शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

मानोरी परिसरातील शेतकरी ढगाळ हवामानामुळे हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:39 PM

सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिवसेंदिवस कांदा लागवड क्षेत्रात वाढ होत असून, त्यात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने नवीन कांदा लागवडीसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच द्राक्षबागा विविध रोगांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे.

मानोरी : येवला तालुक्यात सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिवसेंदिवस कांदालागवड क्षेत्रात वाढ होत असून, त्यात सातत्याने वातावरणात बदल होत असल्याने नवीन कांदा लागवडीसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच द्राक्षबागा विविध रोगांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, शिरसगाव, पिंपळगाव लेप, मुखेड, देशमाने, जळगाव नेऊर, नेऊरगाव आदी भागात दीड महिन्यापासून उन्हाळ कांदा लागवड मोठ्या जोमात सुरू आहे. यंदा पाणी पुरेसे असल्याने तसेच बाजार समित्यामध्ये कांद्याचे दर टिकून असल्याने उन्हाळ कांदा लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे. मात्र वातावरण सातत्याने बदलत असल्यानेकधी ढगाळ तर कधी दवबिंदू पडत असल्याने कांद्यासह रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहे. औषध फवारणीचा खर्च वाढला आहे. अवकाळी पावसातून मका, सोयाबीन, कांदे आदी पिकांच्या नुकसानीतून सावरत असतानाच वातावरणात अचानक बदल झाल्याने नवीन कांदा लागवडीवर त्याचा परिणाम होत आहे.द्राक्ष बागायतदारांसाठी ढगाळ वातावरण डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. द्राक्षाचे उत्पादन हे वर्षातून एकदाच मिळत असते. त्यामुळे द्राक्षबाग वाचवण्यासाठी शेतकरीवर्ग सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती