शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे सदोष निघाल्याने शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:41 IST

सिन्नर : मृगाच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने उजनी परिसरात तसेच सिन्नरच्या पूर्व भागात पेरण्यांची लगबग सुरू आहे. या भागात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यातील उजनी परिसरात पेरणी केलेले नामांकित कंपनीचे बियाणे दीड आठवडा उलटूनही उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देभरपाईची मागणी : दोन आठवड्यांनंतरही वाढ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : मृगाच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने उजनी परिसरात तसेच सिन्नरच्या पूर्व भागात पेरण्यांची लगबग सुरू आहे. या भागात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यातील उजनी परिसरात पेरणी केलेले नामांकित कंपनीचे बियाणे दीड आठवडा उलटूनही उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.सदर कंपनीने आपल्या तंत्रज्ञामार्फत पेरणी केलेल्या बियाण्याची पडताळणी करावी व झालेले नुकसान भरून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या नामांकित कंपनीच्या सोयाबीन बियाण्याला शेतकºयांकडून सर्वाधिक मागणी आहे. उजनी परिसरातील शेतकºयांनी लगतच्या गावांतील कृषी सेवा केंद्रांमधून पेरणीसाठी बियाणे खरेदी केले. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने व खरिपाच्या बाबतीत आशा पल्लवित झाल्याने शेतकºयांनी अनुकूल परिस्थिती पाहून लागलीच या बियाण्याची पेरणी केली.बियाणे पेरणी करताना जमिनीची वाफसा स्थिती उत्तम असल्याने बहुतांश भागात पेरणीचे काम आटोपले आहे. सोयाबीन बियाण्याची उगवण साधारणत चौथ्या-पाचव्या दिवशी दिसून येते. मात्र, तब्बल दहा-बारा दिवस उलटूनही अद्याप बिज अंकुरले नसल्याने शेतकºयांमध्ये चीड निर्माण होणे साहजिक आहे. जमिनीतून सोयाबीनची उगवण होत नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.१ उजनी परिसरात अनेक शेतकºयांना हाच अनुभव आला असून अनेक ठिकाणी उगवण झाली असली तरी ती विरळ स्वरूपात आहे. तब्बल एक ते दीड फुटांवर बीज अंकुरल्याचे चित्र अनेक शेतांमध्ये दिसून येत आहे. शेतकºयांनी २४०० रुपये दराने तीस किलो वजनाची लीगल एक्सलंट या कंपनीची सोयाबीन बियाणे बॅग खरेदी केली. शेताची नांगरणी, वखरणी, वेचणी, खतांची मात्रा पेरणीचा खर्च बियाणे न उगवल्याने जवळपास १००टक्के वाया गेला आहे.२ पेरणीनंतर पुरेसा कालावधी उलटूनही बियाणे न उगवल्याने शेतकºयांनी बियाणे खरेदी केलेल्या संबंधित कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधला. बियाण्याबाबत तक्रारी आल्यानंतर संबंधित वितरकांनी कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क साधत बियाणे सदोष असल्याची माहिती दिली. मात्र, अद्यापही सदर कंपनीचा एकही अधिकारी अथवा वितरक बांधापर्यंत फिरकला नसल्याने शेतकºयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरात पर्जन्यमान चांगले असून गेल्या हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. या हंगामात या नुकसानीची कसर भरून निघेल अशी शेतकºयांची अपेक्षा असली तरी बियाणे सदोष निघाल्याने त्यावर पाणी फिरले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी