शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बांधला बंधारा, चार गावांचा दुष्काळ हटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 14:56 IST

नितीन बोरसे*सटाणा : यंदा राज्यात पाऊस कमी पडल्याने दुष्काळाचे सावट असतानाच त्यावर मात करण्यासाठी शेतकºयांनी हेवेदावे आणि गावगाड्याचे राजकारण बाजूला सारून अवघ्या एका महिन्यात लोकसहभागातून ९ ते १० दशलक्ष घनफूट क्षमतेचा बंधारा बांधून कान्हेरी नदीचे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद आणि शासनाचा कोणताही निधी खर्च न ...

नितीन बोरसे*सटाणा : यंदा राज्यात पाऊस कमी पडल्याने दुष्काळाचे सावट असतानाच त्यावर मात करण्यासाठी शेतकºयांनी हेवेदावे आणि गावगाड्याचे राजकारण बाजूला सारून अवघ्या एका महिन्यात लोकसहभागातून ९ ते १० दशलक्ष घनफूट क्षमतेचा बंधारा बांधून कान्हेरी नदीचे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद आणि शासनाचा कोणताही निधी खर्च न करता ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे अकरा लाख रु पये खर्च करून मातीचा बंधारा बांधून बागलाण तालुक्यातील केरसाणे येथील शेतकºयांनी एक नवा आदर्शही निर्माण केला आहे. बागलाण तालुक्यात यंदा आॅगष्ट महिन्यात पश्चिम भागातील जलाशय पाण्याने भरली असली तरी पावसाने तब्बल एक मिहन्यापासून दडी मारल्यामुळे मध्य ,पूर्व , उत्तर ,दक्षिण बागलाण मधील पिके पाण्याअभावी करपू लागल्याने दुष्काळाचे संकट अधिक गिहरे होत चालले आहे.सलग चार ते पाच वर्षांपासून कमी पावसामुळे बहुतांश भागातील बागायती शेती उजाड होत चालली आहे.बागलाण तालुक्यातील कान्हेरी नदी परिसरातील केरसाणे परिसरही याला अपवाद नाही.सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला.त्यातच गावातील राजकीय हेवेदावे गावाच्या प्रगतीला अडथळे निर्माण होऊ लागले.त्यामुळे आधी गावातील एकमेका बद्दल गढूळ झालेली मन जुळविण्याबरोबरच एकमेकातील द्वेष भावना दूर करणे आवश्यक असल्याने त्यासाठी गावातील इंदरिसंग थोरात ,सिव्हील इंजिनियर दिलीप काका मोरे यांनी पुढाकार घेतला.गावातील जुन्या जाणत्या प्रमुख गावकºयांच्या बैठका घेऊन गावाच्या एकजुटीचे महत्व पटवून दिले.या एकजूटीतूनच लोकसहभागची चळवळ रु जवण्याचा प्रयत्न केला आण ित्याला यश देखील आले.----------------------कमी पावसामुळे उजाड झालेली बागायती शेती फुलवून गतवैभव प्राप्त करण्यासाठी थोरात आणि मोरे या जोडगोळीने बाळासाहेब मोरे ,बाळसाहेब अहिरे ,भरत अहिरे ,संजय अहिरे ,देविदास मोरे ,मुरलीधर मोरे ,प्रशांत मोरे ,उत्तम अहिरे ,विष्णू अहिरे यांना एकत्र आणले.सततचा दुष्काळ हटविण्यासाठी गाव नजीकच कान्हेरी नदीवर बंधारा बांधून वाहून जाणारे पाणी अडविण्याची सुपीक कल्पना पुढे आली. शेतकर्यांनी अकरा लाख रु पयांची आर्थिक मदत गोळा करून सुरवातील गावक-यांच्या सहभागातून चा-यांचे खोदकाम करून मातीबांधचे काम सुरु केले.त्यानंतर नदीचे एक किलोमीटर पर्यंत नदीचे खोलीकरणच्या कामास सुरु वात केली.या हे काम सलग महिनाभर चालले.हा मातीचा बंधारा पावसाच्या पाण्याने पूर्ण भरून वाहू लागला आहे.यामुळे शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :Nashikनाशिक