शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

केळझर धरणातील पाणी मिळत नसल्याने शेतकरी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 7:08 PM

औंदाणे : बागलाण तालुक्यातील केळझर धरणावरील डाव्या कालवा व चारी नंबर आठ- ८ ला आठ दिवसापासून पाणी सोडले असून पाणी पोहोचत नसल्याने संबंधित विभागाने दखल न घेतल्यास येत्या १८ सप्टेबर रोजी कार्यालयास टाळे ठोकणार लावणारअसल्याचेनिवेदनकेळझर कृती समिती व शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता ए. बी. रौदळ यांना देण्यातआले.

ठळक मुद्दे कृती समितीच्यावतीने पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता यांना निवेदन

लोकमत न्युज नेटवर्कऔंदाणे : बागलाण तालुक्यातील केळझर धरणावरील डाव्या कालवा व चारी नंबर आठ- ८ ला आठ दिवसापासून पाणी सोडले असून पाणी पोहोचत नसल्याने संबंधित विभागाने दखल न घेतल्यास येत्या १८ सप्टेबर रोजी कार्यालयास टाळे ठोकणार लावणारअसल्याचेनिवेदनकेळझर कृती समिती व शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता ए. बी. रौदळ यांना देण्यातआले.येथील चारी चे गेल्या पंधरा वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असलेले चारी नंबर ८ चे काम आज रोजी पूर्ण झालेले आहे. मात्र ज्या केळझर डाव्या कालव्यातून पाणी चारी नंबर आठ ला येणार आहे. तो डावा कालवा काही ठिकाणावर नादुरु स्त असल्यामुळे पाणी येण्यास प्रचंड अडचणी येत आहेत. याबाबत संबंधित विभागाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. या कालव्यासाठी २०१९ यावर्षी चार कोटी ९५ लाखाचा निधी मंजूर होऊन संबंधित ठेकेदाराचे टेंडर ही झाले आहे. ठेकेदार मात्र कानाडोळा करीत आहे. त्यामुळे आज पाणी न पोहोचण्याची परिस्थिती उद्भवली आहे. संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केले असते तर आज रोजी कुठलीही अडचण आली नसती. ठेकेदाराने तात्काळ पाटाची दुरु स्ती करून पाणी कौतिक पाडे पर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी घ्यावी असे सर्व शेतकऱ्यांचे मत आहे. आणि संबंधित विभागाने हे काम पूर्ण करून घेतल्यास१८तारखेला कार्यालयास कुलूप लावण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. केळझर धरणातून वाहून जाणारे पूर पाणी शेतकºयांच्या मळ्यापर्यंत पोहोचले पाहिजे असे मत शेतकºयांनी अधिकाºयांसमोर मांडले. निवेदनावर सुधाकर रौंदळ, राजेंद्र जाधव, नंदकिशोर शेवाळे, गोपीनाथ मोहन, भिका रौंदळ, प्रभाकर रौंदळ, तात्या रौंदळ, लखन पवार, समाधान जाधव, पुंडलिक रौंदळ, मनोज मोरकर, अरु ण मोहन, राजेंद्र जाधव, देवबा मोहन आदींच्या सह्या आहेत.आम्ही शेतकºयांनी चारी नंबर आठ ला कधी पाणी येईल याची अपेक्षा सोडली होती, मात्र कान्हेरी नदीवरील काम पूर्ण झाले आणि आमच्या आशा पल्लवित झाल्या. आज कुठे आमच्या शिवारापर्यंत पाणी येईल अशी अपेक्षा आहे. मात्र संबंधित विभागाने कामाकडे लक्ष दिले तर सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल.-सुधाकर रौंदळ, शेतकरी, तरसाळी.केळझर डाव्या कालव्यावर ठिकठिकाणी रिपेरिंग चे काम केले आहे. मात्र उद्यापासून संपूर्ण कालवा साफसफाई करून कौतिक पाडे गावापर्यंत पाणी पोहोचवण्याची आम्ही हमी घेतो. उद्यापासून जास्तीत जास्त यंत्रणा उभी करून लवकरात लवकर पाणी पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.-ए.बी. रौंदळ,सहाय्यक अभियंता, सटाणा.

 

टॅग्स :water transportजलवाहतूकFarmerशेतकरी