शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
6
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
7
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
8
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
9
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
10
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
11
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
12
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
13
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
14
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
15
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
16
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

बियाणे सदोष निघाल्याने शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:41 IST

सिन्नर : मृगाच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने उजनी परिसरात तसेच सिन्नरच्या पूर्व भागात पेरण्यांची लगबग सुरू आहे. या भागात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यातील उजनी परिसरात पेरणी केलेले नामांकित कंपनीचे बियाणे दीड आठवडा उलटूनही उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देभरपाईची मागणी : दोन आठवड्यांनंतरही वाढ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : मृगाच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने उजनी परिसरात तसेच सिन्नरच्या पूर्व भागात पेरण्यांची लगबग सुरू आहे. या भागात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यातील उजनी परिसरात पेरणी केलेले नामांकित कंपनीचे बियाणे दीड आठवडा उलटूनही उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.सदर कंपनीने आपल्या तंत्रज्ञामार्फत पेरणी केलेल्या बियाण्याची पडताळणी करावी व झालेले नुकसान भरून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या नामांकित कंपनीच्या सोयाबीन बियाण्याला शेतकºयांकडून सर्वाधिक मागणी आहे. उजनी परिसरातील शेतकºयांनी लगतच्या गावांतील कृषी सेवा केंद्रांमधून पेरणीसाठी बियाणे खरेदी केले. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने व खरिपाच्या बाबतीत आशा पल्लवित झाल्याने शेतकºयांनी अनुकूल परिस्थिती पाहून लागलीच या बियाण्याची पेरणी केली.बियाणे पेरणी करताना जमिनीची वाफसा स्थिती उत्तम असल्याने बहुतांश भागात पेरणीचे काम आटोपले आहे. सोयाबीन बियाण्याची उगवण साधारणत चौथ्या-पाचव्या दिवशी दिसून येते. मात्र, तब्बल दहा-बारा दिवस उलटूनही अद्याप बिज अंकुरले नसल्याने शेतकºयांमध्ये चीड निर्माण होणे साहजिक आहे. जमिनीतून सोयाबीनची उगवण होत नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.१ उजनी परिसरात अनेक शेतकºयांना हाच अनुभव आला असून अनेक ठिकाणी उगवण झाली असली तरी ती विरळ स्वरूपात आहे. तब्बल एक ते दीड फुटांवर बीज अंकुरल्याचे चित्र अनेक शेतांमध्ये दिसून येत आहे. शेतकºयांनी २४०० रुपये दराने तीस किलो वजनाची लीगल एक्सलंट या कंपनीची सोयाबीन बियाणे बॅग खरेदी केली. शेताची नांगरणी, वखरणी, वेचणी, खतांची मात्रा पेरणीचा खर्च बियाणे न उगवल्याने जवळपास १००टक्के वाया गेला आहे.२ पेरणीनंतर पुरेसा कालावधी उलटूनही बियाणे न उगवल्याने शेतकºयांनी बियाणे खरेदी केलेल्या संबंधित कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधला. बियाण्याबाबत तक्रारी आल्यानंतर संबंधित वितरकांनी कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क साधत बियाणे सदोष असल्याची माहिती दिली. मात्र, अद्यापही सदर कंपनीचा एकही अधिकारी अथवा वितरक बांधापर्यंत फिरकला नसल्याने शेतकºयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरात पर्जन्यमान चांगले असून गेल्या हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. या हंगामात या नुकसानीची कसर भरून निघेल अशी शेतकºयांची अपेक्षा असली तरी बियाणे सदोष निघाल्याने त्यावर पाणी फिरले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी