शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:17 IST

आरटीई अंतर्गत पहिल्या सोडतीत नावे असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी शहरात १ हजार ३८, तर संपूर्ण जिल्ह्यात २ हजार १३४ मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही १ हजार ३८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत.

नाशिक : आरटीई अंतर्गत पहिल्या सोडतीत नावे असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी शहरात १ हजार ३८, तर संपूर्ण जिल्ह्यात २ हजार १३४ मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही १ हजार ३८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी संधी मिळावी यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.शिक्षणहक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांतील एकूण जागांपैकी २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना प्रवेश दिला जातो. या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी ५ ते ३० मार्च दरम्यान आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. नर्सरी आणि पहिल्या वर्गासाठी जिल्हाभरातून उपलब्ध जागांच्या तीन पट म्हणजे १४ हजार ५५३ अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर ८ एप्रिल रोजी राज्यासाठी पुणे येथे पहिली सोडत काढण्यात आली. यात नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ५१७ मुलांची निवड झाली असून, त्यांना प्रवेशासाठी २६ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, पहिल्या यादीत नाव असलेल्या साडेतीन हजार विद्यार्थ्यांपैकी २ हजार १३४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, पहिल्या यादीत काही पालकांनी खोटे अंतर व खोटा पत्ता नमूद केल्याचा आरोप या यादीतून वंचित राहिलेल्या पालकांनी केला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा