शहरं
Join us  
Trending Stories
1
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
2
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
5
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
6
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
7
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
8
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
9
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
10
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
11
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
12
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
13
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
14
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
15
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
16
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
17
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
18
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
19
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
20
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची गरज

By admin | Updated: September 25, 2015 00:12 IST

जायखेडा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची धावती भेट

जायखेडा : शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येला नैसर्गिक आपत्ती व शासनाचे शेतीविषयक चूक धोरण जितके जबाबदार आहे तितकीच जबाबदार आपली संपूर्ण व्यवस्था असून, ही व्यवस्था बदलण्याबरोबरच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांना संपूर्ण कर्ज मुक्त केले पाहिजे व त्यांना जगण्याची संधी दिली पाहिजे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या धावत्या दौऱ्यादरम्यान जायखेडा, सोमपूर येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी ठिकठिकाणी खासदार राजू शेट्टीचा सत्कार करण्यात आला. जायखेडा येथील ग्रामपंचायत सभागृहात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामपंचायतीमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच जयश्री बच्छाव, उपसरपंच संजय मोरे, ज्येष्ठ नेते पंडित मोरे, सोमनाथ ब्राह्मणकार, पं. स. सदस्य लक्ष्मण सोनवणे, अनिल आहिरे, शांताराम आहिरे, अशोक जगताप, संजय बच्छाव, निंबा मोहिते, बापू खुडाणकर, शिवाजी कापडणीस, शरद धिवरे, आदिंसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर सोमपूर येथील साईबाबा मंदिराच्या प्रांगणात उपस्थित शेतकऱ्यांशी खासदार शेट्टी यांनी संवाद साधला.सत्तापरिवर्तन करून नवीन सरकार सत्तेत आणले खरे मात्र त्यांनीही शेतकऱ्यांचा भ्रमनिराश केला. शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्ज मुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक जिल्हा शेतकरी चळवळीचे उगमस्थान असल्याने या आंदोलनात महाराष्ट्राचे नेतृत्व नाशिक जिल्ह्याने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी सोमपूर, तांदूळवाडी, भडाणे, नांदिन व परिसरातील शेतकऱ्यांनी विविध समस्यांची निवेदने दिली. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख दीपक पगार, योगेश भामरे, जालिंदर पाटील, गिरीश भामरे, जगदीश इनामदार, डॉ, भास्कर भामरे, अ‍ॅड. नाना भामरे, सचिन भामरे, गोविंद पगार, संजय भामरे, दत्ता पवार, संजय वाघ, दीपक भामरे, राकेश बोरसे, प्रशांत भामरे, विजय भामरे, धनंजय भामरे, आनिल शिंदे, बाळासाहेब भामरे आदिंसह शेतकरी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)