शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बाजार समितीचा निर्णय बदलल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 14:55 IST

सायखेडा : नाशिक बाजार समिती सुरु राहणार की बंद याबाबतचे दोन संदेश काही तासांच्या अंतराने आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बाजार समिती सुरु राहणार म्हणून तोडणी केलेल्या शेतीमालाची पॅकींगही करुनही ठेवली. त्यानंतर समिती बंद राहणार असल्याचा दुसरा संदेश आल्याने पॅकींग करुन ठेवलेल्या मालाचे आता करायचे काय असा पेच शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

विक्रीस आणलेल्या शेतीमालाचे करायचे काय?सायखेडा : नाशिक बाजार समिती सुरु राहणार की बंद याबाबतचे दोन संदेश काही तासांच्या अंतराने आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बाजार समिती सुरु राहणार म्हणून तोडणी केलेल्या शेतीमालाची पॅकींगही करुनही ठेवली. त्यानंतर समिती बंद राहणार असल्याचा दुसरा संदेश आल्याने पॅकींग करुन ठेवलेल्या मालाचे आता करायचे काय असा पेच शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती उद्या सकाळपासून सुरु होणार असल्याचा समितीचा निर्णय दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. शेतात विक्रीसाठी परिवक्व झालेल्या शेतीमालाची तोडणी करून शेतकऱ्यांनी पहाटेच्या लिलावासाठी माल पॅकिंग केला आणि अचानक रात्री उशीरा सोशल मीडियावर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा मार्केट बंद असल्याचा आदेश धडकला. अवघ्या काही तासात मार्केट चालू बंद असल्याचे दोनदा आलेले मॅसेज शेतकऱ्यांचे नुकसान करणारे ठरले आहेत. सकाळी मार्केट सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. शेतकऱ्यांनी पहाटे विक्री करावयाचा माल शेतातून घाईने काढला, पॅकिंग केली व अचानक मार्केट बंद असल्यामुळे आता या मालाचे करायचे काय, कुठे विक्री करणार असा प्रश्न निर्माण झाला आहेअगोदरच शेतकरी पडलेले बाजार भाव आणि शेती मालासाठी येणारा खर्च यांची ताळमेळ बसत नसल्याने अडचणीत आले आहेत. त्यात प्रशासनाची दुट्टपी भूमिका नुकसान करणारी आहे. पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने असा अचानक निर्णय मागे घ्यावा लागत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.-----------आज दुपारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु असल्याचे बाजार समितीचे पत्र आले. बाजार समितीत चौकशी केली असता मार्केट सुरु असल्याचे सांगितले. त्यामुळे दहा क्विंटलच्या आसपास गाजर विक्रीसाठी काढले. मजूर नसल्याने घरातील माणसे उन्हात राबली आणि सायंकाळी अचानक जिल्हाधिकारी मांढरे यांचा आदेश आला की बाजार समिती बंद आहे. त्यामुळे शेतातून काढणी केलेल्या गाजराचे काय करावे व कुठे विक्री करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.- निखिल डेर्ले, शेतकरी, शिंगवे

टॅग्स :Nashikनाशिक