शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

मुखेड महावितरण कार्यालयाला शेतकऱ्यांनी टाळे ठोकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 22:30 IST

मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड येथील महावितरणने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप करत सोमवारी (दि. २०) संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले.

ठळक मुद्देवीजपुरवठा खंडित : पूर्वसूचना दिली जात नसल्याची तक्रार

मानोरी : येवला तालुक्यातील मुखेड येथील महावितरणने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप करत सोमवारी (दि. २०) संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले.सध्या येवला तालुक्यातील मुखेड परिसरात कांद्याची लागवड सुरू असताना महावितरण कोणतीही पूर्वसूचना न देता वीज तोडत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, जे शेतकरी बिल भरण्यास तयार आहेत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू नका, अशी विनंती करूनही अधिकाऱ्यांनी ७० टक्के वसुली झाल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत करण्यास नकार दिल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले.यावेळी मुखेड महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अमोल राजोळे यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, सध्याच्या परिस्थितीत मुखेड येथील ४ आणि दत्तवाडी येथील २ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला होता. मात्र शेतकऱ्यांच्या विनंतीवरून हा खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करणार आहे. थकीत बिल बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी कृषी वीज बिल सवलत योजनेत सहभागी होऊन थकीत असलेल्या रकमेत ६६ टक्के सवलत मिळणार आहे. याप्रसंगी शिवसेनेचे नेते छगन आहेर, पवन आहेर, सुरेश वाघ, विठ्ठल कांगणे, विनायक आहेर, प्रल्हाद कदम, अशोक शेळके, ज्ञानेश्वर शिवपुरे, भास्कर आहेर, सुनील आहेर, किशोर आहेर आदी शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :yevla-acयेवलाelectricityवीज