कळवण : तालुक्यातील रवळजी ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकरी दौºयाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी गावातील २० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अभ्यास दौºयातील सर्व शेतकरी युवक वर्गातील आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतात कसा वापर होऊ लागला यासह संबंधित विषयाची माहिती शेतकºयांना व्हावी यासाठी या अभ्यास दौºयांचे आयोजन केले असल्याची माहिती ग्रामसेवक चव्हाण यांनी दिली.सन २०१९-२० च्या १४व्या वित्त आयोगामधून २५ टक्के खर्च करण्याची तरतूद आहे. शिक्षण आरोग्य उपजीविका त्यातून हा शेतकरी अभ्यास दौरा काढण्यात आला आहे. कळवण तालुक्यातून प्रथमच हा शेतकरी अभ्यास दौरा आयोजित केला असल्याची माहितीदेखील संबंधित अधिकाºयांनी यावेळी दिली. शेतकरी अभ्यास दौºयामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, पुणे, औरंगाबाद तसेच बारामती येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शन महोत्सवालादेखील शेतकरीवर्ग उपस्थिती लावणार आहेत. शेतकरी दाºयासाठी भास्कर भालेराव, बबन वाघ, दिपक गांगुर्डे, सुभाष पगार, विनोद भालेराव, भाऊसाहेब बागुल, साहेबराव गांगुर्डे, प्रकाश वाघ, राजेंद्र वाघ, संदिप वाघ, सागर निकम, विजय वाघ, सचिन भालेराव, हिरामण वाघ, अनिलेश जाधव, अजय भालेराव, दिपक जाधव, धनराज कुवर, पप्पु भालेराव, बाबुलाल पालवी, अशोक जगताप आदींची निवड झाली आहे.
कळवण तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी रवळजी ग्रामपंचायतचा आदर्श घेऊन गावातील युवक शेतकरी बांधवाना पारंपरिक शेतीऐवजी नवीन तंत्रज्ञान पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी कृषी विभागाशी सल्ला मसलत करून अभ्यास दौºयाचे आयोजन करावे.- नितीन पवार, आमदार