शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कांदा बियाणे महागल्याने शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 16:31 IST

खडकी : कांदा बियाणे तीस हजार रुपये पायली झाल्याने शेतकऱ्यांमध्ये कांदा लागवडीसाठी संकट निर्माण झाले आहे. घरगुती बियाणी उपलब्ध नसल्याने लांब दूरवरून पाणी शोधण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे घालावे लागत आहे

ठळक मुद्देलागवडीसाठी संकट : मालेगाव तालुक्यात बळीराजा हवालदिल

खडकी : कांदा बियाणे तीस हजार रुपये पायली झाल्याने शेतकऱ्यांमध्ये कांदा लागवडीसाठी संकट निर्माण झाले आहे. घरगुती बियाणी उपलब्ध नसल्याने लांब दूरवरून पाणी शोधण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे घालावे लागत आहे

गतवर्षी कांद्याला दहा ते वीस हजारांचा भाव मिळाल्याने कांद्याचे रोप तयार करण्यासाठी कांदा उपलब्ध नव्हता यामुळे कांद्याचे बियाणे तयार झाले नाही यावर्षी उन्हाळ कांद्याच्या बियाण्याने मोठी झेप घेतल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आधीच लाल कांद्याला जास्त पावसामुळे चांगले दिवस नसल्याने कांदा लागवड भिजत पडले आहे, लागवड झाली आहे त्यावर बुरशी आल्याने मूळ खराब होऊन कांद्याचे उत्पादन घटणार आहे. आज शेतकºयांना कांद्याचे भाव वाढण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. जास्त शेतकºयांनी आपला मोर्चा कांदा लागवडीकडे वळवला आहे. कांदा लागवड करण्यासाठी उपलब्ध असलेली रोपे शोधण्यासाठी पूर्ण कुटुंब कामाला लागले आहे. कांदा लागवडीमधून व कांद्याच्या उत्पादनामधून शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न दिले जाते. त्यामुळे शेतकºयांनी दरवर्षी कांदा उत्पादन तोट्यात गेले असले तरी कांद्याची लागवड सुरू ठेवले आहे. कांदा लागवडीसाठी मजूर खर्च मोठा असला तरी शेतकरी त्याची जुळवाजुळव करून कांदालागवड करीत आहे, मात्र चालू वर्षी शेतकºयाला कांदा बियाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनामार्फत अनुदान अभियानामध्ये नसल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.कांद्याचे बियाणे चार हजार ते सहा हजार रुपये किलोप्रमाणे विकण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत, घरचे बियाणे उपलब्ध नसल्याने विकत घेऊन कांदा लागवड करणे जिकिरीचे आहे. बियाणे उपलब्ध नसल्याने दुसरे उत्पादन घेण्यासाठी जमीन राखून ठेवली आहे, मात्र त्या ठिकाणी शेतकºयांनी कांदालागवड करण्याचे ठरवल्याने उपलब्ध रोपे नसल्याने शेतकºयाची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. त्यातच बाजरी कापणीचा हंगाम किंवा मका कापणी डोक्यावर आली आहे. त्यासाठी आर्थिक गरज पडणार आहे. त्यातूनही रस्ता काढून शेतकºयांनी कांद्याची रोपे व बियाणी उपलब्ध करण्यासाठी कंबर कसली आहे. कांदा बियाणे कृषी निविष्ठा दुकानांवर उपलब्ध झाले असले तरी त्याची कृत्रिम टंचाई शेतकºयांना फायदेशीर असल्याने याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे, तरच शेतकºयांना कांदा बियाणे उपलब्ध होणार आहे व पुणे कांदा उत्पादनाची शेतकºयांना लागणार आहेत.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी