शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसामुळे शेतकरी समाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:21 IST

दिंडोरी : तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाने हजेरी लावण्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील पश्चिम भागात भात आवणीला सुरुवात

दिंडोरी : तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाने हजेरी लावण्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा भीजपाऊस पडत असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. दडी मारलेल्या पावसाने तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी हैराण झाले होते. मात्र, सध्या पावसाचे आगमन झाल्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात भात आवणीच्या कामाला मोठा वेग आला आहे.भात आवणी करताना गाळ करण्यासाठी चांगल्या पावसाची आवश्यकता असते; परंतु सध्या पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे तसेच भाताचे रोप जास्त दिवसाची झाल्यामुळे बळीराजाने जास्त पावसाची वाट न पाहता कमी पावसावर भात आवणीला प्रांरभ केला आहे.दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी भात पिकाकडे व्यापारी दृष्टिकोन ठेवून सध्या भातशेती करीत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी शेतकरी ज्या जातीच्या तांदळाला बाजारात जास्त मागणी आहे, अशा जातीची भात बियाणे खरेदी करून रोप टाकत आहेत. यात इंद्रायणी, कोळपी, दप्तरी, भोगावती, महालक्ष्मी, लालकोर आशा विविध जातींची बियाणे वापरली जातात.गेल्या तीन ते चार वर्षांपासून या परिसरातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी इंद्रायणी जातीच्या भाताला मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे दिसून येत आहे. या भागातील शेतकरी भात शेतीसाठी कुंडी वाफा, दलदल वाफा, जमीन पायरी टप्प्यात वाफा पद्धतीने भात शेती लागवड करीत आहेत. यासाठी संततधार पावसाची खूप गरज असते.दिंडोरीच्या पश्चिम पट्ट्यात अशा स्वरूपाचा पाऊस कायमच पडत असल्यामुळे भात पिकाला पोषक वातावरण निर्माण होत असल्यामुळे या परिसराला भाताची नगरी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. (२१ दिंडोरी)

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती