शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

पोषण आहाराची खोटे बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 14:15 IST

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी भागात दिला जाणारा पोषण आहारच गायब करण्यात येत असून त्याची खोटे बिले दाखवून शासनाच्या लाखो रु पयांचा मलिदा गिळंकृत करण्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उघड झाला आहे. शासनाकडून पोषण आहार येतो मात्र बालकांना तो न देता खोटी बिले अदा करून चिमुकल्यांच्याच टाळूवरचे लोणी काही अंगणवाडी सेविका खात असून या प्रकाराची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. याबाबत संबंधित अंगणवाडी सेविकेवर घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे.

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी भागात दिला जाणारा पोषण आहारच गायब करण्यात येत असून त्याची खोटे बिले दाखवून शासनाच्या लाखो रु पयांचा मलिदा गिळंकृत करण्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उघड झाला आहे. शासनाकडून पोषण आहार येतो मात्र बालकांना तो न देता खोटी बिले अदा करून चिमुकल्यांच्याच टाळूवरचे लोणी काही अंगणवाडी सेविका खात असून या प्रकाराची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. याबाबत संबंधित अंगणवाडी सेविकेवर घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील संपूर्ण आदिवासी भाग असलेल्या आवळी परिसरातील जंगलात अनेक आदिवासी कुटुंब आपला उदरिनर्वाह करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. या वाडी वस्त्यांवर या कुटुंबांची ० ते ६ वयोगटांतील एकूण २४ बालके असून त्यांची शासकीय दप्तरी आवळी,सातूर्ली, ओंडली आदी गावच्या अंगणवाडी केंद्रांत नोंद आहे. एकीकडे राज्य शासन कुपोषणावर मात करण्यासाठी लाखो रु पयांचा निधी देत असताना मात्र तरीही शासनाचा कुठलाही पोषण आहार या बालकांना मिळाला नसल्याची तक्र ार श्रमजीवी संघटनेने घोटी पोलिसांत दाखल केली आहे.--------------------याबाबतची माहिती इगतपुरी गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प च्या संबंधितांना मिळताच प्रकल्प अधिकारी एस एस ढाकणे यांनी ठिकाणी धाव घेऊन पोषण आहार त्या बालकांना दिला. या पुढे नित्यनियमाने पोषण आहार बालकांना दिला जाईल असे स्पष्ट केले. ज्या कुणी अंगणवाडी सेविकेने या बालकांच्या नावे खोटे बिले सादर करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्याची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी केली आहे.---------------------इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यात पोषण आहार बालकांना वेळेवर मिळत नाही. गरीब आदिवासी वाट बघून असतात,त्यांच्या पर्यंत कुणीही पोहोचत नाही. कुपोषण निर्मूलन करण्यासाठी राज्य शासन पोषण आहारावर लाखो रु पयांची तरतूद करते मात्र शासकीय अधिकारी यंत्रणेच्या डोळेझाक पणामुळे ते वडी वस्त्यांवर पोहोचत नाही. खोटी बिले दाखवून फसवणूक केली जाते. कठोर कार्यवाही व्हावी ही अपेक्षा.-भगवान मधे, श्रमजीवी संघटना

टॅग्स :Nashikनाशिक