शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

स्मार्ट सिटीच्या योजनांना विरोध चुकीचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:05 IST

स्मार्ट सिटी योजना ही भांडवलदारांसाठी नसून रस्ते, पाणी, बससेवा यासारख्या मूलभूत आणि शाश्वत विकासाची कामे होणार असल्याने त्यास विचार करण्याची गरज असल्याचे मत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.

नाशिक : स्मार्ट सिटी योजना ही भांडवलदारांसाठी नसून रस्ते, पाणी, बससेवा यासारख्या मूलभूत आणि शाश्वत विकासाची कामे होणार असल्याने त्यास विचार करण्याची गरज असल्याचे मत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. मुंबई आणि पुण्याच्या जवळ असूनही नाशिकचा अपेक्षित विकास का झाला नाही, नवीन उद्योग का आला नाही याचा विचार केला तर विकासाच्या संकुचित आणि स्वयंकेंद्रित कल्पनेतच विकास रखडल्याचे दिसते. त्यामुळे शहर हिताचा विचार करून विकासाची संकल्पना व्यापक करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.  अ‍ॅड. द. तु. जायभावे प्रतिष्ठानच्या वतीने स्मार्ट सिटी संकल्पना व अंमलबजावणी या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी टॉक विथ कमिशनर कार्यक्रमात ते बोलत होते. स्मार्ट सिटी हे केवळ योजनेचे नाव आहे. त्यात मूलभूत सुविधांच्याच संकल्पना असल्याचे सांगून मुंढे म्हणाले की, तुम्हाला रस्ते हवेत, पाणीपुरवठा, पथदीप, बससेवा हवी असेल तर सर्वच या योजनेत समाविष्ट आहे. एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत महापालिकेने सव्वातीनशे कोटी रुपयांची कामे गावठाण भागात करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी निविदा निघाल्या आहेत. या भागातच नव्हे तर संपूर्ण शहरात चोवीस तास पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे सांगून त्यांनी ३० जून २०१९ पर्यंत शहरात ९० हजार स्मार्ट लाइट लागतील असेही सांगितले. नाशिकचा विकास का होत नाही, कुंभमेळ्यात निधी येऊनही शहराचा कायापालट का होत नाही याचा विचार केला तर दोष लक्षात येतात. समग्र शहराचा विचार केला पाहिजे, असे सांगून मुंढे यांनी आपण महासभेच्या किंवा स्थायी समितीच्या निर्णयांबाबत संघर्ष करतो याचे कारण म्हणजे शहराचा शाश्वत विकास झाला पाहिजे हीच इच्छा आहे. अन्यथा शासकीय वेतन घेऊन आपणही नियमित कामकाज करू शकतो असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. डी.एल. कराड यांनी केले होते. प्रा. मिलिंद वाघ यांनी प्रास्ताविक केले.अनेक मुद्यांचा ऊहापोहआपल्यावर होत असलेल्या विविध आरोपांचे खंडन मुंढे यांनी केले. मनपा अधिनियम ६७ नुसार महासभा असो अथवा स्थायी समिती यापैकी कोणीही काहीही निर्णय घेतले तरी अंमलबजावणी करायची किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार आयुक्तांनाच असल्याचे सांगितले. आपल्या कामाच्या ताणामुळे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करीत असल्याचे पसरविले जाते; मात्र त्यासंदर्भातील कारणे वेगळी आहेत. आपण ११ ठिकाणी कामे केली परंतु तेथे असे का घडले नाही असा प्रश्न त्यांनी केला. मनपातील आस्थापना खर्च, शासनाच्या वेतनापेक्षा अधिक वेतन, नियमांचे पालन न करता झालेली भरती अशा अनेक मुद्द्यांचा ऊहापोह त्यांनी केला.ती शेती कशी?करवाढीच्या विषयावर बोलताना मुंढे यांनी शेती क्षेत्रावर कर लावल्याचा आरोप फेटाळून लावला. शेती क्षेत्र जर ‘यलो झोन’ म्हणजेच रहिवासी क्षेत्रात आले तर ते शेती क्षेत्र कसे म्हणता येईल? असा प्रश्न त्यांनी केला. शेतीवरील कराबाबत आता टीका केली जाते. मात्र, १९९० पासून सिंहस्थात शेतकºयांकडून जमिनी घेण्यात आल्या. त्यांना आजवर मोबदला मिळाला नव्हता किंवा टीडीआर सुद्धा मिळाला नव्हता, तो आपण मिळवून दिल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेSmart Cityस्मार्ट सिटीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका