शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 19:07 IST

पाटोदा : पुढील वर्षी निवडणुका असल्याने शेतमालाला तसेच कांद्यास भाव मिळेल व तसा आजवरचा अनुभव असल्याने शेतकरी वर्गाने चाळीत ...

ठळक मुद्देकवडीमोल भाव : बाजार हस्तक्षेप योजना राबवण्याची मागणी

पाटोदा : पुढील वर्षी निवडणुका असल्याने शेतमालाला तसेच कांद्यास भाव मिळेल व तसा आजवरचा अनुभव असल्याने शेतकरी वर्गाने चाळीत साठवून ठेवलेला हजारो क्विंटल कांद्यास कवडीमोल भाव मिळत आहे. खर्चापेक्षा काही पटीने कमी भावातकांदा विकावा लागत असल्याने शेतकरी वर्गात नाराजी दिसत आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुका असल्याने शासन शेतकरी हिताचे निर्णय घेईल अशा आशेवर शेतकरी वर्गाने कांदा साठवून ठेवला मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे तसेच मध्यंतरीच्या बेमोसमी पावसाने साठवून ठेवलेल्या कांद्यास पाणी लागल्याने चाळीतील हजारो क्विंटल कांदा सडून गेल्यामुळे शेतकरी वर्गास हा कांदा उकिरड्यावर फेकून द्यावा लागत असल्याने शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे.त्याचप्रमाणे यावर्षीचा लाल कांदा तसेच रांगडा कांदा बाजारात आला, मात्र या कांद्यासही अल्पसा भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा पिकास उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच त्यांना प्रतीक्विंटलला एक हजार रु पये अनुदान देण्यात यावे किंवा बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यात येऊन कांदा हमी भावाने खरेदी करावा अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.चौकट.....भाव मिळेल या आशेवर गेल्या नऊ दहा महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागला आहे. आणि जो कांदा चांगला आहे, त्यालाही कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उकिरड्यावर फेकून देण्याशिवाय पर्याय राहिला नाही.- भास्कर नाना शेळके, कांदा उत्पादक शेतकरी, ठाणगाव.गेल्या काही वर्षांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे मुबलक पाणी पुरवठा नसतानाही कांदा पीक जगविण्यासाठी तुषार सिंचन तसेच ठिबकने पाणी पुरवठा करून तसेच प्रसंगी टँकरने पाणी आणून पीक जगवले. मात्र उत्पादित मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. शासनाने शेतकºयांनी विक्र ी केलेल्या कांद्यास अनुदान द्यावे.रवींद्र बैरागी, कांदा उत्पादक शेतकरी, दहेगाव, पाटोदा.दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे त्याच्या कोणत्याच मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे शासनाने बाजार हस्तक्षेप योजना राबवावी विक्र ी केलेल्या कांद्यास प्रति क्विंटल एक हजार रु पये अनुदान द्यावे.संजय बनकर जि. प. सदस्य तथा कृ. उ. बा.समिती संचालक, येवला.