शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

भाजीपाला रस्त्यावर फेकून शेतक-यांनी व्यक्त केला संताप, मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 10:54 IST

शेतपिकाला हमीभाव मिळत नसल्यानं संतप्त शेतक-यांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे.

नाशिक - घोटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही पूर्वसूचना न देता भाजीपाला विक्री केंद्र स्थलांतरित केला. याला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच सर्वच भाजीपाल्याला मिळणाऱ्या कमी भावाचा निषेध केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल रस्त्यावर ओतून बाजार समितीवरील आपला रोष व्यक्त केला. 

दरम्यान, यावेळी बाजार समितीचा एकही पदाधिकारी अथवा सचिव हजर न झाल्याने शेतकऱ्यांनी बराच वेळ महामार्गावर ठिय्या मांडला. घोटी बाजार समितीने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही पूर्वसूचना न देता आज अचानक भाजीपाला विक्री केंद्र शहराबाहेर स्थलांतरित केल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाला. स्थलांतरीत केलेल्या जागेत कोणत्याही सोयीसुविधा न देता बाजार स्थलांतरित करण्याचा एकतर्फी निर्णय बाजार समितीने घेतल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ शनिवारी (16 मार्च) सकाळी 8 वाजता सर्व शेतक-यांनी संघटीत होत शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले.

मुंबई-आग्रा महामार्गावर या शेतकऱ्यांनी ठिय्या मांडून महामार्ग रोखून धरला. बाजार समितीवर भाजीपाला विक्री केंद्र आहे त्याच ठिकाणी ठेऊन शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा द्याव्यात. शेतीमालाला हमीभाव मिळावा अशा मागण्या करत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल रस्त्यावर ओतून दिला. दरम्यान या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळापासून ठप्प झाली असून वाहनाच्या दुतर्फा रांगा लागल्या आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरी