शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

भावमंदीमुळे शेतकरी निराशेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:30 IST

पावसाने उघडीप देताच तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी सध्या चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा बाजार समितीत विक्रीसाठी नेत असला तरी, कांद्यासह टमाटे व अन्य पिकांच्या भावातील मंदीमुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपूर्व भागातील शेतकरी त्रस्तकांदा सडला, टमाटे फेकून द्यायची वेळ

शरदचंद्र खैरनार।लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे : पावसाने उघडीप देताच तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी सध्या चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा बाजार समितीत विक्रीसाठी नेत असला तरी, कांद्यासह टमाटे व अन्य पिकांच्या भावातील मंदीमुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे. पावसाळ्यामुळे चाळीतच कांदा सडल्यामुळे साधारणत: ३० टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू लागला आहे.सध्या पोळ कांद्याचा (पावसाळी कांदा) हंगाम सुरू झाल्याने त्यालाही फारसा भाव नसल्याने ८०० ते ९०० रुपये क्विंटलने कांदा विकला जात आहे. त्यामुळे यापुढे उन्हाळ कांद्याला शेतकºयांच्या अपेक्षेप्रमाणे भविष्यात जादा भाव मिळणार नाही, म्हणून शेतकरी आत्ताच पुरेसा पोळ कांदा मार्केटला येण्याच्या आत उन्हाळ कांदा नेण्याची लगबग करीत आहेत. उन्हाळ कांद्याला ३० टक्के घट असते; मात्र पोळकांद्याला घट नसते. तो ओला असल्याने वजनही चांगले भरते. त्यामुळे भाव आणखी खाली येण्याच्या आत उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात मार्केटला येऊ लागला आहे.तालुक्यात काही ठिकाणी नुकतीच कोबी, फ्लॉवरची लागवड करण्यात आली आहे. भेंडीची लागवड होऊन सुमारे तीन आठवडे झाले आहेत. भेंडीला पिवळी फुले बहरू लागली आहेत. आणखी १५ ते २० दिवसांनी भेंडी बाजारात येईल. भेंडीतच आंतरपीक म्हणून शेपूची भाजी व कोथिंबिरीची लागवड करण्यावर शेतकºयांनी भर दिला असून, शेपूला भाजी बाजारात १० रुपये प्रती जुडीचा भाव आहे. मेथी व पालकाचीही पेरणी सुमारे महिनाभरापूर्वी केली आहे. रासायनिक खतांचा वापर शेतकरी करू लागल्याने महिनाभरातच या भाज्या बाजारात येऊ लागल्या आहेत.टमाटे उत्पादक नैराश्येतनाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, कळमकरवाडी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी, माडसांगवी या पंचक्रोशीतील शेतकºयांनी सध्या टमाटे खुडण्याची कामे सुरू केली आहेत; परंतु टमाट्याच्या गडगडलेल्या भावामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे. सुमारे ७० दिवसांपूर्वी लागवड केलेले टमाट्याचे पीक जोमाने बहरले असून, सुरुवातीला साधारण ७० ते १०० रुपये एका क्रेटला भाव मिळाला; परंतु नंतर टमाट्याचे भाव गडगडल्याने काही शेतकºयांनी जनावरांना टमाटे खाऊ घालण्यास सुरुवात केली आहे.खराब कांदा हॉटेल व्यावसायिकांनाचांगला पोळ कांदा निवडीतून जो खराब कांदा शिल्लक राहतो तो १५० रुपये क्विंटलने किरकोळ व्यापारी खरेदी करतात व हाच कांदा शहरातील हॉटेलचालकांना त्यांंच्या मागणीनुसार पुरविला जातो. खराब कांदा हॉटेल व्यावसायिकांना पुरवणारी एक साखळी बाजार समितीत कार्यरत असून, त्यांना हॉटेलचालकांचे सहकार्य असल्याने हा व्यवसाय सध्या जोरात सुरू आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी