शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून शासकीय खरेदी केंद्रांवर मका नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 12:15 IST

बाजारगप्पा : बाजारपेठांत मक्याच्या भावामध्ये ५० ते ६० रुपयांनी घट झाली आहे.

- संजय दुनबळे ( नाशिक )

मागील सप्ताहाच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठांत मक्याच्या भावामध्ये ५० ते ६० रुपयांनी घट झाली आहे. शासनाकडून मक्याला १७१० रुपये हमीभाव दिला जात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या खरेदी केंद्रांवर मक्याची नोंदणी केली असल्याचे दिसून येत आहे. परिणामी बाजार समित्यांमध्ये होणारी मका आवक काहीशी मंदावली आहे. शेतकऱ्यांकडे असलेली बाजरीही संपल्यामुळे सध्या लासलगाव बाजार समितीत जालना, राजस्थान या भागातील व्यापाऱ्यांकडील बाजरी बघायला मिळते. 

नाशिक जिल्ह्यात यावर्षी मक्याचे उत्पादन घटल्याने सुरुवातीपासूनच बाजारात मक्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. दिवाळीनंतर मक्याची चांगल्या प्रकारे आवक सुरू  झाली आहे. मात्र होणारी आवक आणि मागणी यांचे प्रमाण व्यस्त असल्यामुळे यावर्षी खुल्या बाजारातही मका पिकाने १७२५ रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठला. यावर्षी शासनाने मक्याला १७१० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारातही यावर्षी चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी खुल्या बाजारातच मका विक्रीला पसंती देत आहे. मात्र मक्याचे वाढत असलेले भाव पाहून शेतकरीही सावध झाले आहेत. काही ठिकाणी शेतकरी शासकीय खरेदी केंद्रांवर मका पिकाची नोंदणी करत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय केंद्रावरही मका विक्री केल्यानंतर चार दिवसांत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याने शेतकऱ्यांचा कल शासकीय खरेदी केंद्राकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. वातावरणात झालेला बदल आणि माल बाहेर जाण्याचे प्रमाण कमी झाल्याने बाजार समित्यांमध्ये मक्याचे भाव काही प्रमाणात उतरले आहेत. 

बाजार समित्यांमध्ये गहू आणि बाजरीची आवकही घटली आहे. यावर्षी गव्हाचा पेराच कमी झाला असल्याने गव्हाला २९०० रुपये प्रतिक्विं टलचा भाव मिळत असला तरी गव्हाची आवक फारशी नाही. भविष्यात गव्हाचे भाव अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लासलगाव बाजार समितीत सध्या जालना, राजस्थान या भागातील बाजरी येत आहे. मात्र या बाजरीचा जाहीर लिलाव न होता व्यापारी आपल्या वैयक्तिक संबंधांवर आणि गरजेप्रमाणे बाजरीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करत आहेत. मालेगाव बाजार समितीत सर्वच भुसार शेतमालाची आवक स्थिर असून, भावही स्थिर आहेत. मका भावात घट झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजरी तेजीत असून, आवक मात्र कमी झाली आहे. सोयाबीनसह इतर कडधान्याची आवक सर्वच बाजार समित्यांमध्ये कमी झाली आहे. सोयाबीनला ३२०० रुपये प्रतिक्विं टलपर्यंत भाव मिळत असून, कडधान्यांचे भावही टिकून आहेत. यावर्षी शेतकऱ्यांना उन्हाळ कांद्यानेही हात दिला नाही. लाल कांदाही ६००, ७०० च्या पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भुसार मालाचे भावही वाढले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी