शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

नाशिक जिल्हा बँकेच्या विरोधात उद्या शेतकऱ्यांचा मोर्चा

By संदीप भालेराव | Updated: August 24, 2023 14:53 IST

विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

नाशिक : नाशिक जिल्हा सहकारी बँकेकडून होणाऱ्या सक्तीच्या कर्ज वसुलीसंदर्भात बुधवारी (दि. २३) प्रशासक प्रताप सिंग चव्हाण आणि उपोषणकर्त्यांमध्ये सुमारे दोन तास बैठक झाली. मात्र, या बैठकीतही कोणताच तोडगा न निघाल्याने शुक्रवार (दि. २५) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनकर्ते शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून होत असलेली सक्तीची कर्जवसुली बंद व्हावी व शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील नावे लावण्याची प्रक्रिया बंद करावी यासाठी गेल्या १ जूनपासून शेतकरी संघर्ष समिती संघटना व शेतकरी समन्वय समितीने धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला तब्बल ८४ दिवस झाले असून, जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत अनेकदा बैठका होऊनही यावर कोणताच तोडगा निघाला नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. यापूर्वी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी शासनाच्या निषेधार्थ नऊ दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. 

 उपोषणकर्त्यांची व जिल्हा बँकेच्या प्रशासकांची दोन तास बैठक झाली. या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने मोर्चाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीमध्ये सुधाकर मोगल, भगवान बोराडे, कैलास बोरसे, आनंदा चौधरी, चंद्रकांत मोरे, जयराम मोरे, रामदास जाधव, चंदू पाटील, नाना बच्छाव व इतर शेतकरी उपस्थित होते.