शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी उन्हाळी कामात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:46 IST

नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी सध्या शेतीच्या उन्हाळी कामात व्यस्त आहे. ठिकठिकाणी उन्हाळ कांदा काढून चाळीत साठविणे, कोबी-फ्लॉवरची निंदणी व फवारणी, फुटवा बांधणी, भाजीपाल्याची काढणी आदी कामात येथील शेतकरी व्यस्त असल्याचे दिसत आहे.

एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी सध्या शेतीच्या उन्हाळी कामात व्यस्त आहे. ठिकठिकाणी उन्हाळ कांदा काढून चाळीत साठविणे, कोबी-फ्लॉवरची निंदणी व फवारणी, फुटवा बांधणी, भाजीपाल्याची काढणी आदी कामात येथील शेतकरी व्यस्त असल्याचे दिसत आहे.डिसेंबर ते जानेवारी दरम्यान लागवड केलेला कांदा एप्रिल-मे दरम्यान काढला जातो. एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव या परिसरातील काही शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा काढून झाला आहे, तर काही ठिकाणी अजूनही कांदा काढण्याचे काम सुरू आहे. ज्यांचा कांदा काढून झाला आहे त्यांनी ऊन, वारा व अवकाळी पावसापासून संंरक्षण करण्यासाठी कांद्यांच्या राशीवर पात पसरून त्यावर उसाचे पाचट व ताडपत्री टाकून झाकून ठेवले आहेत. काही ठिकाणी अजूनही उशिरा लावलेले कांदे मजुरांकडून भरून चाळीत नेऊन टाकले जातात. कांदे निवडून मजुरांकडून चाळीत साठवण्याची लगबग सुरू आहे. मजुरांची वानवा असल्याने ठेकेदारी पध्दतीने ही कामे केली जातात.सध्या उन्हामुळे दिवसभर उकाडा जाणवतो. त्यातच आभाळात काळ्या ढगांची गर्दी लक्षात घेता, अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी वारा व गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर कांदा चाळीत साठवून ठेवण्याची लगबग सुरू आहे.- रुंजा पाटील-जगताप, शेतकरी, सामनगाव

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती