शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

शेतकरी आत्महत्येचे  सत्र जिल्ह्यात कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:09 IST

कर्जबाजारीपणा, नापिकी व शेतमालाच्या घसरलेल्या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे सत्र जिल्ह्यात कायम असून, गेल्या दोन दिवसांत लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या पंचाहत्तरपर्यंत पोहोचली आहे.

नाशिक/दिंडोरी : कर्जबाजारीपणा, नापिकी व शेतमालाच्या घसरलेल्या बाजारभावामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्या करण्याचे सत्र जिल्ह्यात कायम असून, गेल्या दोन दिवसांत लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या पंचाहत्तरपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या आत्महत्या सरकारची डोकेदुखी बनली असून, उपाययोजना करण्याच्या शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी  करण्यास प्रशासनालाही विसर पडला आहे. मालेगाव तालुक्यातील खलाणे येथील मोठाभाऊ आप्पा शेलार (३५) या शेतकºयाने गळफास घेऊन तर मंगळवारी दिंडोरी तालुक्यातील कोराटे लगत पालखेड बंधारा येथे राहणाºया संदीप अशोक कदम (३०) या तरुण शेतकºयाने शेतात विष प्राशन करून सकाळी आत्महत्या केल्याने जिल्ह्णात जानेवारीपासून आजपावेतो ७४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्णात जानेवारी महिन्यापासून शेतकºयांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षी चांगला पाऊस व शेतीचे उत्पादन वाढले तसेच राज्य सरकारने शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठी दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची योजना जाहीर केल्यामुळे यंदा शेतकरी आत्महत्या होणार नाही, असा अंदाज बांधला जात होता. परंतु जानेवारी महिन्यापासून दर महिन्याला सरासरी सात ते आठ शेतकरी विविध साधनांनी आपली जीवनयात्रा संपवित आहेत. जिल्ह्णात सर्वाधिक आत्महत्या मालेगाव तालुक्यात झाल्या असून, आजवर १४ शेतकºयांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. त्या खालोखाल सधन व संपन्न समजल्या जाणाºया निफाड तालुक्यात १२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.शेतकºयांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुचविल्या असून, कृषी, महसूल, सहकार खात्याच्या संयुक्त प्रयत्नातून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आहेत. त्यात प्रामुख्याने कर्जबाजारी शेतकरी शोधून त्याचे समुपदेशन करणे, त्याच्या कर्ज परतफेडीसाठी बॅँकांशी बोलून दिलासा देणे, जिल्हाधिकारी कार्यालयात मदत केंद्र कार्यान्वित करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. तथापि, त्या सर्व कागदावरच असून, शेतकºयांच्या आत्महत्या मात्र कायम आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरी