शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

विज पुरवठ्यातील बदलामुळे शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 18:31 IST

तरसाळी : ग्रामीण भागातील विजेच्या वेळापत्रकात विज वितरण कंपनीकडून बदल करण्यात आला असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यामुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून आठवड्यातील चार दिवस, रात्री आठ ते सकाळी सहा यावेळेस थ्री फेज वीज वीज पुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गातून महावितरण विरोधात मोठा संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देरात्री विजपुरवठा : शेतकरी वर्गातून महावितरण विरोधात संताप

तरसाळी : ग्रामीण भागातील विजेच्या वेळापत्रकात विज वितरण कंपनीकडून बदल करण्यात आला असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यामुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असून आठवड्यातील चार दिवस, रात्री आठ ते सकाळी सहा यावेळेस थ्री फेज वीज वीज पुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा झाला आहे. यामुळे शेतकरी वर्गातून महावितरण विरोधात मोठा संताप व्यक्त होत आहे.राज्य सरकार शेती आणि शेतकरी यांच्याबाबत घेतलेले काही निर्णय हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत असून पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्यासाठी जिल्ह्यामधील अनेक तालुक्यातील शेतकºयांना रात्रीचे काम करावे लागत आहे.रात्री होणाºया थ्री फेज पुरवठ्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे धोक्याचे ठरणार आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे नदीकाठी तसेच शेतात मोठे गवत झाले आहे. रात्रीच्या वेळेस अशा गवतातून जाऊन कृषी पंप सुरू करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे.साप, विंचू यासह हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याला रात्रीच्यावेळी शेतकºयांना सामोरे जावे लागत आहे.उद्योग धंदयाच्या तुलनेत शेतीसाठी कमी प्रमाणात वीज दिली जाते. दिवसाला सात ते आठ तास वीज पुरवठा उपलब्ध होत असता,े त्याच वेळी शेतकºयांना पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यातच भरात भर म्हणजे दर महिन्याला विजेच्या वेळापत्रकात बदल करून शेतकºयांना भेटी देण्याचे काम महावितरणकडून होत असल्याचे मत शेतकºयांनी व्यक्त केले आहे. परिणामी शेतकरी वर्ग विज वितरण कंपनीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.वीज वितरण कंपनीकडून करण्यात आलेला हा बदल अजब स्वरूपाचा आहे. दिवसभरात शेतात काबाडकष्ट करून शेतकºयांना रात्रीच्या या बदलामुळे जागरण करावे लागत असून, यामुळे शेतकºयांची झोपही आता पारखी झाली आहे.- कपिल सोनवणे, शेतकरी, औंदाणे.रात्री येणारी वीज शेतकरी वर्गासाठी तोट्याची आहे. दिवस उजाडण्याच्या आधीच वीज जाते यामुळे शेतात राहणाºया महिलांना पाणी भरण्यासाठी रात्रीच जावे लागते. तर शेतकºयांना कृषी पंप बंद करण्यासाठी जावे लागत आह.े सरकार आणि वीज कंपनी शेतकºयांच्या जीवाशी खेळत आहे म्हणून विजपुरवठ्याच्या वेळेत बदल करून दिवसा ३ ते ४ तास वीजपुरवठा होईल असा बदल करावा.- तुषार खैरनार, तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना.