱ्यांनी पहाटेच्या लिलावासाठी माल पॅकिंग केला आणि अचानक रात्री उशीरा सोशल मीडियावर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा मार्केट बंद असल्याचा आदेश धडकला. अवघ्या काही तासात मार्केट चालू बंद असल्याचे दोनदा आलेले मॅसेज शेतकऱ्यांचे नुकसान करणारे ठरले आहेत. सकाळी मार्केट सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. शेतकऱ्यांनी पहाटे विक्री करावयाचा माल शेतातून घाईने काढला, पॅकिंग केली व अचानक मार्केट बंद असल्यामुळे आता या मालाचे करायचे काय, कुठे विक्री करणार असा प्रश्न निर्माण झाला आहेअगोदरच शेतकरी पडलेले बाजार भाव आणि शेती मालासाठी येणारा खर्च यांची ताळमेळ बसत नसल्याने अडचणीत आले आहेत. त्यात प्रशासनाची दुट्टपी भूमिका नुकसान करणारी आहे. पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने असा अचानक निर्णय मागे घ्यावा लागत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.-----------आज दुपारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु असल्याचे बाजार समितीचे पत्र आले. बाजार समितीत चौकशी केली असता मार्केट सुरु असल्याचे सांगितले. त्यामुळे दहा क्विंटलच्या आसपास गाजर विक्रीसाठी काढले. मजूर नसल्याने घरातील माणसे उन्हात राबली आणि सायंकाळी अचानक जिल्हाधिकारी मांढरे यांचा आदेश आला की बाजार समिती बंद आहे. त्यामुळे शेतातून काढणी केलेल्या गाजराचे काय करावे व कुठे विक्री करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.- निखिल डेर्ले, शेतकरी, शिंगवे

टॅग्स :Nashikनाशिक