शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील धुळीने शेतकऱ्यांचे हाल पे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:36 IST

पिंपळगाव बसवंत : शिर्डी-सुरत या मुख्य महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असल्याने अंबिकानगर व वणी चौफुली येथील रस्त्याचे आणि नालीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. उघड्या गटारीच्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव : शिर्डी-सुरत महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पिंपळगाव बसवंत : शिर्डी-सुरत या मुख्य महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असल्याने अंबिकानगर व वणी चौफुली येथील रस्त्याचे आणि नालीचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. उघड्या गटारीच्या सांडपाण्यात डासांची उत्पत्ती वाढली आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पिंपळगाव बसवंत परिसरातील वणी चौफुली, मुखेड फाटा आणि अंतरवेली फाटा या ठिकाणी सतत अपघात घडतात. या ठिकाणच्या रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे अपघाताबरोबर शेतमालाचेही नुकसान होत आहे. सततच्या उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. देवी मंदिर परिसरातील वस्तीलगत भूमिगत नाल्यासाठी ५ फुटाच्या अधिक खोल नाली गेल्या दोन-तीन महिन्यांपासून खोदून ठेवल्या आहेत. गटारीत डासांची उत्पत्ती वाढली असून, डेंग्यूसारखे साथरोग बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे व नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. (०२ पिंपळगाव २)............................................................................द्राक्ष उत्पादक हवालदिल....परिसरात रस्त्याचे व गटार नालीचे काम अपूर्ण असल्यामुळे धुळीचे व घाणीचे साम्राज्य वाढले आहे. परिसरातील द्राक्षबागांवर उडणाऱ्या मातीचा धर बसला आहे. त्यामुळे द्राक्ष पिकांना मोठा फटका बसणार असल्याने शेतकरीवर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.गटाराची नाली ठरतेय जीवघेणीवस्तीलगत असलेले गटारबांधणीसाठी अतिक्रमण काढून तीन महिने झाले. पावसात सांडपाण्याचा त्रास नागरिकांनी सहन केला, मात्र आता त्याच सांडपाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, कोरोनाबरोबरच डेंग्यूसारख्या आजाराला आमंत्रण मिळत आहे.नालीसाठी आणलेले पाइपदेखील ठेकेदार परत घेऊन जात असल्याने नागरिकांना कडून नाराजी व्यक्त केली जात आहे .कासव गतीच्या कामामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाबरोबरच डेंग्यूसारख्या आजाराने थैमान घातले आहे. शहरातून गेलेल्या रस्त्याचे काम जलद गतीने करावे, अन्यथा जनआंदोलन छेडून रस्ता रोको केला जाईल. प्रशासनाचा निषेध नोंदविला जाईल.दत्तू झनकर, उलगुलान सेनाकोरोनामुळे रस्ताचे काम रखडले होते, आता काम सुरू झाले आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण केले जाईल.-माणिक गाडे, रस्ते इंजिनिअर, शिर्डी-सुरत मार्ग

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाDust stormधुळीचे वादळ