शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

शेतकरी हे आधुनिक काळातले ऋषी : अण्णासाहेब मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:15 IST

ऋषी आणि कृषी हे समानअर्थी शब्द आहेत. शेतकरी हे आधुनिक काळातील ऋषी आहेत. जो शेती करतो तो ऋषी, तो निसर्गपुत्र आहे. ‘अन्न हे परब्रह्म’ असे म्हटले जाते. त्यामुळे अन्न निर्माण करणारा तो खरा ब्राह्मण आहे. शेतीतून मोती पिकवण्याची ताकद त्याच्यात आहे, असे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. बुधवारी (दि. २५) डोंगरे वसतिगृहावर सुरू झालेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

नाशिक : ऋषी आणि कृषी हे समानअर्थी शब्द आहेत. शेतकरी हे आधुनिक काळातील ऋषी आहेत. जो शेती करतो तो ऋषी, तो निसर्गपुत्र आहे. ‘अन्न हे परब्रह्म’ असे म्हटले जाते. त्यामुळे अन्न निर्माण करणारा तो खरा ब्राह्मण आहे. शेतीतून मोती पिकवण्याची ताकद त्याच्यात आहे, असे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. बुधवारी (दि. २५) डोंगरे वसतिगृहावर सुरू झालेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  ते पुढे म्हणाले की, कृषिविद्येचे जनक गौतम ऋषी आहेत. मानवजातीच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजांची पूर्तता करण्याचे मार्ग याच ऋषींनी मानवाला अवगत करून दिले. भाताचे पीक कसे घ्यायचे याचा शोध त्यांनीच लावला. शेतीतील ज्ञानाद्वारे त्यांनी आपले नाव भूतलावर सिद्ध केले आहे. आधुनिक काळातील शेतीचे होत चाललेले तुकडे क्लेशदायक असल्याचे त्यांनी सांगितले. यातून भविष्यकाळ धोक्यात आला आहे. रासायनिक शेतीने मानवी आरोग्य धोक्यात आले असून, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा कास धरावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मध्य प्रदेश येथील कृषी अभ्यासक आकाश चौरासिया यांनी सांगितले की, जैविक शेती ही काळाची गरज आहे. प्रकृतीची व्यवस्था म्हणजे जैविक शेती होय. ही जैविक शेतीच मानवाला तारू शकते. त्यामुळे तिचे तंत्र जाणून घेऊन शेतीला प्राधान्य द्यावे, असा आग्रहही त्यांनी व्यक्त केला. व्यासपीठावर सेंद्रिय शेतीतज्ज्ञ सुभाष शर्मा, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार, आमदार सीमा हिरे, माजी जिल्हाधिकारी आर. एस. राठोड, आत्माचे आकाश साबळे, संपत तिडके, शोभा तिडके, कोंडाजीमामा आव्हाड आदी मान्यवर उपस्थित  होते. कृषिदिंडीने महोत्सवास प्रारंभ झाला. परिसरातून सवाद्य दिंडी काढण्यात आली. मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दिंडीच्या समारोपानंतर कार्यक्रमस्थळी दीपप्रज्वलन व मृतिका (माती) पूजन करण्यात आले. आधुनिक शेतीतील भवितव्यावर प्रकाश टाकणारी भाषणे यावेळी करण्यात आली. नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुकुंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.सेंद्रिय शेती सोपी असली तरी त्याचे मार्केट शोधणे जिकिरीचे आहे. सेंद्रिय शेतीत पारंपरिक बियाणे महत्त्वाचे ठरतात. त्यांची साठवणूक करणे गरजेचे आहे. याचबरोबर शेती करताना नैसर्गिक संसाधनांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करण्यावर भर द्यावा.  - वासुदेव काठे, द्राक्षशेतीतज्ज्ञ१६ मे हा जागतिक कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर शासनाकडून कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात येणार आहे. फक्त शेती हे उत्पादन न राहता उत्पादनाचे निरनिराळे स्रोत शोधून त्यातून शेतकºयांना मल्टिटास्किंग स्कील दिले जाणार आहे. नैसर्गिक आपत्ती आल्या तरी शेतकरी तग धरू शकेल यावर भर दिला जाईल. परदेशाप्रमाणे भारतातही कृषी पर्यटन धोरण राबवून त्याद्वारे शेतकºयांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. - आशुतोष राठोड, पर्यटन विभाग

टॅग्स :Farmerशेतकरी