शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची गरज

By admin | Updated: September 25, 2015 00:12 IST

जायखेडा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची धावती भेट

जायखेडा : शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येला नैसर्गिक आपत्ती व शासनाचे शेतीविषयक चूक धोरण जितके जबाबदार आहे तितकीच जबाबदार आपली संपूर्ण व्यवस्था असून, ही व्यवस्था बदलण्याबरोबरच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांना संपूर्ण कर्ज मुक्त केले पाहिजे व त्यांना जगण्याची संधी दिली पाहिजे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या धावत्या दौऱ्यादरम्यान जायखेडा, सोमपूर येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी ठिकठिकाणी खासदार राजू शेट्टीचा सत्कार करण्यात आला. जायखेडा येथील ग्रामपंचायत सभागृहात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामपंचायतीमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच जयश्री बच्छाव, उपसरपंच संजय मोरे, ज्येष्ठ नेते पंडित मोरे, सोमनाथ ब्राह्मणकार, पं. स. सदस्य लक्ष्मण सोनवणे, अनिल आहिरे, शांताराम आहिरे, अशोक जगताप, संजय बच्छाव, निंबा मोहिते, बापू खुडाणकर, शिवाजी कापडणीस, शरद धिवरे, आदिंसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर सोमपूर येथील साईबाबा मंदिराच्या प्रांगणात उपस्थित शेतकऱ्यांशी खासदार शेट्टी यांनी संवाद साधला.सत्तापरिवर्तन करून नवीन सरकार सत्तेत आणले खरे मात्र त्यांनीही शेतकऱ्यांचा भ्रमनिराश केला. शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्ज मुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्हा शेतकरी चळवळीचे उगमस्थान असल्याने या आंदोलनात महाराष्ट्राचे नेतृत्व नाशिक जिल्ह्याने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी सोमपूर, तांदूळवाडी, भडाणे, नांदिन व परिसरातील शेतकऱ्यांनी विविध समस्यांची निवेदने दिली. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख दीपक पगार, योगेश भामरे, जालिंदर पाटील, गिरीश भामरे, जगदीश इनामदार, डॉ, भास्कर भामरे, अ‍ॅड. नाना भामरे, सचिन भामरे, गोविंद पगार, संजय भामरे, दत्ता पवार, संजय वाघ, दीपक भामरे, राकेश बोरसे, प्रशांत भामरे, विजय भामरे, धनंजय भामरे, आनिल शिंदे, बाळासाहेब भामरे आदिंसह शेतकरी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)