शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

पोषण आहाराची खोटे बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 14:15 IST

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी भागात दिला जाणारा पोषण आहारच गायब करण्यात येत असून त्याची खोटे बिले दाखवून शासनाच्या लाखो रु पयांचा मलिदा गिळंकृत करण्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उघड झाला आहे. शासनाकडून पोषण आहार येतो मात्र बालकांना तो न देता खोटी बिले अदा करून चिमुकल्यांच्याच टाळूवरचे लोणी काही अंगणवाडी सेविका खात असून या प्रकाराची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. याबाबत संबंधित अंगणवाडी सेविकेवर घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे.

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी भागात दिला जाणारा पोषण आहारच गायब करण्यात येत असून त्याची खोटे बिले दाखवून शासनाच्या लाखो रु पयांचा मलिदा गिळंकृत करण्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उघड झाला आहे. शासनाकडून पोषण आहार येतो मात्र बालकांना तो न देता खोटी बिले अदा करून चिमुकल्यांच्याच टाळूवरचे लोणी काही अंगणवाडी सेविका खात असून या प्रकाराची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. याबाबत संबंधित अंगणवाडी सेविकेवर घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील संपूर्ण आदिवासी भाग असलेल्या आवळी परिसरातील जंगलात अनेक आदिवासी कुटुंब आपला उदरिनर्वाह करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. या वाडी वस्त्यांवर या कुटुंबांची ० ते ६ वयोगटांतील एकूण २४ बालके असून त्यांची शासकीय दप्तरी आवळी,सातूर्ली, ओंडली आदी गावच्या अंगणवाडी केंद्रांत नोंद आहे. एकीकडे राज्य शासन कुपोषणावर मात करण्यासाठी लाखो रु पयांचा निधी देत असताना मात्र तरीही शासनाचा कुठलाही पोषण आहार या बालकांना मिळाला नसल्याची तक्र ार श्रमजीवी संघटनेने घोटी पोलिसांत दाखल केली आहे.--------------------याबाबतची माहिती इगतपुरी गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प च्या संबंधितांना मिळताच प्रकल्प अधिकारी एस एस ढाकणे यांनी ठिकाणी धाव घेऊन पोषण आहार त्या बालकांना दिला. या पुढे नित्यनियमाने पोषण आहार बालकांना दिला जाईल असे स्पष्ट केले. ज्या कुणी अंगणवाडी सेविकेने या बालकांच्या नावे खोटे बिले सादर करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्याची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी केली आहे.---------------------इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यात पोषण आहार बालकांना वेळेवर मिळत नाही. गरीब आदिवासी वाट बघून असतात,त्यांच्या पर्यंत कुणीही पोहोचत नाही. कुपोषण निर्मूलन करण्यासाठी राज्य शासन पोषण आहारावर लाखो रु पयांची तरतूद करते मात्र शासकीय अधिकारी यंत्रणेच्या डोळेझाक पणामुळे ते वडी वस्त्यांवर पोहोचत नाही. खोटी बिले दाखवून फसवणूक केली जाते. कठोर कार्यवाही व्हावी ही अपेक्षा.-भगवान मधे, श्रमजीवी संघटना

टॅग्स :Nashikनाशिक