निफाड : तालुक्यात अनेक ठिकाणी थकीत वीज बिलअभावी वीज कनेक्शन कट केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून महावितरण कंपनीने सक्तीच्या वीज बिल वसुलीला वाढीव मुदत द्यावी, अशी मागणी नाशिक येथील वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता कुमठेकर यांच्या कार्यालयात माजी आमदार अनिल कदम यांच्याकडे केल्या.
निफाड तालुक्यात सर्वत्र विजेच्या समस्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी थकीत वीज बिलअभावी वीज कनेक्शन कट केले जात आहे तसेच ज्या लोकांनी ८० टक्के वीज बिलांचा भरणा केला आहे. त्यांचेदेखील वीज कनेक्शन कट केले जात आहे. वारंवार जंप तुटणे, ट्रान्सफार्मर फेल होणे, ट्रान्सफाॅर्मरची क्वॉईल जाणे, तार तुटणे अशा वीज समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागत नागरिकांना अर्ज करूनही फिडर बदलून मिळत नाही तसेच महावितरण विभागांकडून चालू असलेल्या सक्तीच्या वीज बिल वसुलीला वाढीव मुदत मिळावी याकरिता कदम यांनी कुमठेकर यांच्याकडे मागणी केली. या मागण्यांबाबत लवकर कार्यवाही केली न केल्यास आंदोलनांचा इशारा कदम यांनी दिला. यावेळी कुमठेकर म्हणाले की सक्तीच्या वसुलीसंदर्भात ऊर्जा विभागाचे स्पष्ट निर्देश असून थकबाकीत प्रचंड वाढ झाल्याने वीज वितरण कंपनी तोट्यात आली आहे. त्यामुळे पर्यायाने वसुली करावी लागत असून शेतकऱ्यांनी व स्ट्रीट लाईटबाबत ग्रामपंचायतींनी किमान चालू बिले भरून सहकार्य करावे, असे आवाहनही केले. बैठकीस शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, गोकुळ गीते, शंकर संगमनेरे, संजय दाते, तानाजी पूरकर, बाबाजी कुशारे, योगेश कुयटे, आमोल जाधव, देवेंद्र काजळे, पोपट पाटील, अरुण डांगळे, छोटू साळे, प्रकाश वाटपाडे, किरण सानप, दशरथ रुमणे,भाऊसाहेब कमानकर, भाऊसाहेब खालकर, शरद खालकर, सरपंच भगवान चव्हाण उपस्थित होते.
------------
निफाड तालुक्यातील वीज समस्यांबाबत मुख्य अभियंता कुमठेकर यांना निवेदन देताना अनिल कदमसमवेत शेतकरी. (२७ निफाड)
270821\27nsk_48_27082021_13.jpg
२७ निफाड