शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:16 IST

येवला : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या याद्या जाहीर झाल्याने पात्र शेतकऱ्यांच्या चेहºयावर हसू फुलले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाºया लॉकडाउन व संचारबंदीने लाभार्थी शेतकºयांच्या पदरी पुन्हा काही दिवसांची प्रतीक्षाच येऊन पडली आहे. केवळ १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९पर्यंत कर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व्याजासह थकीत असलेले व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत आहे, अशाच शेतकरी कर्ज खातेदारांसाठी ही योजना आहे.

येवला : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या याद्या जाहीर झाल्याने पात्र शेतकऱ्यांच्या चेहºयावर हसू फुलले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाºया लॉकडाउन व संचारबंदीने लाभार्थी शेतकºयांच्या पदरी पुन्हा काही दिवसांची प्रतीक्षाच येऊन पडली आहे.केवळ १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९पर्यंत कर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व्याजासह थकीत असलेले व परतफेड न झालेली रक्कम दोन लाखापर्यंत आहे, अशाच शेतकरी कर्ज खातेदारांसाठी ही योजना आहे.दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असणारे, सोनेतारण कर्ज असणारे, १ एप्रिल २०१५ पूर्वी कर्ज घेतलेले परंतु पुनर्गठण न केलेले, तसेच ३१ मार्च २०१९नंतर कर्ज घेतलेले, चालू खात्यावरील कर्जदार, मंत्री, लोकसभा - राज्यसभा सदस्य, विधानसभा - विधान परिषद सदस्य, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी, कर्मचारी ज्यांचे एकत्रित मासिक वेतन रु पये २५ हजारपेक्षा जास्त आहे, यामधील चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळून महावितरण, एसटी महामंडळ, अनुदानित संस्था यांचे अधिकारी, कर्मचाºयांचे एकत्रित वेतन २५ हजारपेक्षा जास्त आहे, तसेच शेती बाह्य उत्पन्नातून आयकर भरणाºया व्यक्ती, निवृत्त वेतनधारक व्यक्ती ज्यांचे निवृत्तिवेतन २५ हजारपेक्षा जास्त आहे, यामध्ये माजी सैनिकवगळून तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरणी, नागरीसहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी दूध संघ यांचे अधिकारी यांचे एकत्रित मासिक वेतन २५ हजारपेक्षा जास्त आहे व या सर्वांचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक मंडळ या सर्वांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या कर्जमुक्ती योजनेबाबत ‘कही खुशी कही गम’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे.त्याचबरोबर ज्यांची नावे लाभार्थी पात्रता यादीत आहेत, त्यांची नावेही अजून शंभर टक्के नक्की झालेली नाहीत. या याद्याबाबत ई-केवायसी तसेच काही लोकांच्या नावांमध्ये, काही लोकांच्या खाते क्र मांक, काही लोकांचा आधार क्रमांक व काही लोकांची कर्ज रक्कम यामध्ये त्रुटी आहेत.त्यात दुरुस्त करण्याची सुविधा रेशन दुकानदार, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्राच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परंतु संचारबंदी लागू असल्यामुळे ही सुविधा तूर्त तरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे थेट कर्जमुक्त होण्यासाठी लाभार्थी शेतकºयांनाही अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.-------------------------------------ई-केवायसी सुविधा बंदकर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या चेहºयावर हसू असले तरी मनात अजूनही शंका-कुशंका आहेच. जोपर्यंत लॉकडाउन आहे तोपर्यंत, शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत ई-केवायसी सुविधाही बंद असल्याने सध्यातरी लाभार्थी पात्र कर्ज खातेदारांना बघ्याची भूमिका घेतल्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. खरीप हंगाम जवळ येत आहे, त्यामुळे शेतीची मशागत व बियाणांसाठी भांडवल म्हणून कर्ज भेटेल की नाही या विचारात शेतकरी आहे.

 

 

टॅग्स :Nashikनाशिक