शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

शेतकरी भयभीत : डाव्या कालव्याच्या ‘कॉरिडोर’मध्ये बिबट मादीचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 17:27 IST

नाशिक : महादेवपूर ते थेट मेरीपर्यंत डाव्या कालव्याचा परिसर बिबट्या , तरस, रानमांजर यांसारख्या वन्यजिवांचा ‘कॉरिडोर’ म्हणून ओळखला जातो. ...

ठळक मुद्देगैरकृत्यातून असुरक्षिततेची जाणीव नकोवनविभागाच्या पथकाने पाहणी करून पिंजरे तैनात केले ‘कॉरिडोर’मध्ये भटक्या कुत्र्यांचाही उपद्रव

नाशिक : महादेवपूर ते थेट मेरीपर्यंत डाव्या कालव्याचा परिसर बिबट्या, तरस, रानमांजर यांसारख्या वन्यजिवांचा ‘कॉरिडोर’ म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षीदेखील जानेवारी ते फेब्रुवारीच्या कालावधीत बिबट मादीचा पिलांसह या कॉरिडोरमध्ये मुक्त संचार येथील शेतकरी रहिवाशांना आढळून आला होता. यावर्षी पुन्हा बिबट मादीने मागील पंधरवड्यापासून चांदशी-मखमलाबाद शिवारात मुक्त संचार करण्यास सुरुवात केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

शहरापासून लांब व नैसर्गिक लपण असलेला परिसर म्हणून डाव्या कालव्याची ओळख आहे. गंगापूर धरणापासून सुरू होणारा डावा तट कालवा महादेवपूर, जलालपूर, चांदशी, मखमलाबाद, मेरीमार्गे पुढे जातो. महादेवपूरपासून थेट मेरीपर्यंत या कालव्याच्या परिसरात वृक्षराजी काटेरी झुडपे गवताचे साम्राज्य असल्यामुळे बिबट्यासारख्या वन्यजिवांसाठी हा परिसर सुरक्षित नैसर्गिक अधिवास ठरतो. कारण अधूनमधून कालव्याला आवर्तनांमुळे पाणी असते व आवर्तन बंद झाल्यानंतरही काही दिवस कालव्यात पाण्याचे डबके साचून असतात त्यामुळे वन्यजिवांची या भागात सहज तहान भागते. मागील काही महिन्यांपासून कालव्याच्या या ‘कॉरिडोर’मध्ये भटक्या कुत्र्यांचाही उपद्रव वाढला आहे. यामुळे बिबट्याच्या खाद्याचाही प्रश्न सुटला आहे. तसेच शेतकऱ्यांचे पशुधनदेखील असुरक्षित पध्दतीने या भागात असल्याचे दिसूून येते. यामुळे गंधारवाडी ते मखमलाबाद फाट्यापर्यंत बिबट्याचा संचार पंधरवड्यापासून येथील शेतकºयांना अधिक जाणवत आहे. बिबट मादीचा संचार वाढल्याने शेतक-यांमध्ये दहशत पसरली आहे. पिलांसह मादी कालव्याच्या परिसरात वावरत असून, अनेकांना तिने दर्शन दिले आहे. बिबट मादीचा आढळून आलेला वावर आणि लोकवस्ती व मळे परिसर बघता वनविभागाच्या पथकाने पाहणी करून संभाव्य मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी या परिसरात पिंजरे तैनात केले आहेत. तसेच नियमित गस्तही सुरू करून बिबट्याच्या वास्तव्याच्या खुना शोधून त्यानुसार पिंज-यांची जागा बदल करण्यात येत आहे.गैरकृत्यातून असुरक्षिततेची जाणीव नकोबिबट मादीने अद्याप कुठल्याही प्रकारे उपद्रव माजविला नसून, नागरिकांनी संयम बाळगून खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे वनविभागाचे म्हणणे आहे. बिबट मादी किंवा तिच्या पिलांना असुरक्षिततेची जाणीव होईल, असे कुठलेही गैरकृत्य नागरिकांनी टाळावे. दोघांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे; कारण तसे झाल्यास मादी आक्रमक होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सावधगिरीने ही परिस्थिती वनविभागाकडून हाताळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टॅग्स :leopardबिबट्याwildlifeवन्यजीवNashikनाशिकforest departmentवनविभाग