शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

६६१ अपक्षांचा मेळा, निवडून आले सोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 00:38 IST

आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ असेल; पण कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती नसेल तर उमेदवाराची निवडणुकीमध्ये अडथळ्याची शर्यत पार करताना दमछाक होते. महाराष्ट स्थापनेपासून झालेल्या बारा विधानसभा निवडणुकांमध्ये नाशिक जिल्ह्यातून ६६१ उमेदवारांनी अपक्ष म्हणून नशीब अजमावले; परंतु त्यातील केवळ १६ उमेदवारांनाच विधानसभेची पायरी चढण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे.

नाशिक : आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ असेल; पण कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती नसेल तर उमेदवाराची निवडणुकीमध्ये अडथळ्याची शर्यत पार करताना दमछाक होते. महाराष्ट स्थापनेपासून झालेल्या बारा विधानसभा निवडणुकांमध्ये नाशिक जिल्ह्यातून ६६१ उमेदवारांनी अपक्ष म्हणून नशीब अजमावले; परंतु त्यातील केवळ १६ उमेदवारांनाच विधानसभेची पायरी चढण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे.महाराष्टची स्थापना झाल्यानंतर १९६२ मध्ये पहिल्या विधानसभा निवडणुकीत १२ मतदारसंघ अस्तित्वात होते. त्यात २३ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पहिल्या निवडणुकीत मात्र मतदारांनी अपक्षांकडे पाठ फिरवित सर्वच्या सर्व कॉँग्रेस उमेदवारांना कौल दिला. १९६७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अपक्षांची संख्या घटून १९वर आली होती. या निवडणुकीतही आठ ठिकाणी काँग्रेसला मतदारांनी पसंती दिली तर उर्वरित मतदारसंघात अन्य पक्षांचे उमेदवार निवडून आले होते. याहीवेळी मतदारांनी अपक्षांना नाकारले होते. १९७२मध्ये मात्र २३ अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आणि त्यात देवळालीतून निवृत्ती गायधनी, निफाडमधून दुलाजी पाटील, येवल्यातून निवृत्ती भोरकडे आणि चांदवडमधून जनार्धन आहेर या अपक्षांनी बाजी मारली. जिल्ह्यात अपक्ष म्हणून निवडून येण्याचा पराक्रम या चार उमेदवारांनी केला. १९७८मध्ये झालेल्या निवडणुकीतही ५० उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरले त्यापैकी पुन्हा एकदा चार अपक्ष निवडून आले. त्यात देवळालीतून बाबुलाल अहिरे, सिन्नरमधून सूर्यभान गडाख, येवल्यातून जनार्धन पाटील, तर नांदगावमधून कन्हय्यालाल नहार यांचा समावेश होता. १९८०च्या निवडणुकीत ४० अपक्षांमधून केवळ शांतारामबापू वावरे या एकमेव अपक्ष उमेदवाराने नाशिक मतदारसंघातून विजय संपादन करत विधानसभेत पाऊल ठेवले. १९८५च्या निवडणुकीत ८९, तर १९९०च्या निवडणुकीत ९९ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. परंतु, या दोन्ही निवडणुकीत अपक्षांना भोपळा फोडता आला नव्हता. १९९५ची निवडणूक सर्वाधिक चुरशीची झाली.या निवडणुकीत अपक्षांच्या संख्येने विक्रम केला. यावेळी ११८ उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यात सिन्नरमधून तुकाराम दिघोळे, सुरगाण्यातून हरिश्चंद्र चव्हाण, तर बागलाणमधून दिलीप बोरसे यांनी बाजी मारली. १९९९च्या निवडणुकीत ३२ अपक्ष रिंगणात होते. त्यात देवळालीतून बबन घोलप यांनी बाजी मारली.एकमेव अपक्षाला मंत्रिपदजिल्ह्यात आतापर्यंत गेल्या १२ निवडणुकांमध्ये १६ अपक्ष निवडून आले असले तरी अपक्ष असतानाही मंत्रिपदाचे भाग्य सिन्नरमधील तुकाराम दिघोळे यांच्या वाट्याला आले. युतीच्या सत्ताकाळात दिघोळे यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली होती. युतीच्या सत्ताकाळात मंत्रिपद उपभोगलेले बबन घोलप हे नंतर १९९९च्या निवडणुकीत एबी फॉर्मच्या तांत्रिक गोंधळामुळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले.दाभाडीमधून अगोदर अपक्ष म्हणून निवडून आलेले दादा भुसे नंतर शिवसेनेत दाखल झाले आणि सध्या ते राज्यमंत्री आहेत. सुरगाण्यातून अपक्ष म्हणून निवडून आलेले हरिश्चंद्र चव्हाण हे नंतर भाजपचे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले, मात्र केंद्रात मंत्रिपदाचे स्वप्नच राहिले.२००४च्या निवडणुकीत ३५ अपक्षांमधून दाभाडीतून दादा भुसे आणि बागलाणमधून संजय चव्हाण हे उमेदवार निवडून आले तर २००९ च्या निवडणुकीत ६८ अपक्षांमधून चांदवडमधून शिरीष कोतवाल यांनी विधानसभेत प्रवेश केला. मागील २०१४ च्या निवडणुकीत ६५ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. मात्र, मोदी लाटेत सेना-भाजप विरोधक होरपळून निघालेले असताना त्यात अपक्षांचाही टिकाव लागू शकला नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकElectionनिवडणूक