शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा विरोध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 01:38 IST

मखमलाबाद येथील हरित विकास प्रकल्पाला शेतकºयांचा असलेला विरोध कायम असून, रविवारी झालेल्या बैठकीत विरोध करणाºया शेतकºयांची संख्या अधिक वाढल्याचा दावा करण्यात आला. या प्रकल्पामुळे शेतकºयांचे नुकसान होणार असून, शेतकरी यात पुरता अडकण्याची शक्यता असल्याने पालिकेने सुचविलेल्या सूत्रालादेखील विरोध दर्शविण्यात आला आहे.

ठळक मुद्देहरित विकास प्रकल्प : मखमलाबादला शेतकऱ्यांची बैठक; कायदेशीर सल्ला घेणार

नाशिक : मखमलाबाद येथील हरित विकास प्रकल्पाला शेतकºयांचा असलेला विरोध कायम असून, रविवारी झालेल्या बैठकीत विरोध करणाºया शेतकºयांची संख्या अधिक वाढल्याचा दावा करण्यात आला. या प्रकल्पामुळे शेतकºयांचे नुकसान होणार असून, शेतकरी यात पुरता अडकण्याची शक्यता असल्याने पालिकेने सुचविलेल्या सूत्रालादेखील विरोध दर्शविण्यात आला आहे.स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात मखमलाबाद येथे स्मार्ट नगरीची संकल्पना आखण्यात आलेली आहे. ३०६ हेक्टर क्षेत्रात हा प्रकल्प साकारण्यात येणार असून यासाठी शेतकºयांच्या जमिनी लागणार आहेत. या प्रकल्पामुळे शेतकºयांना लाभ होण्याऐवजी नुकसानच होणार असल्याने तसेच अनेक तांत्रिक मुद्द्यांचा अजूनही उलगडा स्मार्ट सिटी कंपनीने केला नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. येथील सर्वेक्षणानंतर महापालिकेने शेतकºयांना ५५.४५ असे जागावाटपाचे हिस्से देण्यास तत्त्वत: मान्यता दिलेली आहे. परंतु याबाबत कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचा शेतकºयांना फटका बसणार असल्याचा सूर बैठकीत उमटला. शेतकºयांच्या क्षेत्रबदलाचा घोळदेखील असल्याने असलेल्या क्षेत्रापैकी दुसरीकडे क्षेत्र दाखविण्यात आल्याने त्याबाबतचा उलगडा करावा, अशी मागणी करण्यात आली.प्लॉटवर बांधकाम करायचे झाल्यास ५० टक्के जागा सोडावी लागेल तरच परवाना मिळणार आहे. शिवाय बहुमजली इमारतीच्या बांधकामाच्या इमल्यानुसार पार्किंगसाठीचे नियोजन करावे लागणार असल्याने त्याचा आर्थिक फटका शेतकºयांना बसणार असल्याबाबत चर्चा यावेळी करण्यात आली. हरित विकास प्रकल्पातील अनेक मुद्दे हे फसवे असल्याने आणि भविष्यात आणखी अटी टाकल्या जातील याविषयी अनेक शेतकºयांनी शंकादेखील उपस्थितीत केली. या प्रकल्पासंदर्भातील अटींची संदिग्धता कायम आहेच, शिवाय अनेक फसवे मुद्दे असल्याचा आरोप शेतकºयांनी केला असून, याप्रकरणी विरोध कायम असल्याचा ठराव करण्यात आला.दरम्यान, स्मार्ट सिटीच्या या प्रकल्पाला होणारा विरोध कायम असून, विरोध करणाºया शेतकºयांची संख्यादेखील वाढल्याचा दावा शेतकºयांनी केला आहे. या प्रकल्पामुळे शेतकºयांचे नुकसानच होणार असल्याचे आता अन्य शेतकºयांना पटल्याने तेदेखील विरोधात असल्याचे विरोधक शेतकºयांचे म्हणणे आहे.मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार ‘प्रेझेंटेशन’स्मार्ट सिटी प्रकल्पांसंदर्भात शेतकºयांचे मन वळविण्यासाठी सादरीकरण करण्यात आले होते. त्यानुसार आता शेतकरी संभाव्य नुकसानीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर ‘पॉवर प्रेझेंटशन’ सादर करणार आहे. यासंदर्भातील निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पामुळे शेतकºयांच्या क्षेत्राचे नुकसान होणार आहेच, शिवाय त्यांच्यावरील निर्बंधामुळे शेतकरी अधिक संकटात साडणार असल्याचा दावा शेतकºयांनी केला असून, याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यासंदर्भात त्यांची भेट घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटीFarmerशेतकरी