शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकरी-मजुरांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:37 IST

शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतमजुरांची मजुरी कमी करण्याचा निर्णय गिरणारे परिसरातील शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर वाद निर्माण झाला असून, मजुरांनी थेट कामावर बहिष्काराचे अस्त्र उपसल्यामुळे होत असलेल्या शेतमालाच्या नुकसानीमुळे मजूर व शेतकरी यांच्यातील वादात अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आहे.

ठळक मुद्देपोलिसांची मध्यस्थी : सामोपचाराने काम करण्याचा निर्णय

समसाद पठाण । गंगापूर : शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतमजुरांची मजुरी कमी करण्याचा निर्णय गिरणारे परिसरातील शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर वाद निर्माण झाला असून, मजुरांनी थेट कामावर बहिष्काराचे अस्त्र उपसल्यामुळे होत असलेल्या शेतमालाच्या नुकसानीमुळे मजूर व शेतकरी यांच्यातील वादात अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आहे. ज्या शेतकºयाला मजुरी परवडेल तो मजुरांना घेऊन जाईल, मात्र मजुरांची गाडी न अडविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.गुरुवारीच या संदर्भात गिरणारे येथे शेतकºयांची बैठक झाली होती व त्यात महिला मजुरांना दोनशे रुपये, तर पुरुष मजुराला अडीचशे रुपये देण्याचे ठरविण्यात आले होते. हा निर्णय पंचक्रोशीतील शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात आला. शुक्रवारी त्याचे थेट परिणाम दिसेल. गिरणारे पाटी येथे मजूर नेहमीप्रमाणे जमा झाले असता शेतकºयांनी त्यांना अल्प मजुरीत नेण्याचा आग्रह धरल्यावर वाद निर्माण झाला. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी धाव घेतली व शेतकरी, मजुरांची संयुक्त बैठक बोलावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकºयांनी त्यांची व्यथा मांडली. भाव घसरले असून, टमाट्याला वीस ते चाळीस रुपये क्रेट भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत टमाटे काढण्यासाठी मजुरांना ४०० रुपये कसे द्यायचे, असा सवाल केला.मजुरांनीही वाढत्या महागाईचे कारण देत द्राक्षबागेच्या कामासाठी जादा पैसे मिळत असून, जेथे जादा मजुरी मिळेल तेथे काम करण्याची तयारी असल्याचे सांगितले. अखेर या दोघांमध्ये समेट घडवून ज्या शेतकºयाला मजुरी परवडेल तो मजुरांना घेऊन जाईल ज्यांना परवडत नाही, त्याने मजुरांना जबरदस्ती करू नये त्याचबरोबर मजुरांची गाडी कोणीही अडवणार नाही. तसे केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीagricultureशेती