शहरं
Join us  
Trending Stories
1
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
2
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
3
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
4
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
5
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
6
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
7
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
8
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
9
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
10
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
11
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
12
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
13
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
14
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
15
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
16
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
17
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
18
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
19
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
20
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बांधला बंधारा, चार गावांचा दुष्काळ हटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 14:56 IST

नितीन बोरसे*सटाणा : यंदा राज्यात पाऊस कमी पडल्याने दुष्काळाचे सावट असतानाच त्यावर मात करण्यासाठी शेतकºयांनी हेवेदावे आणि गावगाड्याचे राजकारण बाजूला सारून अवघ्या एका महिन्यात लोकसहभागातून ९ ते १० दशलक्ष घनफूट क्षमतेचा बंधारा बांधून कान्हेरी नदीचे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद आणि शासनाचा कोणताही निधी खर्च न ...

नितीन बोरसे*सटाणा : यंदा राज्यात पाऊस कमी पडल्याने दुष्काळाचे सावट असतानाच त्यावर मात करण्यासाठी शेतकºयांनी हेवेदावे आणि गावगाड्याचे राजकारण बाजूला सारून अवघ्या एका महिन्यात लोकसहभागातून ९ ते १० दशलक्ष घनफूट क्षमतेचा बंधारा बांधून कान्हेरी नदीचे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद आणि शासनाचा कोणताही निधी खर्च न करता ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे अकरा लाख रु पये खर्च करून मातीचा बंधारा बांधून बागलाण तालुक्यातील केरसाणे येथील शेतकºयांनी एक नवा आदर्शही निर्माण केला आहे. बागलाण तालुक्यात यंदा आॅगष्ट महिन्यात पश्चिम भागातील जलाशय पाण्याने भरली असली तरी पावसाने तब्बल एक मिहन्यापासून दडी मारल्यामुळे मध्य ,पूर्व , उत्तर ,दक्षिण बागलाण मधील पिके पाण्याअभावी करपू लागल्याने दुष्काळाचे संकट अधिक गिहरे होत चालले आहे.सलग चार ते पाच वर्षांपासून कमी पावसामुळे बहुतांश भागातील बागायती शेती उजाड होत चालली आहे.बागलाण तालुक्यातील कान्हेरी नदी परिसरातील केरसाणे परिसरही याला अपवाद नाही.सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला.त्यातच गावातील राजकीय हेवेदावे गावाच्या प्रगतीला अडथळे निर्माण होऊ लागले.त्यामुळे आधी गावातील एकमेका बद्दल गढूळ झालेली मन जुळविण्याबरोबरच एकमेकातील द्वेष भावना दूर करणे आवश्यक असल्याने त्यासाठी गावातील इंदरिसंग थोरात ,सिव्हील इंजिनियर दिलीप काका मोरे यांनी पुढाकार घेतला.गावातील जुन्या जाणत्या प्रमुख गावकºयांच्या बैठका घेऊन गावाच्या एकजुटीचे महत्व पटवून दिले.या एकजूटीतूनच लोकसहभागची चळवळ रु जवण्याचा प्रयत्न केला आण ित्याला यश देखील आले.----------------------कमी पावसामुळे उजाड झालेली बागायती शेती फुलवून गतवैभव प्राप्त करण्यासाठी थोरात आणि मोरे या जोडगोळीने बाळासाहेब मोरे ,बाळसाहेब अहिरे ,भरत अहिरे ,संजय अहिरे ,देविदास मोरे ,मुरलीधर मोरे ,प्रशांत मोरे ,उत्तम अहिरे ,विष्णू अहिरे यांना एकत्र आणले.सततचा दुष्काळ हटविण्यासाठी गाव नजीकच कान्हेरी नदीवर बंधारा बांधून वाहून जाणारे पाणी अडविण्याची सुपीक कल्पना पुढे आली. शेतकर्यांनी अकरा लाख रु पयांची आर्थिक मदत गोळा करून सुरवातील गावक-यांच्या सहभागातून चा-यांचे खोदकाम करून मातीबांधचे काम सुरु केले.त्यानंतर नदीचे एक किलोमीटर पर्यंत नदीचे खोलीकरणच्या कामास सुरु वात केली.या हे काम सलग महिनाभर चालले.हा मातीचा बंधारा पावसाच्या पाण्याने पूर्ण भरून वाहू लागला आहे.यामुळे शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :Nashikनाशिक