शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 00:49 IST

जळगाव नेऊर : पंधरा हजार रुपयांपर्यंत गेलेला कांदा निर्यातबंदीमुळे आज सरासरी पंधराशे रुपयांवर येऊन ठेपल्याने कांदा उत्पादक शेतकरी कोंडीत ...

ठळक मुद्देचिंता : निर्यातबंदीचा परिणाम; बाजारभावातील घसरणीमुळे कांदा काढणीला वेग

जळगाव नेऊर : पंधरा हजार रुपयांपर्यंत गेलेला कांदा निर्यातबंदीमुळे आज सरासरी पंधराशे रुपयांवर येऊन ठेपल्याने कांदा उत्पादक शेतकरी कोंडीत सापडला आहे. कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सततच्या दर घसरणीमुळे येवला तालुक्यात कांदा काढणीला वेग आला आहे.महागडी बियाणे व कांदा रोपे खरेदी करून शेतकºयांनी वातावरणातील बदलाचा सामना करून मोठ्या संकटातून कांदा पीक घेतलेले आहे. पण मिळणाºया दरातून खर्चही वसूल होत नसल्याने तसेच कांद्यातून बदलत्या वातावरणामुळे पाहिजे असे उत्पादन निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा आवक होत असून, कांद्याला १५०० ते १८०० रु पये म्हणजे सरासरी १५०० रु पयांच्या आसपास दर मिळत आहे. मागील पंधरवड्यात हाच कांदा तीन हजारांच्या आसपास विकला जात होता. दिवसेंदिवस कांदा दरात घसरण होत असल्याने शेतकरी कांदा दरातील चढ-उतारामुळे चिंतित आहेत. त्यामुळे मिळेल त्या दरात कांदा विक्र ी करून खर्च वसूल करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. शासनाची कर्जमाफीची घोषणा, तसेच अनुदान अद्यापही काही शेतकºयांना न मिळाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. निर्यातबंदी उठविणे गरजेचे आहे. शेतकºयांना दिलासा मिळेल, अशी भावना कांदा उत्पादकांनी व्यक्त केली आहे.

राज्यात नवे सरकार आले असून, या सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी मागे घेण्याची अपेक्षा आहे. सर्वसामान्य जनतेसह शेतकरी जगविण्यासाठी नव्या सरकारने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.- मल्हारी दराडेकांदा उत्पादक, जऊळकेबदलत्या वातावरणामुळे खर्चही फिटेनासा झाला आहे. त्यात खते, औषधे, मजुरी यांची झालेली भरमसाठ वाढ यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न उभा ठाकला आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवून शेतकºयांची हेळसांड थांबवावी.- अरु ण शिंदेकांदा उत्पादक, जळगाव नेऊर

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा