शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

गाळपेऱ्यासाठी शेतकरी पुढे येईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 18:22 IST

नाशिक : उन्हाळ्यात निर्माण होणा-या जनावरांच्या चा-याची टंचाई दूर करण्यासाठी धरणे, तलाव, बंधा-यांच्या पाणी नसलेल्या जमिनी शेतक-यांना गाळपे-यासाठी मोफत ...

ठळक मुद्देचा-याचे संकट : शेकडो एकर जमीन पडून

नाशिक : उन्हाळ्यात निर्माण होणा-या जनावरांच्या चा-याची टंचाई दूर करण्यासाठी धरणे, तलाव, बंधा-यांच्या पाणी नसलेल्या जमिनी शेतक-यांना गाळपे-यासाठी मोफत देऊन त्यावर चारा लागवड करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना लाभक्षेत्रातील शेतक-यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ४७ प्रकल्पांच्या शेकडो एकर जागेवर गाळपेरा करण्यासाठी जेमतेम १२० शेतक-यांनी तयारी दर्शविली आहे, त्यामुळे आगामी काळात चारा टंचाईचे गंभीर संकट दूर करण्यासाठी शेतकºयांना गळ घालण्याची वेळ आली आहे.यंदा कमी पाऊस झाल्यामुळे खरिपाचे पीक शेतक-यांच्या हातून गेले, परंतु परतीचा पाऊसही न कोसळल्याने रब्बीच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. पर्जन्यमानात घट झाल्यामुळे नदी, नाले कोरडे पडले असून, धरणांमध्येही जेमतेम पाणी साठा आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चाºयाची मागणी होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता शासनाने गृहीत धरली आहे. त्यासाठी आत्तापासूनची उपाययोजना म्हणून शासनाने धरण, तलाव, बंधारा, कालव्याच्या पाणी नसलेल्या जमिनीवर चा-याच्या लागवडीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत शासन आदेश जारी करण्यात आला असून, गाळपे-यावर लागवड करू इच्छिणा-या शेतक-यांनी बाजरी, ज्वारी, मका व वैरणाची पेरणी करावी, त्यासाठी शासन मोफत बी-बियाणे उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय लागवडीच्या पिकाला प्रकल्पातूनच पाणी घेता येणार आहे. गाळपे-यावर वैरणाची लागवड करून शेतक-यांनी आपली स्वत:ची चा-याची निकड भागवावी, शिल्लक राहिलेला चारा अन्य संस्थांना देण्यासही मुभा देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात २४ लहान-मोठे धरणे असून, अन्य कालवे, पाझरतलाव, बंधा-यांची संख्या ४७ च्या घरात आहे. या प्रकल्पांच्या ताब्यातील सुमारे दीड हजार हेक्टरवरील जमीन गाळपे-यासाठी उपलब्ध असून, सर्व जमिनीवर चारा लागवड व्हावी, असा प्रशासनाचा प्रयत्न असून, त्यासाठी जाहिरातीद्वारे शेतक-यांना आवाहन करण्यात आले आहे. परंतु जिल्ह्यातील १२० शेतक-यांनीच त्यासाठी तयारी दर्शविली आहे. प्रशासनाच्या मते शेतक-यांचा गाळपे-यासाठी प्रतिकूल प्रतिसाद पाहता, भविष्यात चा-याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा, कृषी व मृदसंधारण खात्याच्या अधिका-यांना प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन लगतच्या शेतक-यांना गळ घालण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी बैठक होऊन अर्जांचा आढावा घेण्यात आला.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक