शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

भाजीपाला रस्त्यावर फेकून शेतक-यांनी व्यक्त केला संताप, मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 10:54 IST

शेतपिकाला हमीभाव मिळत नसल्यानं संतप्त शेतक-यांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे.

नाशिक - घोटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही पूर्वसूचना न देता भाजीपाला विक्री केंद्र स्थलांतरित केला. याला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सर्वच भाजीपाल्याला मिळणाऱ्या कमी भावाचा निषेध केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल रस्त्यावर ओतून बाजार समितीवरील आपला रोष व्यक्त केला. 

दरम्यान, यावेळी बाजार समितीचा एकही पदाधिकारी अथवा सचिव हजर न झाल्याने शेतकऱ्यांनी बराच वेळ महामार्गावर ठिय्या मांडला. घोटी बाजार समितीने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही पूर्वसूचना न देता आज अचानक भाजीपाला विक्री केंद्र शहराबाहेर स्थलांतरित केल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाला. स्थलांतरीत केलेल्या जागेत कोणत्याही सोयीसुविधा न देता बाजार स्थलांतरित करण्याचा एकतर्फी निर्णय बाजार समितीने घेतल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ शनिवारी (16 मार्च) सकाळी 8 वाजता सर्व शेतक-यांनी संघटीत होत शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले.

मुंबई-आग्रा महामार्गावर या शेतकऱ्यांनी ठिय्या मांडून महामार्ग रोखून धरला. बाजार समितीवर भाजीपाला विक्री केंद्र आहे त्याच ठिकाणी ठेऊन शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा द्याव्यात. शेतीमालाला हमीभाव मिळावा अशा मागण्या करत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल रस्त्यावर ओतून दिला. दरम्यान या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळापासून ठप्प झाली असून वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्या आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरी