शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

पोषण आहाराची खोटे बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 14:15 IST

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी भागात दिला जाणारा पोषण आहारच गायब करण्यात येत असून त्याची खोटे बिले दाखवून शासनाच्या लाखो रु पयांचा मलिदा गिळंकृत करण्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उघड झाला आहे. शासनाकडून पोषण आहार येतो मात्र बालकांना तो न देता खोटी बिले अदा करून चिमुकल्यांच्याच टाळूवरचे लोणी काही अंगणवाडी सेविका खात असून या प्रकाराची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. याबाबत संबंधित अंगणवाडी सेविकेवर घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे.

घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी भागात दिला जाणारा पोषण आहारच गायब करण्यात येत असून त्याची खोटे बिले दाखवून शासनाच्या लाखो रु पयांचा मलिदा गिळंकृत करण्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उघड झाला आहे. शासनाकडून पोषण आहार येतो मात्र बालकांना तो न देता खोटी बिले अदा करून चिमुकल्यांच्याच टाळूवरचे लोणी काही अंगणवाडी सेविका खात असून या प्रकाराची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. याबाबत संबंधित अंगणवाडी सेविकेवर घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील संपूर्ण आदिवासी भाग असलेल्या आवळी परिसरातील जंगलात अनेक आदिवासी कुटुंब आपला उदरिनर्वाह करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. या वाडी वस्त्यांवर या कुटुंबांची ० ते ६ वयोगटांतील एकूण २४ बालके असून त्यांची शासकीय दप्तरी आवळी,सातूर्ली, ओंडली आदी गावच्या अंगणवाडी केंद्रांत नोंद आहे. एकीकडे राज्य शासन कुपोषणावर मात करण्यासाठी लाखो रु पयांचा निधी देत असताना मात्र तरीही शासनाचा कुठलाही पोषण आहार या बालकांना मिळाला नसल्याची तक्र ार श्रमजीवी संघटनेने घोटी पोलिसांत दाखल केली आहे.--------------------याबाबतची माहिती इगतपुरी गटविकास अधिकारी व बालविकास प्रकल्प च्या संबंधितांना मिळताच प्रकल्प अधिकारी एस एस ढाकणे यांनी ठिकाणी धाव घेऊन पोषण आहार त्या बालकांना दिला. या पुढे नित्यनियमाने पोषण आहार बालकांना दिला जाईल असे स्पष्ट केले. ज्या कुणी अंगणवाडी सेविकेने या बालकांच्या नावे खोटे बिले सादर करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्याची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी केली आहे.---------------------इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यात पोषण आहार बालकांना वेळेवर मिळत नाही. गरीब आदिवासी वाट बघून असतात,त्यांच्या पर्यंत कुणीही पोहोचत नाही. कुपोषण निर्मूलन करण्यासाठी राज्य शासन पोषण आहारावर लाखो रु पयांची तरतूद करते मात्र शासकीय अधिकारी यंत्रणेच्या डोळेझाक पणामुळे ते वडी वस्त्यांवर पोहोचत नाही. खोटी बिले दाखवून फसवणूक केली जाते. कठोर कार्यवाही व्हावी ही अपेक्षा.-भगवान मधे, श्रमजीवी संघटना

टॅग्स :Nashikनाशिक