शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
4
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
5
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
6
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
7
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
8
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
9
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
10
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
12
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
13
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
14
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
15
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
16
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
17
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
18
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
19
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
20
Scam Alert: वाहन चालकांनो, ‘RTO’ कधीच ‘एपीके’ पाठवत नाही; लायसन्स व्हेरिफिकेशनच्या आडून लूट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हे आधुनिक काळातले ऋषी : अण्णासाहेब मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:15 IST

ऋषी आणि कृषी हे समानअर्थी शब्द आहेत. शेतकरी हे आधुनिक काळातील ऋषी आहेत. जो शेती करतो तो ऋषी, तो निसर्गपुत्र आहे. ‘अन्न हे परब्रह्म’ असे म्हटले जाते. त्यामुळे अन्न निर्माण करणारा तो खरा ब्राह्मण आहे. शेतीतून मोती पिकवण्याची ताकद त्याच्यात आहे, असे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. बुधवारी (दि. २५) डोंगरे वसतिगृहावर सुरू झालेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

नाशिक : ऋषी आणि कृषी हे समानअर्थी शब्द आहेत. शेतकरी हे आधुनिक काळातील ऋषी आहेत. जो शेती करतो तो ऋषी, तो निसर्गपुत्र आहे. ‘अन्न हे परब्रह्म’ असे म्हटले जाते. त्यामुळे अन्न निर्माण करणारा तो खरा ब्राह्मण आहे. शेतीतून मोती पिकवण्याची ताकद त्याच्यात आहे, असे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. बुधवारी (दि. २५) डोंगरे वसतिगृहावर सुरू झालेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  ते पुढे म्हणाले की, कृषिविद्येचे जनक गौतम ऋषी आहेत. मानवजातीच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजांची पूर्तता करण्याचे मार्ग याच ऋषींनी मानवाला अवगत करून दिले. भाताचे पीक कसे घ्यायचे याचा शोध त्यांनीच लावला. शेतीतील ज्ञानाद्वारे त्यांनी आपले नाव भूतलावर सिद्ध केले आहे. आधुनिक काळातील शेतीचे होत चाललेले तुकडे क्लेशदायक असल्याचे त्यांनी सांगितले. यातून भविष्यकाळ धोक्यात आला आहे. रासायनिक शेतीने मानवी आरोग्य धोक्यात आले असून, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा कास धरावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मध्य प्रदेश येथील कृषी अभ्यासक आकाश चौरासिया यांनी सांगितले की, जैविक शेती ही काळाची गरज आहे. प्रकृतीची व्यवस्था म्हणजे जैविक शेती होय. ही जैविक शेतीच मानवाला तारू शकते. त्यामुळे तिचे तंत्र जाणून घेऊन शेतीला प्राधान्य द्यावे, असा आग्रहही त्यांनी व्यक्त केला. व्यासपीठावर सेंद्रिय शेतीतज्ज्ञ सुभाष शर्मा, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार, आमदार सीमा हिरे, माजी जिल्हाधिकारी आर. एस. राठोड, आत्माचे आकाश साबळे, संपत तिडके, शोभा तिडके, कोंडाजीमामा आव्हाड आदी मान्यवर उपस्थित  होते. कृषिदिंडीने महोत्सवास प्रारंभ झाला. परिसरातून सवाद्य दिंडी काढण्यात आली. मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दिंडीच्या समारोपानंतर कार्यक्रमस्थळी दीपप्रज्वलन व मृतिका (माती) पूजन करण्यात आले. आधुनिक शेतीतील भवितव्यावर प्रकाश टाकणारी भाषणे यावेळी करण्यात आली. नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुकुंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.सेंद्रिय शेती सोपी असली तरी त्याचे मार्केट शोधणे जिकिरीचे आहे. सेंद्रिय शेतीत पारंपरिक बियाणे महत्त्वाचे ठरतात. त्यांची साठवणूक करणे गरजेचे आहे. याचबरोबर शेती करताना नैसर्गिक संसाधनांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करण्यावर भर द्यावा.  - वासुदेव काठे, द्राक्षशेतीतज्ज्ञ१६ मे हा जागतिक कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर शासनाकडून कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात येणार आहे. फक्त शेती हे उत्पादन न राहता उत्पादनाचे निरनिराळे स्रोत शोधून त्यातून शेतकºयांना मल्टिटास्किंग स्कील दिले जाणार आहे. नैसर्गिक आपत्ती आल्या तरी शेतकरी तग धरू शकेल यावर भर दिला जाईल. परदेशाप्रमाणे भारतातही कृषी पर्यटन धोरण राबवून त्याद्वारे शेतकºयांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. - आशुतोष राठोड, पर्यटन विभाग

टॅग्स :Farmerशेतकरी