शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

शेतकऱ्यांची आभाळाकडे नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:56 IST

नांदूरशिंगोटे : एकीकडे कोरोनाचे संकट असताना खरीप हंगाम हातचा जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरीप पूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण केली. सोमवारपासून मृग नक्षत्र प्रारंभ झाल्याने शेतकºयांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत.

नांदूरशिंगोटे : एकीकडे कोरोनाचे संकट असताना खरीप हंगाम हातचा जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरीप पूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण केली. सोमवारपासून मृग नक्षत्र प्रारंभ झाल्याने शेतकºयांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन करून संचारबंदी केल्याने शेतकºयांनी आपले लक्ष शेतीकडे केंद्र्रित केले होते. खरीप हंगामासाठी शेती मशागतीची कामे आटोपून घेतली आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकरी आनंदी होऊन बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. काही शेतकºयांकडे असणारे उन्हाळी पिके निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने नुकसान सोसावे लागले आहे.सुमारे दोन वर्षापासून शेतकºयांच्या पाठीमागे आर्थिक संकट उभे राहिले आहे. प्रथम दुष्काळ व गतवर्षी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस यामुळे खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम वाया गेले आहेत, तर यावर्षी सुरुवातीलाच कोरोनाचे संकट सुरु झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेवटच्या टप्प्यात निर्बंध हटविल्याने ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू झाली आहे.रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी व मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. मशागतीचे काम उरकून कधी एकदा पेरणीची मूठ धरत, असे शेतकºयांना झाले आहे. बियाणे व खत खरेदीसाठी शेतकºयांनी कृषी सेवा केंद्रामध्ये गर्दी केल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. तसेच काही शेतकºयांनी खरिपासाठी घरगुती सोयाबीन बियाणांवर भर दिला आहे.दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग शेतकरी गट तयार करून या गटामार्फत बी-बियाणे, खत खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे बाजारात गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामासाठी पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मोफत बी-बियाणे, खते उपलब्ध करून द्यावीत, अशीही मागणी होत आहे.-------------------------काटवन परिसरात खरिपाची लगबगकुकाणे : अजंग-वडेल व कुकाणे परिसरात शेतकºयांना आता खरिपाचे वेध लागले असून, शेती मशागतीचे कामे सुरू झाली आहेत. बैलजोडीच्या मदतीने शेती करण्याच्या पारंपरिक पद्धतीला शेतकºयांनी रामराम ठोकला असून, आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागतीला पसंती दिली जात आहे. परिसरात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. कोरोना महामारीमुळे गेले काही दिवस सर्व व्यवसाय ठप्प होते. त्यामुळे त्याचा परिणाम शेती व्यवसायावर झाला होता.आता शासनाने नियम शिथिलकेल्यामुळे हळूहळू जनजीवन सुरळीत होत आहे. शेतकरीही नांगरणी, कोळपणी करण्यात व्यस्त आहे.खरीप हंगामाची सुरुवात झालेली आहे. गत वर्ष पावसामुळे नुकसानीचे ठरले तर आता सुरवातीला कोरोना महामारीमुळे पूर्ण बंद असल्याने शेतकºयांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. कोरोना महामारीने संपूर्ण अर्थव्यवस्था उद्वस्थ केले असून, शेतकरी हा पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक