शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
6
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
7
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
8
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
9
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
10
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
11
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
13
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
14
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
15
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
16
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
17
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
18
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
20
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ

कांदा बियाणे महागल्याने शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 16:31 IST

खडकी : कांदा बियाणे तीस हजार रुपये पायली झाल्याने शेतकऱ्यांमध्ये कांदा लागवडीसाठी संकट निर्माण झाले आहे. घरगुती बियाणी उपलब्ध नसल्याने लांब दूरवरून पाणी शोधण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे घालावे लागत आहे

ठळक मुद्देलागवडीसाठी संकट : मालेगाव तालुक्यात बळीराजा हवालदिल

खडकी : कांदा बियाणे तीस हजार रुपये पायली झाल्याने शेतकऱ्यांमध्ये कांदा लागवडीसाठी संकट निर्माण झाले आहे. घरगुती बियाणी उपलब्ध नसल्याने लांब दूरवरून पाणी शोधण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे घालावे लागत आहे

गतवर्षी कांद्याला दहा ते वीस हजारांचा भाव मिळाल्याने कांद्याचे रोप तयार करण्यासाठी कांदा उपलब्ध नव्हता यामुळे कांद्याचे बियाणे तयार झाले नाही यावर्षी उन्हाळ कांद्याच्या बियाण्याने मोठी झेप घेतल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आधीच लाल कांद्याला जास्त पावसामुळे चांगले दिवस नसल्याने कांदा लागवड भिजत पडले आहे, लागवड झाली आहे त्यावर बुरशी आल्याने मूळ खराब होऊन कांद्याचे उत्पादन घटणार आहे. आज शेतकºयांना कांद्याचे भाव वाढण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. जास्त शेतकºयांनी आपला मोर्चा कांदा लागवडीकडे वळवला आहे. कांदा लागवड करण्यासाठी उपलब्ध असलेली रोपे शोधण्यासाठी पूर्ण कुटुंब कामाला लागले आहे. कांदा लागवडीमधून व कांद्याच्या उत्पादनामधून शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न दिले जाते. त्यामुळे शेतकºयांनी दरवर्षी कांदा उत्पादन तोट्यात गेले असले तरी कांद्याची लागवड सुरू ठेवले आहे. कांदा लागवडीसाठी मजूर खर्च मोठा असला तरी शेतकरी त्याची जुळवाजुळव करून कांदालागवड करीत आहे, मात्र चालू वर्षी शेतकºयाला कांदा बियाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनामार्फत अनुदान अभियानामध्ये नसल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.कांद्याचे बियाणे चार हजार ते सहा हजार रुपये किलोप्रमाणे विकण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत, घरचे बियाणे उपलब्ध नसल्याने विकत घेऊन कांदा लागवड करणे जिकिरीचे आहे. बियाणे उपलब्ध नसल्याने दुसरे उत्पादन घेण्यासाठी जमीन राखून ठेवली आहे, मात्र त्या ठिकाणी शेतकºयांनी कांदालागवड करण्याचे ठरवल्याने उपलब्ध रोपे नसल्याने शेतकºयाची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. त्यातच बाजरी कापणीचा हंगाम किंवा मका कापणी डोक्यावर आली आहे. त्यासाठी आर्थिक गरज पडणार आहे. त्यातूनही रस्ता काढून शेतकºयांनी कांद्याची रोपे व बियाणी उपलब्ध करण्यासाठी कंबर कसली आहे. कांदा बियाणे कृषी निविष्ठा दुकानांवर उपलब्ध झाले असले तरी त्याची कृत्रिम टंचाई शेतकºयांना फायदेशीर असल्याने याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे, तरच शेतकºयांना कांदा बियाणे उपलब्ध होणार आहे व पुणे कांदा उत्पादनाची शेतकºयांना लागणार आहेत.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी