शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

शेतकरी भयभीत : डाव्या कालव्याच्या ‘कॉरिडोर’मध्ये बिबट मादीचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 17:27 IST

नाशिक : महादेवपूर ते थेट मेरीपर्यंत डाव्या कालव्याचा परिसर बिबट्या , तरस, रानमांजर यांसारख्या वन्यजिवांचा ‘कॉरिडोर’ म्हणून ओळखला जातो. ...

ठळक मुद्देगैरकृत्यातून असुरक्षिततेची जाणीव नकोवनविभागाच्या पथकाने पाहणी करून पिंजरे तैनात केले ‘कॉरिडोर’मध्ये भटक्या कुत्र्यांचाही उपद्रव

नाशिक : महादेवपूर ते थेट मेरीपर्यंत डाव्या कालव्याचा परिसर बिबट्या, तरस, रानमांजर यांसारख्या वन्यजिवांचा ‘कॉरिडोर’ म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षीदेखील जानेवारी ते फेब्रुवारीच्या कालावधीत बिबट मादीचा पिलांसह या कॉरिडोरमध्ये मुक्त संचार येथील शेतकरी रहिवाशांना आढळून आला होता. यावर्षी पुन्हा बिबट मादीने मागील पंधरवड्यापासून चांदशी-मखमलाबाद शिवारात मुक्त संचार करण्यास सुरुवात केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

शहरापासून लांब व नैसर्गिक लपण असलेला परिसर म्हणून डाव्या कालव्याची ओळख आहे. गंगापूर धरणापासून सुरू होणारा डावा तट कालवा महादेवपूर, जलालपूर, चांदशी, मखमलाबाद, मेरीमार्गे पुढे जातो. महादेवपूरपासून थेट मेरीपर्यंत या कालव्याच्या परिसरात वृक्षराजी काटेरी झुडपे गवताचे साम्राज्य असल्यामुळे बिबट्यासारख्या वन्यजिवांसाठी हा परिसर सुरक्षित नैसर्गिक अधिवास ठरतो. कारण अधूनमधून कालव्याला आवर्तनांमुळे पाणी असते व आवर्तन बंद झाल्यानंतरही काही दिवस कालव्यात पाण्याचे डबके साचून असतात त्यामुळे वन्यजिवांची या भागात सहज तहान भागते. मागील काही महिन्यांपासून कालव्याच्या या ‘कॉरिडोर’मध्ये भटक्या कुत्र्यांचाही उपद्रव वाढला आहे. यामुळे बिबट्याच्या खाद्याचाही प्रश्न सुटला आहे. तसेच शेतकऱ्यांचे पशुधनदेखील असुरक्षित पध्दतीने या भागात असल्याचे दिसूून येते. यामुळे गंधारवाडी ते मखमलाबाद फाट्यापर्यंत बिबट्याचा संचार पंधरवड्यापासून येथील शेतकºयांना अधिक जाणवत आहे. बिबट मादीचा संचार वाढल्याने शेतक-यांमध्ये दहशत पसरली आहे. पिलांसह मादी कालव्याच्या परिसरात वावरत असून, अनेकांना तिने दर्शन दिले आहे. बिबट मादीचा आढळून आलेला वावर आणि लोकवस्ती व मळे परिसर बघता वनविभागाच्या पथकाने पाहणी करून संभाव्य मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी या परिसरात पिंजरे तैनात केले आहेत. तसेच नियमित गस्तही सुरू करून बिबट्याच्या वास्तव्याच्या खुना शोधून त्यानुसार पिंज-यांची जागा बदल करण्यात येत आहे.गैरकृत्यातून असुरक्षिततेची जाणीव नकोबिबट मादीने अद्याप कुठल्याही प्रकारे उपद्रव माजविला नसून, नागरिकांनी संयम बाळगून खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे वनविभागाचे म्हणणे आहे. बिबट मादी किंवा तिच्या पिलांना असुरक्षिततेची जाणीव होईल, असे कुठलेही गैरकृत्य नागरिकांनी टाळावे. दोघांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे; कारण तसे झाल्यास मादी आक्रमक होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सावधगिरीने ही परिस्थिती वनविभागाकडून हाताळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टॅग्स :leopardबिबट्याwildlifeवन्यजीवNashikनाशिकforest departmentवनविभाग