शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

स्मार्ट सिटीच्या योजनांना विरोध चुकीचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 01:05 IST

स्मार्ट सिटी योजना ही भांडवलदारांसाठी नसून रस्ते, पाणी, बससेवा यासारख्या मूलभूत आणि शाश्वत विकासाची कामे होणार असल्याने त्यास विचार करण्याची गरज असल्याचे मत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले.

नाशिक : स्मार्ट सिटी योजना ही भांडवलदारांसाठी नसून रस्ते, पाणी, बससेवा यासारख्या मूलभूत आणि शाश्वत विकासाची कामे होणार असल्याने त्यास विचार करण्याची गरज असल्याचे मत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. मुंबई आणि पुण्याच्या जवळ असूनही नाशिकचा अपेक्षित विकास का झाला नाही, नवीन उद्योग का आला नाही याचा विचार केला तर विकासाच्या संकुचित आणि स्वयंकेंद्रित कल्पनेतच विकास रखडल्याचे दिसते. त्यामुळे शहर हिताचा विचार करून विकासाची संकल्पना व्यापक करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.  अ‍ॅड. द. तु. जायभावे प्रतिष्ठानच्या वतीने स्मार्ट सिटी संकल्पना व अंमलबजावणी या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी टॉक विथ कमिशनर कार्यक्रमात ते बोलत होते. स्मार्ट सिटी हे केवळ योजनेचे नाव आहे. त्यात मूलभूत सुविधांच्याच संकल्पना असल्याचे सांगून मुंढे म्हणाले की, तुम्हाला रस्ते हवेत, पाणीपुरवठा, पथदीप, बससेवा हवी असेल तर सर्वच या योजनेत समाविष्ट आहे. एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत महापालिकेने सव्वातीनशे कोटी रुपयांची कामे गावठाण भागात करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी निविदा निघाल्या आहेत. या भागातच नव्हे तर संपूर्ण शहरात चोवीस तास पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे सांगून त्यांनी ३० जून २०१९ पर्यंत शहरात ९० हजार स्मार्ट लाइट लागतील असेही सांगितले. नाशिकचा विकास का होत नाही, कुंभमेळ्यात निधी येऊनही शहराचा कायापालट का होत नाही याचा विचार केला तर दोष लक्षात येतात. समग्र शहराचा विचार केला पाहिजे, असे सांगून मुंढे यांनी आपण महासभेच्या किंवा स्थायी समितीच्या निर्णयांबाबत संघर्ष करतो याचे कारण म्हणजे शहराचा शाश्वत विकास झाला पाहिजे हीच इच्छा आहे. अन्यथा शासकीय वेतन घेऊन आपणही नियमित कामकाज करू शकतो असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. डी.एल. कराड यांनी केले होते. प्रा. मिलिंद वाघ यांनी प्रास्ताविक केले.अनेक मुद्यांचा ऊहापोहआपल्यावर होत असलेल्या विविध आरोपांचे खंडन मुंढे यांनी केले. मनपा अधिनियम ६७ नुसार महासभा असो अथवा स्थायी समिती यापैकी कोणीही काहीही निर्णय घेतले तरी अंमलबजावणी करायची किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार आयुक्तांनाच असल्याचे सांगितले. आपल्या कामाच्या ताणामुळे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करीत असल्याचे पसरविले जाते; मात्र त्यासंदर्भातील कारणे वेगळी आहेत. आपण ११ ठिकाणी कामे केली परंतु तेथे असे का घडले नाही असा प्रश्न त्यांनी केला. मनपातील आस्थापना खर्च, शासनाच्या वेतनापेक्षा अधिक वेतन, नियमांचे पालन न करता झालेली भरती अशा अनेक मुद्द्यांचा ऊहापोह त्यांनी केला.ती शेती कशी?करवाढीच्या विषयावर बोलताना मुंढे यांनी शेती क्षेत्रावर कर लावल्याचा आरोप फेटाळून लावला. शेती क्षेत्र जर ‘यलो झोन’ म्हणजेच रहिवासी क्षेत्रात आले तर ते शेती क्षेत्र कसे म्हणता येईल? असा प्रश्न त्यांनी केला. शेतीवरील कराबाबत आता टीका केली जाते. मात्र, १९९० पासून सिंहस्थात शेतकºयांकडून जमिनी घेण्यात आल्या. त्यांना आजवर मोबदला मिळाला नव्हता किंवा टीडीआर सुद्धा मिळाला नव्हता, तो आपण मिळवून दिल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेSmart Cityस्मार्ट सिटीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका