शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शेतकऱ्यांची आभाळाकडे नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:56 IST

नांदूरशिंगोटे : एकीकडे कोरोनाचे संकट असताना खरीप हंगाम हातचा जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरीप पूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण केली. सोमवारपासून मृग नक्षत्र प्रारंभ झाल्याने शेतकºयांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत.

नांदूरशिंगोटे : एकीकडे कोरोनाचे संकट असताना खरीप हंगाम हातचा जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरीप पूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण केली. सोमवारपासून मृग नक्षत्र प्रारंभ झाल्याने शेतकºयांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन करून संचारबंदी केल्याने शेतकºयांनी आपले लक्ष शेतीकडे केंद्र्रित केले होते. खरीप हंगामासाठी शेती मशागतीची कामे आटोपून घेतली आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी होऊन बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. काही शेतकºयांकडे असणारे उन्हाळी पिके निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने नुकसान सोसावे लागले आहे.सुमारे दोन वर्षापासून शेतकºयांच्या पाठीमागे आर्थिक संकट उभे राहिले आहे. प्रथम दुष्काळ व गतवर्षी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस यामुळे खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेले आहेत, तर यावर्षी सुरुवातीलाच कोरोनाचे संकट सुरु झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेवटच्या टप्प्यात निर्बंध हटविल्याने ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू झाली आहे.रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी व मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. मशागतीचे काम उरकून कधी एकदा पेरणीची मूठ धरत, असे शेतकºयांना झाले आहे. बियाणे व खत खरेदीसाठी शेतकºयांनी कृषी सेवा केंद्रामध्ये गर्दी केल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. तसेच काही शेतकºयांनी खरिपासाठी घरगुती सोयाबीन बियाणांवर भर दिला आहे.दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग शेतकरी गट तयार करून या गटामार्फत बी-बियाणे, खत खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे बाजारात गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामासाठी पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मोफत बी-बियाणे, खते उपलब्ध करून द्यावीत, अशीही मागणी होत आहे.-------------------------काटवन परिसरात खरिपाची लगबगकुकाणे : अजंग-वडेल व कुकाणे परिसरात शेतकºयांना आता खरिपाचे वेध लागले असून, शेती मशागतीचे कामे सुरू झाली आहेत. बैलजोडीच्या मदतीने शेती करण्याच्या पारंपरिक पद्धतीला शेतकºयांनी रामराम ठोकला असून, आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागतीला पसंती दिली जात आहे. परिसरात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. कोरोना महामारीमुळे गेले काही दिवस सर्व व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे त्याचा परिणाम शेती व्यवसायावर झाला होता.आता शासनाने नियम शिथिलकेल्यामुळे हळूहळू जनजीवन सुरळीत होत आहे. शेतकरीही नांगरणी, कोळपणी करण्यात व्यस्त आहे.खरीप हंगामाची सुरुवात झालेली आहे. गत वर्ष पावसामुळे नुकसानीचे ठरले तर आता सुरवातीला कोरोना महामारीमुळे पूर्ण बंद असल्याने शेतकºयांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. कोरोना महामारीने संपूर्ण अर्थव्यवस्था उद्वस्थ केले असून, शेतकरी हा पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक