शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

शेतकरी आत्महत्येचे  सत्र जिल्ह्यात कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:09 IST

कर्जबाजारीपणा, नापिकी व शेतमालाच्या घसरलेल्या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे सत्र जिल्ह्यात कायम असून, गेल्या दोन दिवसांत लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या पंचाहत्तरपर्यंत पोहोचली आहे.

नाशिक/दिंडोरी : कर्जबाजारीपणा, नापिकी व शेतमालाच्या घसरलेल्या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे सत्र जिल्ह्यात कायम असून, गेल्या दोन दिवसांत लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या पंचाहत्तरपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या आत्महत्या सरकारची डोकेदुखी बनली असून, उपाययोजना करण्याच्या शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी  करण्यास प्रशासनालाही विसर पडला आहे. मालेगाव तालुक्यातील खलाणे येथील मोठाभाऊ आप्पा शेलार (३५) या शेतकºयाने गळफास घेऊन तर मंगळवारी दिंडोरी तालुक्यातील कोराटे लगत पालखेड बंधारा येथे राहणाºया संदीप अशोक कदम (३०) या तरुण शेतकºयाने शेतात विष प्राशन करून सकाळी आत्महत्या केल्याने जिल्ह्णात जानेवारीपासून आजपावेतो ७४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्णात जानेवारी महिन्यापासून शेतकºयांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षी चांगला पाऊस व शेतीचे उत्पादन वाढले तसेच राज्य सरकारने शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठी दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची योजना जाहीर केल्यामुळे यंदा शेतकरी आत्महत्या होणार नाही, असा अंदाज बांधला जात होता. परंतु जानेवारी महिन्यापासून दर महिन्याला सरासरी सात ते आठ शेतकरी विविध साधनांनी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. जिल्ह्णात सर्वाधिक आत्महत्या मालेगाव तालुक्यात झाल्या असून, आजवर १४ शेतकºयांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. त्या खालोखाल सधन व संपन्न समजल्या जाणाºया निफाड तालुक्यात १२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.शेतकºयांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुचविल्या असून, कृषी, महसूल, सहकार खात्याच्या संयुक्त प्रयत्नातून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आहेत. त्यात प्रामुख्याने कर्जबाजारी शेतकरी शोधून त्याचे समुपदेशन करणे, त्याच्या कर्ज परतफेडीसाठी बॅँकांशी बोलून दिलासा देणे, जिल्हाधिकारी कार्यालयात मदत केंद्र कार्यान्वित करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. तथापि, त्या सर्व कागदावरच असून, शेतकºयांच्या आत्महत्या मात्र कायम आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरी