शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

विज पुरवठ्यातील बदलामुळे शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 18:31 IST

तरसाळी : ग्रामीण भागातील विजेच्या वेळापत्रकात विज वितरण कंपनीकडून बदल करण्यात आला असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यामुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून आठवड्यातील चार दिवस, रात्री आठ ते सकाळी सहा यावेळेस थ्री फेज वीज वीज पुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गातून महावितरण विरोधात मोठा संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देरात्री विजपुरवठा : शेतकरी वर्गातून महावितरण विरोधात संताप

तरसाळी : ग्रामीण भागातील विजेच्या वेळापत्रकात विज वितरण कंपनीकडून बदल करण्यात आला असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यामुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून आठवड्यातील चार दिवस, रात्री आठ ते सकाळी सहा यावेळेस थ्री फेज वीज वीज पुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गातून महावितरण विरोधात मोठा संताप व्यक्त होत आहे.राज्य सरकार शेती आणि शेतकरी यांच्याबाबत घेतलेले काही निर्णय हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असून पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्यासाठी जिल्ह्यामधील अनेक तालुक्यातील शेतकºयांना रात्रीचे काम करावे लागत आहे.रात्री होणाºया थ्री फेज पुरवठ्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे धोक्याचे ठरणार आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे नदीकाठी तसेच शेतात मोठे गवत झाले आहे. रात्रीच्या वेळेस अशा गवतातून जाऊन कृषी पंप सुरू करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे.साप, विंचू यासह हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याला रात्रीच्यावेळी शेतकºयांना सामोरे जावे लागत आहे.उद्योग धंदयाच्या तुलनेत शेतीसाठी कमी प्रमाणात वीज दिली जाते. दिवसाला सात ते आठ तास वीज पुरवठा उपलब्ध होत असता,े त्याच वेळी शेतकºयांना पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यातच भरात भर म्हणजे दर महिन्याला विजेच्या वेळापत्रकात बदल करून शेतकºयांना भेटी देण्याचे काम महावितरणकडून होत असल्याचे मत शेतकºयांनी व्यक्त केले आहे. परिणामी शेतकरी वर्ग विज वितरण कंपनीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.वीज वितरण कंपनीकडून करण्यात आलेला हा बदल अजब स्वरूपाचा आहे. दिवसभरात शेतात काबाडकष्ट करून शेतकºयांना रात्रीच्या या बदलामुळे जागरण करावे लागत असून, यामुळे शेतकºयांची झोपही आता पारखी झाली आहे.- कपिल सोनवणे, शेतकरी, औंदाणे.रात्री येणारी वीज शेतकरी वर्गासाठी तोट्याची आहे. दिवस उजाडण्याच्या आधीच वीज जाते यामुळे शेतात राहणाºया महिलांना पाणी भरण्यासाठी रात्रीच जावे लागते. तर शेतकºयांना कृषी पंप बंद करण्यासाठी जावे लागत आह.े सरकार आणि वीज कंपनी शेतकºयांच्या जीवाशी खेळत आहे म्हणून विजपुरवठ्याच्या वेळेत बदल करून दिवसा ३ ते ४ तास वीजपुरवठा होईल असा बदल करावा.- तुषार खैरनार, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना.