शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

बियाणे सदोष निघाल्याने शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:41 IST

सिन्नर : मृगाच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने उजनी परिसरात तसेच सिन्नरच्या पूर्व भागात पेरण्यांची लगबग सुरू आहे. या भागात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यातील उजनी परिसरात पेरणी केलेले नामांकित कंपनीचे बियाणे दीड आठवडा उलटूनही उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देभरपाईची मागणी : दोन आठवड्यांनंतरही वाढ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : मृगाच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने उजनी परिसरात तसेच सिन्नरच्या पूर्व भागात पेरण्यांची लगबग सुरू आहे. या भागात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यातील उजनी परिसरात पेरणी केलेले नामांकित कंपनीचे बियाणे दीड आठवडा उलटूनही उगवले नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.सदर कंपनीने आपल्या तंत्रज्ञामार्फत पेरणी केलेल्या बियाण्याची पडताळणी करावी व झालेले नुकसान भरून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या नामांकित कंपनीच्या सोयाबीन बियाण्याला शेतकºयांकडून सर्वाधिक मागणी आहे. उजनी परिसरातील शेतकºयांनी लगतच्या गावांतील कृषी सेवा केंद्रांमधून पेरणीसाठी बियाणे खरेदी केले. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने व खरिपाच्या बाबतीत आशा पल्लवित झाल्याने शेतकºयांनी अनुकूल परिस्थिती पाहून लागलीच या बियाण्याची पेरणी केली.बियाणे पेरणी करताना जमिनीची वाफसा स्थिती उत्तम असल्याने बहुतांश भागात पेरणीचे काम आटोपले आहे. सोयाबीन बियाण्याची उगवण साधारणत चौथ्या-पाचव्या दिवशी दिसून येते. मात्र, तब्बल दहा-बारा दिवस उलटूनही अद्याप बिज अंकुरले नसल्याने शेतकºयांमध्ये चीड निर्माण होणे साहजिक आहे. जमिनीतून सोयाबीनची उगवण होत नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.१ उजनी परिसरात अनेक शेतकºयांना हाच अनुभव आला असून अनेक ठिकाणी उगवण झाली असली तरी ती विरळ स्वरूपात आहे. तब्बल एक ते दीड फुटांवर बीज अंकुरल्याचे चित्र अनेक शेतांमध्ये दिसून येत आहे. शेतकºयांनी २४०० रुपये दराने तीस किलो वजनाची लीगल एक्सलंट या कंपनीची सोयाबीन बियाणे बॅग खरेदी केली. शेताची नांगरणी, वखरणी, वेचणी, खतांची मात्रा पेरणीचा खर्च बियाणे न उगवल्याने जवळपास १००टक्के वाया गेला आहे.२ पेरणीनंतर पुरेसा कालावधी उलटूनही बियाणे न उगवल्याने शेतकºयांनी बियाणे खरेदी केलेल्या संबंधित कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधला. बियाण्याबाबत तक्रारी आल्यानंतर संबंधित वितरकांनी कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क साधत बियाणे सदोष असल्याची माहिती दिली. मात्र, अद्यापही सदर कंपनीचा एकही अधिकारी अथवा वितरक बांधापर्यंत फिरकला नसल्याने शेतकºयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरात पर्जन्यमान चांगले असून गेल्या हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. या हंगामात या नुकसानीची कसर भरून निघेल अशी शेतकºयांची अपेक्षा असली तरी बियाणे सदोष निघाल्याने त्यावर पाणी फिरले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी