शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

लग्नसराईत शेतकऱ्यांची शेतकामांची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:42 IST

खडकी : ग्रामीण भागात भाद्रपद महिन्यातही लग्नसराईचा धूमधडाका सुरू असल्याने शेतकऱ्यांची शेतकामे व लग्न मुहूर्त साधण्यात धांदल उडाली आहे. यामुळे मजुरांची टंचाई भासत आहे.

ठळक मुद्दे लग्न समारंभ साध्या पद्धतीने उरकण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कखडकी : ग्रामीण भागात भाद्रपद महिन्यातही लग्नसराईचा धूमधडाका सुरू असल्याने शेतकऱ्यांची शेतकामे व लग्न मुहूर्त साधण्यात धांदल उडाली आहे. यामुळे मजुरांची टंचाई भासत आहे.कोरोनामुळे लग्न साध्या पद्धतीने होत असल्याने साधारण कुटुंबाची दोन ते अडीच लाखांचे बचत होणार आहे. डीजे, बॅण्ड, मंडप या गोष्टींना फाटा देऊन लग्न सोहळा उरकला जात आहे. यामुळे या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाºया कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून लग्न सोहळे झालेले नाही. मुहूर्त न मिळाल्याने श्रावण-भाद्रपद महिन्यातही मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ साध्या पद्धतीने उरकण्यावर भर देण्यात आला आहे.पावसाचे दिवस असल्याने शेतकामाचा हंगामातही शेतकºयांनी लग्नाचा मुहूर्तही व्यवस्थितपणे हाताळला आहे. पुढेही लग्नाची घाईगर्दी वाढणार असल्याने जी लग्न आधीच जमलेली आहे ती उरकून घेतली जात आहे. कोरोनामुळे गेल्या मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाल्याने लग्न सोहळे बंद आहेत. त्यामुळे बॅँड, डीजेवादकांवर उपासमार आली आहे.अन्यथा अशी परिस्थिती कधीही न उद्भवल्याने भाद्रपद महिन्यात हिंदू लग्न पद्धती प्रथा प्रचलित नव्हती. मात्र पद्धती 2020 मध्ये अस्तित्वात आली आहे. आर्थिक व्यवस्थापनकोरोनामुळे लग्न समारंभाला पन्नास ते शंभर लोक उपस्थित राहण्याची अट आहे. यामुळे लग्न गदी साध्या पद्धतीने साजरे होत आहे. डीजे, बँड, मंडपांना फाटा देऊन साध्या पद्धतीने लग्न केली जात असल्यामुळे खर्चाची बचत होत आहे. यामुळे साधारण कुटुंबाचा लाखांचा खर्चाची बचत होत असल्याने आर्थिक व्यवस्थापन होत आहे. ही पद्धती सुरू राहावी अशी इच्छा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती