शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

भावमंदीमुळे शेतकरी निराशेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:30 IST

पावसाने उघडीप देताच तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी सध्या चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा बाजार समितीत विक्रीसाठी नेत असला तरी, कांद्यासह टमाटे व अन्य पिकांच्या भावातील मंदीमुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपूर्व भागातील शेतकरी त्रस्तकांदा सडला, टमाटे फेकून द्यायची वेळ

शरदचंद्र खैरनार।लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे : पावसाने उघडीप देताच तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी सध्या चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा बाजार समितीत विक्रीसाठी नेत असला तरी, कांद्यासह टमाटे व अन्य पिकांच्या भावातील मंदीमुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे. पावसाळ्यामुळे चाळीतच कांदा सडल्यामुळे साधारणत: ३० टक्के नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू लागला आहे.सध्या पोळ कांद्याचा (पावसाळी कांदा) हंगाम सुरू झाल्याने त्यालाही फारसा भाव नसल्याने ८०० ते ९०० रुपये क्विंटलने कांदा विकला जात आहे. त्यामुळे यापुढे उन्हाळ कांद्याला शेतकºयांच्या अपेक्षेप्रमाणे भविष्यात जादा भाव मिळणार नाही, म्हणून शेतकरी आत्ताच पुरेसा पोळ कांदा मार्केटला येण्याच्या आत उन्हाळ कांदा नेण्याची लगबग करीत आहेत. उन्हाळ कांद्याला ३० टक्के घट असते; मात्र पोळकांद्याला घट नसते. तो ओला असल्याने वजनही चांगले भरते. त्यामुळे भाव आणखी खाली येण्याच्या आत उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात मार्केटला येऊ लागला आहे.तालुक्यात काही ठिकाणी नुकतीच कोबी, फ्लॉवरची लागवड करण्यात आली आहे. भेंडीची लागवड होऊन सुमारे तीन आठवडे झाले आहेत. भेंडीला पिवळी फुले बहरू लागली आहेत. आणखी १५ ते २० दिवसांनी भेंडी बाजारात येईल. भेंडीतच आंतरपीक म्हणून शेपूची भाजी व कोथिंबिरीची लागवड करण्यावर शेतकºयांनी भर दिला असून, शेपूला भाजी बाजारात १० रुपये प्रती जुडीचा भाव आहे. मेथी व पालकाचीही पेरणी सुमारे महिनाभरापूर्वी केली आहे. रासायनिक खतांचा वापर शेतकरी करू लागल्याने महिनाभरातच या भाज्या बाजारात येऊ लागल्या आहेत.टमाटे उत्पादक नैराश्येतनाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, कळमकरवाडी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी, माडसांगवी या पंचक्रोशीतील शेतकºयांनी सध्या टमाटे खुडण्याची कामे सुरू केली आहेत; परंतु टमाट्याच्या गडगडलेल्या भावामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे. सुमारे ७० दिवसांपूर्वी लागवड केलेले टमाट्याचे पीक जोमाने बहरले असून, सुरुवातीला साधारण ७० ते १०० रुपये एका क्रेटला भाव मिळाला; परंतु नंतर टमाट्याचे भाव गडगडल्याने काही शेतकºयांनी जनावरांना टमाटे खाऊ घालण्यास सुरुवात केली आहे.खराब कांदा हॉटेल व्यावसायिकांनाचांगला पोळ कांदा निवडीतून जो खराब कांदा शिल्लक राहतो तो १५० रुपये क्विंटलने किरकोळ व्यापारी खरेदी करतात व हाच कांदा शहरातील हॉटेलचालकांना त्यांंच्या मागणीनुसार पुरविला जातो. खराब कांदा हॉटेल व्यावसायिकांना पुरवणारी एक साखळी बाजार समितीत कार्यरत असून, त्यांना हॉटेलचालकांचे सहकार्य असल्याने हा व्यवसाय सध्या जोरात सुरू आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी